शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
3
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
4
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
5
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
6
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
7
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
8
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
11
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
12
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
13
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
14
Ather IPO GMP Today : Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
15
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
16
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
17
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
18
जखमेवर मीठ! मुंबईविरुद्धच्या पराभवानंतर बीसीसीआयने ऋषभ पंतला ठोठावला लाखोंचा दंड
19
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
20
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी

लोकसहभागातून ‘आमचा गाव आमचा विकास’

By admin | Updated: August 12, 2016 00:57 IST

केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून

गावाचा नेमका कसा विकास साधणार? केंद्र सरकारच्या १४व्या वित्त आयोगाच्या निधीतून ग्रामपंचायत पातळीवर विकास करायचा हाच या योजनेचा मुख्य उद्देश आहे़ गावचा विकास आराखडा तयार करून, तीन ते पाच टप्प्यांत विविध योजना राबविणार आहे़ त्यानुसार ग्रामसभेद्वारे घेतलेल्या विकासाच्या निर्णयाची अंमलबजावणी वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात येणार आहे़ या योजनेसाठी तालुका पातळीवरून जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण यामध्ये काम करणारे १० संपर्क अधिकारी आणि १० मास्टर अधिकारी अशी विभागणी केली जाणार आहे़ गावाच्या विकासाबाबत घेतलेले निर्णय संमतीने मान्य केले जाणार आहेत. गावचा विकास हाच उद्देश असल्यामुळे या योजनेचा फायदा तालुक्यातील गावांना होणार आहे़ यामुळे गावासह नागरिकांच्या विकासाला प्राधान्य दिले जाणार आहे.लोकसहभाग कसा घेतला? तालुक्यातील प्रत्येक गावातील नागरिकाने गावच्या विकासासाठी हातभार लावावा, यासाठी प्रयत्न होत आहेत.या योजनेची माहिती लोकांना देण्याकरिता प्रत्येकाला पत्र पाठविण्यात आले आहे़ मशाल फे री, लोकांच्या भेटीगाठी, बैठका घेऊन जनजागृती करणार आहे़ मावळ तालुक्यात १८४ महसुली गावे आहेत, तर १०४ ग्रामपंचायती आहेत़ संपूर्ण विकास साधण्यासाठी नागरिकांचा सहभाग वाढविण्यात येत आहे़ विविध योजनांद्वारे लोक सहभाग वाढण्यासाठी तालुका प्रशासन प्रयत्नशील आहे़योजनेतून निधीचे वाटप कसे? केंद्र शासनाच्या वतीने दिल्या जाणाऱ्या १४व्या वित्त आयोगाचा निधीतील २५ टक्के निधी शिक्षण, आरोग्य आणि इतर उपजीविका जगणारे नागरिक यांच्यासाठी राखीव ठेवला आहे़ तर १० टक्के निधी महिला व बालकल्याण विभागाला राखीव ठेवला आहे़ १५ टक्के निधी समाजकल्याण विभागाला राखून ठेवला आहे़ आणि उर्वरित ५० टक्के गावचा विकास हे धोरण या योजनेत आहे़ विकास आराखडा कसा असेल? गावचा विकास साधता यावा यासाठी ही योजना राबविण्यात येत आहे़ या योजनेत गावचा आराखडा तयार करून विद्यार्थी, नागरिक, महिला, युवतींना मार्गदर्शन केले जाणार आहे़ नियोजनबद्ध विकास व्हावा यासाठी या योजनेत महिला, मुलींना सहभागी करून प्राधान्य देणार आहे़ तालुक्यातील पर्यटनवाढीला वाव आहे. निसर्गसंपन्न अशा गावांमध्ये पर्यटनाला चालना देऊन रोजगार निर्मितीच्या दृष्टीने पाऊल टाकले जाईल. विकासात स्वयंरोजगार निर्मितीलासुद्धा प्राधान्य दिले जाईल.शब्दांकन : नवनाथ शिंदे