शहरं
Join us  
Trending Stories
1
उड्डाण करताच ब्रिटनमध्ये विमान कोसळले; एअर इंडिया अपघातासारखेच आगीचे लोळ... 
2
निमिषा प्रियाचा जीव वाचू शकेल? फाशीला उरलेत अवघे २ दिवस! सुप्रीम कोर्टात आज होणार मोठी सुनावणी 
3
कराड 'आरटीओ'ला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका, 'त्या' बुलेटचे रजिस्टर करण्याचे आदेश; नेमकं प्रकरण काय?
4
Air India Plane Crash : क्रॅश झालेल्या एअर इंडियाच्या विमानाचे टीसीएम दोनदा बदलले होते; इंधन नियंत्रण स्विच याचाच एक भाग
5
दुबई अन् नेपाळपर्यंत पसरलं होतं छांगुर बाबाचं जाळं; 'नीतू' करायची डील! कोण आहे 'ही' व्यक्ती?   
6
'दुआ में जरुर याद रखना' मृत्यूपूर्वी अभिनेत्रीचे अखेरचे शब्द; Voice Note पहिल्यांदाच समोर
7
...मग तेव्हा उद्धव ठाकरे २५ मिनिटं मोदीजींचे बूट चाटत होते का?; रामदास कदमांचा राऊतांवर हल्ला
8
बंगालच्या उपसागरात १६ दिवस चिनी जहाज लपून बसलेले; ओळख सांगणारी यंत्रणा चालू-बंद करत होते...
9
आजचे राशीभविष्य, १४ जुलै २०२५: नवीन कार्यारंभ यशस्वीपणे करू शकाल, भविष्यात लाभ होतील
10
इकडे चौकशी सुरू; तिकडे बाळाने मिटले डोळे, अंत्यसंस्काराची तयारी सुरू असतानाच रडलेले...
11
संपादकीय: गूढ उकलले की वाढले? एअर इंडियाच्या पायलटांवर संशय, बोईंगला वाचविण्याचे प्रयत्न...
12
पुढील महिन्यापासून संपूर्ण देशात मतदार याद्यांचे सखोल पुनरीक्षण
13
उम्र का तू तमाशा न दिखा, तकाजा कुछ और हैं...; काळाबरोबर खूप काही बदलले...
14
धक्कादायक : बिहारच्या मतदार याद्यांत म्यानमार, नेपाळी, बांगलादेशींचा भरणा
15
नागरिकांना ४ लाखांचे विमा संरक्षण मिळणार? पीएमजेजेबीवाय अंतर्गत विमा संरक्षण दुप्पट करणार
16
विधिज्ञ उज्ज्वल निकम, आणखी तिघे राज्यसभेवर; श्रुंगला, सदानंदन, मीनाक्षी जैन यांचाही समावेश
17
बिहारमध्ये गुंडाराज: १३ दिवसांत ३० हत्या; नेते, अधिकाऱ्यांनाही सोडले नाही
18
उत्तर कोरियाच्या विरोधात जाऊ नका, रशियाचा अमेरिका-जपानला इशारा
19
शनैश्वर बनावट ॲप तयार करणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल
20
आंदोलने मजेसाठी नसतात, लोकांचे हक्क महत्वाचे; मद्रास हायकोर्ट : पक्षाची मनमानी चालू शकत नाही

पुण्याचा विकास हाच आमचा ध्यास

By admin | Updated: February 19, 2017 04:59 IST

गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी

पुणे : गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी १० ते १५ वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही केली नाहीत तीच कामे आम्ही केवळ दोन वर्षांत मार्गी लावून दाखविली, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. प्रचारातील विविध मुद्यांवर ‘लोकमत’शी बोलताना बापट म्हणाले, ‘शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरते गाजतात पण तुम्ही केलेल्या विकासकामांची दखल लोक पिढ्यान्पिढ्या घेतात. शहराचा सुनियंत्रित आणि समतोल विकास होणे ही गरज होती. पण काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निष्क्रियतेमुळे तसे झाली नाही. आम्ही सत्तेत येताच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सक्रीय प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यामतून आम्ही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटींचा निधी मंजूर करू घेतला. प्रस्तावित मेट्रो मार्गाप्रमाणेच आयटी क्षेत्राची गरज ओळखून केवळ १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मागार्ला मंजुरी दिली. विकास आराखडा, पीएमआरडीए यांच्या बाबतीतही तेच झाले. क्षुल्लक गोष्टींचे राजकारण करून १० ते १५ वर्षे हे प्रकल्प त्यांनी रखडवले होते. आम्ही त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून त्याला मूर्तरूप दिले. हे विकासाचेच द्योतक म्हणावे लागेल.पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज ओळखून पुरंदरमध्ये सुसज्ज विमानतळ येत्या काही वर्षांत सज्ज होईल. शेतकऱ्यांचे यामध्ये कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर व नितीन गडकरी यांच्या समवेत माझी ठोस चर्चा झाली असून आता लोहगाव विमानतळाचा प्रश्नही मार्गी लागेल.शहरात कचरा निर्मुलनाच्या सक्षम सुविधा राबविण्यात प्रशासन व राज्यकर्त्यांना अपयश आल्याने कचरा प्रश्न पेटल्याचे सांगून बापट म्हणाले, ‘‘त्यामुळे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी तातडीने बैठक बोलावून शहरातील कचरा शहरातच जिरवला जावा, असे आदेश प्रशासनाला दिले. यातूनच आता शहराच्या विविध भागांत छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. वनविभागाच्या जागेत साकारत असलेला पिंपरी सांडस घनकचरा प्रकल्पही आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात रहिवासी सोसायट्यांसाठी स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. याद्वारे सौरवीजनिर्मिती प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पाची उभारणी करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना शासनाचे अनुदान प्राप्त होईल. पुण्याला यंदाच्या वर्षी प्रथमच पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागला. राजकीय इच्छाशक्ती अभावी पाण्याचे आॅडिट हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. चोवीस तास पाणी हवे असेल तर प्रत्येक थेंबाच्या हिशेबालाही आपल्याला प्राधान्य द्यावे लागेल. मी पालकमंत्री झाल्यावर दीड ते दोन टीएमसी पाणी प्रक्रिया करून शेतीला सोडले. यामुळे तेथील शेतकरी खुश झाला आणि पुणेकरही माझ्यावर नाराज झाले नाहीत. आज पुण्याला पुरवठा जलवाहिन्यांत ३० टक्के पाण्याची गळती आहे. ती रोखण्याबरोबरच पाण्याच्या पुर्नवापर होण्यासाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यावरही आम्ही भर देणार आहे.(प्रतिनिधी)विरोधकांकडून राजकारण‘गुंडांचा पक्ष’ या आरोपावर विरोधकांवर पलटवार करताना ते म्हणाले, ‘आमच्या पक्षात जे आले ते गुंड असे ते म्हणतात. इकडे आले की ते कसे गुंड होतात. त्यांच्याकडे ते सज्जन होते. आमच्याकडे ते आले म्हणून त्यांना दु:ख होते. ते गुंड वाटू लागतात. याच्यातही विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. आम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. विकासाच्या मुद्यावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुणेकरांसाठी आम्ही काय करणार, हे ऐकायला लोक उत्सुक असतात.‘आपआपसांत न भांडता युती करून एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असे जनमानस होते. पण जागावाटपावरून समझोता न झाल्याने युती तुटली. ही युती आम्ही तोडली नसून शिवसेनेने तोडली आहे. याचा फटका शिवसेनेलाच अधिक प्रमाणात बसेल. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे