शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

लोकसहभागातून ‘आमचा गाव आमचा विकास’

By admin | Updated: August 12, 2016 00:57 IST

केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून

गावाचा नेमका कसा विकास साधणार? केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून, तीन ते पाच टप्प्यांत विविध योजना राबविणार आहे़ त्यानुसार ग्रामसभेद्वारे घेतलेल्या विकासाच्या निर्णयाची अंमलबजावणी वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे़ या योजनेसाठी तालुका पातळीवरून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यामध्ये काम करणारे १० संपर्क अधिकारी आणि १० मास्टर अधिकारी अशी विभागणी केली जाणार आहे़ गावाच्या विकासाबाबत घेतलेले निर्णय संमतीने मान्य केले जाणार आहेत. गावचा विकास हाच उद्देश असल्यामुळे या योजनेचा फायदा तालुक्यातील गावांना होणार आहे़ यामुळे गावासह नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे.लोकसहभाग कसा घेतला? तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकाने गावच्या विकासासाठी हातभार लावावा, यासाठी प्रयत्न होत आहेत.या योजनेची माहिती लोकांना देण्याकरिता प्रत्येकाला पत्र पाठविण्यात आले आहे़ मशाल फे री, लोकांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन जनजागृती करणार आहे़ मावळ तालुक्यात १८४ महसुली गावे आहेत, तर १०४ ग्रामपंचायती आहेत़ संपूर्ण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येत आहे़ विविध योजनांद्वारे लोक सहभाग वाढण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे़योजनेतून निधीचे वाटप कसे? केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या १४व्या वित्त आयोगाचा निधीतील २५ टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि इतर उपजीविका जगणारे नागरिक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे़ तर १० टक्के निधी महिला व बालकल्याण विभागाला राखीव ठेवला आहे़ १५ टक्के निधी समाजकल्याण विभागाला राखून ठेवला आहे़ आणि उर्वरित ५० टक्के गावचा विकास हे धोरण या योजनेत आहे़ विकास आराखडा कसा असेल? गावचा विकास साधता यावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेत गावचा आराखडा तयार करून विद्यार्थी, नागरिक, महिला, युवतींना मार्गदर्शन केले जाणार आहे़ नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी या योजनेत महिला, मुलींना सहभागी करून प्राधान्य देणार आहे़ तालुक्यातील पर्यटनवाढीला वाव आहे. निसर्गसंपन्न अशा गावांमध्ये पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल. विकासात स्वयंरोजगार निर्मितीलासुद्धा प्राधान्य दिले जाईल.शब्दांकन : नवनाथ शिंदे