शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
3
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
4
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
5
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
6
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
7
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
8
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
9
Pahalgam Terror Attack : काश्मीर ट्रिपसाठी साठवलेले पैसे; ९ वर्षांच्या मुलासमोरच दहशतवाद्यांनी वडिलांवर झाडली गोळी
10
Pahalgam Terror Attack : पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर सिराज अन् शमीची संतप्त प्रतिक्रिया, म्हणाले...
11
“निरपराध पर्यटकांवर भ्याड हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांचा कायमचा बिमोड करा”: हर्षवर्धन सपकाळ
12
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
13
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
14
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
15
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
16
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
17
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
18
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
19
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
20
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...

पु.ल. म्हणाले...वातानुकूलित नाट्यगृह असेल तरच प्रयोग करेन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2022 13:12 IST

वातानुकूलित नाट्यगृह असेल तरच पुण्यात प्रयोग करेन, अशी ‘पुलं’ची अट होती...

श्रीकांत शिरोळे

पुणे :पु. ल. देशपांडे यांच्या ‘वाऱ्यावरची वरात’ या नाटकाचा प्रयोग पुण्यात होणार होता. वातानुकूलित नाट्यगृह असेल तरच पुण्यात प्रयोग करेन, अशी ‘पुलं’ची अट होती. त्यावेळी महाराष्ट्र मंडळामध्ये मंडप टाकून, एसी लावून प्रयोग लावण्यात आला. पुण्यात सांस्कृतिक केंद्र उभे राहावे, अशी कल्पना त्यावेळी पु. ल. देशपांडे यांनी मांडली आणि महापालिकेने संकल्पना उचलून धरली. सध्याच्या जागेत नाट्यगृह उभे करावे, असे तत्कालीन महापौर भाऊसाहेब शिरोळे यांनी सुचवले. त्यानंतर १९६२ मध्ये शिवाजीराव ढेरे महापौर असताना बालगंधर्वांच्या उपस्थितीत बालगंधर्व रंगमंदिराचे भूमिपूजन झाले. हा प्रकल्प पूर्ण व्हायला ६ वर्षे लागली. बी. जी. शिर्के आणि कंपनीने हा प्रकल्प उभारला आणि २६ जून १९६८ रोजी रंगमंदिराचे उद्घाटन झाले.

त्यावेळी १६ जून १९६८ रोजी महापालिकेच्या निवडणुकांचा निकाल लागला आणि मी नगरसेवक म्हणून निवडून आलो. शिवाजीनगर गावठाण आणि डेक्कन जिमखाना हा माझा मतदारसंघ होता. नगरसेवक असल्याने मी बालगंधर्व रंगमंदिराच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित होतो. त्यावेळी मी २२ वर्षांचा होतो. व्यासपीठावर यशवंतराव चव्हाण, पु. ल. देशपांडे, नानासाहेब गोरे, भुजंगराव कुलकर्णी असे मान्यवर उपस्थित होते. आचार्य प्र. के. अत्रेही उपस्थित राहणार होते. मात्र, तब्येत बरी नसल्याने त्यांनी लेखी संदेश पाठवला होता.

कोणत्याही शहराला सांस्कृतिक नाट्यगृहाची कशी आवश्यकता असते, हे यशवंतरावांनी अधोरेखित केले. ‘पुलं’ म्हणाले, ‘जीवनामध्ये नाट्य असले पाहिजे, तरच मजा येते. बालगंधर्वांसारख्या पुरुषाने स्त्रीचे काम समर्थपणे पेलले आणि बाहेर पुतळा असलेल्या राणी लक्ष्मीबाईने स्त्री असून, पुरुषासारखे कर्तृत्व गाजवले,’ हे त्यांचे भाष्य आजही प्रसिद्ध आहे.

बालगंधर्वच्या इमारतीसाठी केवळ ४० लाख रुपये खर्च!

बालगंधर्व रंगमंदिराची सध्याची इमारत बांधण्यासाठी त्यावेळी केवळ ४० लाख रुपये खर्च आला होता. आता पुनर्विकासासाठी १०० कोटी रुपये खर्च करून त्यातून परतावा किती मिळणार आहे, याचा महापालिकेने विचार करायला हवा. कोणत्याही ऐतिहासिक शहराच्या वाढीला काही मर्यादा असतात. विकासाच्या नावाखाली लक्ष्मी रस्ता, बाजीराव रस्ता मोठा करता येईल का? विश्रामबागवाडा पाडता येईल का? शहरात इतिहासाच्या अनेक खुणा आहेत. लंडनमध्ये आजही शेक्सपिअरचे घर जतन करून ठेवले आहे. पुढील पिढ्यांना इतिहास शिकवायचा की विकासाच्या नावाखाली इतिहास जमीनदोस्त करायचा?

(शब्दांकन : प्रज्ञा केळकर-सिंग)

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडP L Deshpandeपु. ल. देशपांडे