शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
2
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
3
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
6
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
7
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
8
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
9
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
10
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
11
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
12
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
13
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
14
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
15
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
16
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
17
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
18
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
19
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
20
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव

शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण बोगस?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:20 IST

नीरा : कोरोना काळात शिक्षकांनी चांगले काम केले आहे. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षक झटत आहेत. ही बाब कौतुकाला पात्र ...

नीरा : कोरोना काळात शिक्षकांनी चांगले काम केले आहे. ऑनलाइन शिक्षण देण्यासाठी शिक्षक झटत आहेत. ही बाब कौतुकाला पात्र असली तरी शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण बोगस करण्यात आल्याचा आरोप दस्तुरखुद्द पुरंदरच्या गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी पंचायत समितीच्या पदाधिकाऱ्यांपुढे केला. गायकवाड यांनी पंचायत समितीला घरचा आहेर दिल्याची चर्चा आज शिक्षकांमध्ये सुरू होती.

बुधवार दिनांक ३ फेब्रुवारी २०२१ रोजी वाल्हे येथे नीरा-कोळविहिरे गटाच्या प्रभाग समितीची बैठक जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित केली होती. यावेळी पुणे जिल्हा सहकारी बँकेचे संचालक डॉ. दिगंबर दुर्गाडे, पुरंदर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड, वाल्हे गावचे सरपंच अमोल खवले, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुहास कांबळे, वाल्हे ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी बबन चखाले, या गटातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांचे मुख्याध्यापक, ग्रामसेवक, ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते.

यावेळी जिल्हा परिषद सदस्या शालिनी पवार व उपस्थित अधिकारी पदाधिकारी यांनी जिल्हा परिषद शाळांमधील भौतिक सुविधांबाबतच्या परिस्थितीचा आढावा घेतला. मात्र या आढाव्यामध्ये पुरंदरचे गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांनी पुरंदर तालुक्यात सध्या सुरू असलेल्या ‘शाळाबाह्य विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणा’चा विषय चर्चेला घेतला व झालेल्या सर्वेक्षणाबाबत ‘शाळाबाह्य विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण’च पुरंदरमधील शिक्षकांनी बोगस केल्याचे वक्तव्य सर्वांसमोर केले.

त्यामुळे पुरंदर तालुक्यातील शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी यांनी अधिकारी पदाधिकारी या सर्वांसमक्ष केलेले वक्तव्य मान्य आहे का? आणि शाळाबाह्य सर्वेक्षणावर शिक्षण विभागाचे प्रमुख म्हणून गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड हेच स्वतः शाळाबाह्य सर्वेक्षण बोगस झाल्याचे जाहीर करत असतील तर बोगस सर्वेक्षण करणाऱ्यांवर काय कारवाई होणार?

तसेच पुरंदर तालुक्यातील प्राथमिक शिक्षकांना गटशिक्षणाधिकारी मोहन गायकवाड यांचे वक्तव्य मान्य आहे का? याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.

या बैठकीला या प्रभागातील सर्व जिल्हा परिषद प्राथमिक शाळांमधील मुख्याध्यापकांसह पुरंदर तालुक्यातील शिक्षक संघटनांचे मान्यवर प्रतिनिधी देखील उपस्थित होते. मात्र या वक्तव्याबद्दल कोणीही ‘ब्र’ काढला नाही. त्यामुळे सर्वेक्षणाबाबत नक्की बोगसपणा काय झाला आहे हे पाहणे आगामी काळात औत्सुक्याचा विषय ठरणार आहे.