शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

लोकसहभागातून ‘आमचा गाव आमचा विकास’

By admin | Updated: August 12, 2016 00:57 IST

केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून

गावाचा नेमका कसा विकास साधणार? केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून, तीन ते पाच टप्प्यांत विविध योजना राबविणार आहे़ त्यानुसार ग्रामसभेद्वारे घेतलेल्या विकासाच्या निर्णयाची अंमलबजावणी वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे़ या योजनेसाठी तालुका पातळीवरून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यामध्ये काम करणारे १० संपर्क अधिकारी आणि १० मास्टर अधिकारी अशी विभागणी केली जाणार आहे़ गावाच्या विकासाबाबत घेतलेले निर्णय संमतीने मान्य केले जाणार आहेत. गावचा विकास हाच उद्देश असल्यामुळे या योजनेचा फायदा तालुक्यातील गावांना होणार आहे़ यामुळे गावासह नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे.लोकसहभाग कसा घेतला? तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकाने गावच्या विकासासाठी हातभार लावावा, यासाठी प्रयत्न होत आहेत.या योजनेची माहिती लोकांना देण्याकरिता प्रत्येकाला पत्र पाठविण्यात आले आहे़ मशाल फे री, लोकांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन जनजागृती करणार आहे़ मावळ तालुक्यात १८४ महसुली गावे आहेत, तर १०४ ग्रामपंचायती आहेत़ संपूर्ण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येत आहे़ विविध योजनांद्वारे लोक सहभाग वाढण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे़योजनेतून निधीचे वाटप कसे? केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या १४व्या वित्त आयोगाचा निधीतील २५ टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि इतर उपजीविका जगणारे नागरिक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे़ तर १० टक्के निधी महिला व बालकल्याण विभागाला राखीव ठेवला आहे़ १५ टक्के निधी समाजकल्याण विभागाला राखून ठेवला आहे़ आणि उर्वरित ५० टक्के गावचा विकास हे धोरण या योजनेत आहे़ विकास आराखडा कसा असेल? गावचा विकास साधता यावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेत गावचा आराखडा तयार करून विद्यार्थी, नागरिक, महिला, युवतींना मार्गदर्शन केले जाणार आहे़ नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी या योजनेत महिला, मुलींना सहभागी करून प्राधान्य देणार आहे़ तालुक्यातील पर्यटनवाढीला वाव आहे. निसर्गसंपन्न अशा गावांमध्ये पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल. विकासात स्वयंरोजगार निर्मितीलासुद्धा प्राधान्य दिले जाईल.शब्दांकन : नवनाथ शिंदे