शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

आदिवासी भागात आधुनिक पद्धतीने भातलागवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2021 04:10 IST

तळेघर : अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून अलीकडे शेती केली जात आहे. मात्र, या सर्वांपासून आदिवासी कोसो दूर होता. परंतु, ...

तळेघर : अत्याधुनिक तंत्रज्ञाचा वापर करून अलीकडे शेती केली जात आहे. मात्र, या सर्वांपासून आदिवासी कोसो दूर होता. परंतु, आता आदिवासीदेखील तंत्रज्ञाचा वापर करू लागले आहेत. आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम भागात चिखली येथे आदिवासी शेतकरी विजय आढारी यांनी प्रथमच आधुनिक यंत्राचा वापर करून भात लागवड केली आहे.

आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर पाटण व आहुपे ही खोरी व हा परिसर भातशेतीची आगार समजली जातात. पुणे जिल्ह्यातील एकूण भातक्षेत्र ६३ हजार ८०० हेक्टर क्षेत्रापैकी पाच हजार १०० हेक्टर क्षेत्रावर आंबेगाव तालुक्यात भातलागवड केली जाते. परंतु गेले कित्येक वर्षे या भागांमध्ये पारंपरिक पद्धतीने भातलागवड केली जात आहे. परंतु, अलीकडे पावसाच्या अनियमितता व अनिश्चिततेमुळे भातपीक हे निसर्गाच्या संकटात सापडत चालले आहे. कधी पाऊस पडतो तर कधी दडी मारतो. कधी तर ऐन भात लागवडीच्या वेळेतच मुसळधार पाऊस पडतो. यामुळे सार्वत्रिक भात लागवड सुरू झाल्यामुळे भात लागवडीसाठी मजूर मिळत नाहीत. परिणामी भात लागवडी रखडल्या जातात त्यामुळे आता आधुनिक यंत्राचा वापर करुन शेती करणे गरजेचे झाले आहे.

आदिवासी भागातील चिखली येथील शेतकरी शांताराम आनंदराव आणि विजय आढारी यांच्या शेतात यंत्राद्वारे भातलागवड करण्यात आली. भात लागवड करण्यासाठी चालविण्यात आलेल्या मशीनचे सारथी म्हणून मढ पारगाव (ता. जुन्नर) येथील सरपंच अर्जुन घोडे यांनी सहकार्य केले. निसर्गाचा लहरीपणा, अनियमित पाऊस, रोपवाटिका तयार करताना खर्च होणारा वेळ, तसेच उपलब्धता या सर्व अडचणी सोडविण्यासाठी यंत्राद्वारे भातलागवड हा उत्तम पर्याय होऊ शकतो. त्यादृष्टीने चिखली येथे प्रायोगिक तत्त्वावर पीक प्रात्यक्षिक राबविण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा परिषदेचे माजी सदस्य विजय आढारी यांनी दिली.

हे प्रात्यक्षिक जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानेश्वर बोटे, उपविभागीय कृषी अधिकारी राजगुरूनगर मनोजकुमार ढगे, संचालक विवेक काकडे, शिव चिदंबर ट्रॅक्टर यांच्या संकल्पनेतून आणि सहकार्याने राबविण्यात आली. या वेळी सरपंच अनिता आढारी, मंडळ कृषी अधिकारी डिंभे कार्यालयाचे क्षेत्रीय अधिकारी, ग्रामसेवक हनुमंत तारडे यांच्यासह शेतकरी उपस्थित होते.

भातपीक लागवडीसाठी मजुरांवर अवलंबून राहावे लागते. मात्र, आत भातपीक लागवडीसाठी यंत्र उपलब्ध झाले असून मजुरी आणि वेळ याची मोठी बचत होणार आहे. शेतकऱ्यांनी यंत्राद्वारे भातपीक लागवड करावी.

टी. के. चौधरी, तालुका कृषी अधिकारी, आंबेगाव

२८तळेघर शेती

चिखली येथे आधुनिक पद्धतीचा अवलंब करून यंत्राद्वारे भातलागवड करण्यात आली.