शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिलीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
3
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
4
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
5
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
6
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
7
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
8
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
9
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
10
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
11
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
12
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
13
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
14
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
15
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
16
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
17
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
18
पाकिस्तानी एअरलाइन्स PIAचा नवा मालक कोण होणार? 'या' कंपनीने लावली तब्बल १० लाख कोटींची बोली
19
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
20
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
Daily Top 2Weekly Top 5

प्रवेशप्रक्रियेतून १३ हजार विद्यार्थी बाहेर

By admin | Updated: June 28, 2015 00:31 IST

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.

पुणे : अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. शनिवारी अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आता दि. २ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या,तसेच बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेंतर्गत बुधवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत ५५ हजार २० विद्यार्थ्यांना स्थान मिळाले होते. या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, या कालावधीत ४१ हजार ८०५ विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर, १२ हजार ९३३ विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. प्रवेश निश्चित न केल्याने हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यांना आता यापुढे आॅनलाईन प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. तसेच जातप्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला न देऊ शकलेल्या १५६ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. तर, १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक व केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिली.विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक संधी असेल. या शाखेतील ५ हजार २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तसेच वाणिज्य मराठीला ३२८४, तर वाणिज्य इंग्रजीला २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. कला शाखेच्या मराठी व इंग्रजीसाठीही अनुक्रमे १०२६ व ३६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणांच्या जवळपास असलेल्या व संबंंधित महाविद्यालयाचा पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत वरचे महाविद्यालय मिळू शकेल.ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित होऊनही प्रवेश घेतला नाही, ते विद्यार्थी या प्रक्रियेतून आपोआपच बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असावा किंवा त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतील. दर वर्षीच अशाप्रकारे विद्यार्थी यादीत नाव असूनही प्रवेशाकडे पाठ फिरवतात.- रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक