शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG 3rd Test: नो आघाडी...नो पिछाडी; लॉर्ड्सच्या मैदानातील टेस्ट मॅचमध्ये पहिल्यांदाच 'टाय'चा ट्विस्ट!
4
समाज कंटकांनी कावड यात्रा मार्गावर टाकले काचेचे तुकडे; भाजप नेत्याचा दावा
5
अनैतिक संबंधांचा संशय, पतीनं अभिनेत्री पत्नीवर आधी 'पेर स्प्रे' मारला, मग चाकूनं सपासप वार केले अन्...
6
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
7
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
8
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
9
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
10
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
11
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
12
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
13
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
14
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
15
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
16
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
17
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
18
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
19
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
20
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य

प्रवेशप्रक्रियेतून १३ हजार विद्यार्थी बाहेर

By admin | Updated: June 28, 2015 00:31 IST

अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत.

पुणे : अकरावीच्या पहिल्या गुणवत्ता यादीत प्रवेशासाठी पात्र ठरूनही संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्याने तब्बल १३ हजार विद्यार्थी केंद्रीय प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. शनिवारी अखेरच्या दिवसापर्यंत सुमारे ४१ हजार ८०० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला. आता दि. २ जुलै रोजी प्रवेशाची दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होणार आहे. या यादीमध्ये पहिल्या यादीत स्थान न मिळालेल्या,तसेच बेटरमेंट मिळालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश असेल.पुणे व पिंपरी-चिंचवड शहरातील महाविद्यालयांमध्ये अकरावी प्रवेशासाठी केंद्रीय प्रवेश समितीमार्फत आॅनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविली जात आहे. या प्रक्रियेंतर्गत बुधवारी पहिली गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली होती. यादीत ५५ हजार २० विद्यार्थ्यांना स्थान मिळाले होते. या विद्यार्थ्यांना शनिवारपर्यंत संबंधित महाविद्यालयात जाऊन प्रवेश निश्चित करणे आवश्यक होते. मात्र, या कालावधीत ४१ हजार ८०५ विद्यार्थ्यांनीच आपला प्रवेश निश्चित केला आहे. तर, १२ हजार ९३३ विद्यार्थी संबंधित महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी फिरकले नाहीत. प्रवेश निश्चित न केल्याने हे विद्यार्थी प्रवेशप्रक्रियेतून बाहेर पडले आहेत. त्यांना आता यापुढे आॅनलाईन प्रक्रियेतून प्रवेश मिळणार नाही. तसेच जातप्रमाणपत्र किंवा शाळा सोडल्याचा दाखला न देऊ शकलेल्या १५६ विद्यार्थ्यांचा प्रवेश रद्द करण्यात आला आहे. तर, १२९ विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात आला, अशी माहिती विभागीय शिक्षण उपसंचालक व केंद्रीय प्रवेश समितीचे अध्यक्ष रामचंद्र जाधव यांनी दिली.विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना अधिक संधी असेल. या शाखेतील ५ हजार २६० विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला नाही. तसेच वाणिज्य मराठीला ३२८४, तर वाणिज्य इंग्रजीला २९९७ विद्यार्थ्यांनी प्रवेशाकडे पाठ फिरवली. कला शाखेच्या मराठी व इंग्रजीसाठीही अनुक्रमे १०२६ व ३६६ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळालेल्या महाविद्यालयांमध्ये त्यांच्या गुणांच्या जवळपास असलेल्या व संबंंधित महाविद्यालयाचा पसंतीक्रम दिलेल्या विद्यार्थ्यांना दुसऱ्या फेरीत वरचे महाविद्यालय मिळू शकेल.ज्या विद्यार्थ्यांनी पहिल्या फेरीत प्रवेश निश्चित होऊनही प्रवेश घेतला नाही, ते विद्यार्थी या प्रक्रियेतून आपोआपच बाहेर पडले आहेत. या विद्यार्थ्यांनी इतर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला असावा किंवा त्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू असतील. दर वर्षीच अशाप्रकारे विद्यार्थी यादीत नाव असूनही प्रवेशाकडे पाठ फिरवतात.- रामचंद्र जाधव, विभागीय शिक्षण उपसंचालक