शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

आदिवासी भागात आधुनिक पद्धतीने भातलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

तळेघर : अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून अलीकडे शेती केली जात आहे. मात्र, या सर्वांपासून आदिवासी कोसो दूर होता. परंतु, ...

तळेघर : अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून अलीकडे शेती केली जात आहे. मात्र, या सर्वांपासून आदिवासी कोसो दूर होता. परंतु, आता आदिवासीदेखील तंत्रज्ञाचा वापर करू लागले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात चिखली येथे आदिवासी शेतकरी विजय आढारी यांनी प्रथमच आधुनिक यंत्राचा वापर करून भात लागवड केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी पाच हजार १०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. परंतु गेले कित्येक वर्षे या भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने भातलागवड केली जात आहे. परंतु, अलीकडे पावसाच्या अनियमितता व अनिश्चिततेमुळे भातपीक हे निसर्गाच्या संकटात सापडत चालले आहे. कधी पाऊस पडतो तर कधी दडी मारतो. कधी तर ऐन भात लागवडीच्या वेळेतच मुसळधार पाऊस पडतो. यामुळे सार्वत्रिक भात लागवड सुरू झाल्यामुळे भात लागवडीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी भात लागवडी रखडल्या जातात त्यामुळे आता आधुनिक यंत्राचा वापर करुन शेती करणे गरजेचे झाले आहे.

आदिवासी भागातील चिखली येथील शेतकरी शांताराम आनंदराव आणि विजय आढारी यांच्या शेतात यंत्राद्वारे भातलागवड करण्यात आली. भात लागवड करण्यासाठी चालविण्यात आलेल्या मशीनचे सारथी म्हणून मढ पारगाव (ता. जुन्नर) येथील सरपंच अर्जुन घोडे यांनी सहकार्य केले. निसर्गाचा लहरीपणा, अनियमित पाऊस, रोपवाटिका तयार करताना खर्च होणारा वेळ, तसेच उपलब्धता या सर्व अडचणी सोडविण्यासाठी यंत्राद्वारे भातलागवड हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्यादृष्टीने चिखली येथे प्रायोगिक तत्त्वावर पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी यांनी दिली.

हे प्रात्यक्षिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरूनगर मनोजकुमार ढगे, संचालक विवेक काकडे, शिव चिदंबर ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने राबविण्यात आली. या वेळी सरपंच अनिता आढारी, मंडळ कृषी अधिकारी डिंभे कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, ग्रामसेवक हनुमंत तारडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

भातपीक लागवडीसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, आत भातपीक लागवडीसाठी यंत्र उपलब्ध झाले असून मजुरी आणि वेळ याची मोठी बचत होणार आहे. शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भातपीक लागवड करावी.

टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव

२८तळेघर शेती

चिखली येथे आधुनिक पद्धतीचा अवलंब करून यंत्राद्वारे भातलागवड करण्यात आली.