शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याचा विकास हाच आमचा ध्यास

By admin | Updated: February 19, 2017 04:59 IST

गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी

पुणे : गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी १० ते १५ वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही केली नाहीत तीच कामे आम्ही केवळ दोन वर्षांत मार्गी लावून दाखविली, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. प्रचारातील विविध मुद्यांवर ‘लोकमत’शी बोलताना बापट म्हणाले, ‘शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरते गाजतात पण तुम्ही केलेल्या विकासकामांची दखल लोक पिढ्यान्पिढ्या घेतात. शहराचा सुनियंत्रित आणि समतोल विकास होणे ही गरज होती. पण काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निष्क्रियतेमुळे तसे झाली नाही. आम्ही सत्तेत येताच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सक्रीय प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यामतून आम्ही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटींचा निधी मंजूर करू घेतला. प्रस्तावित मेट्रो मार्गाप्रमाणेच आयटी क्षेत्राची गरज ओळखून केवळ १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मागार्ला मंजुरी दिली. विकास आराखडा, पीएमआरडीए यांच्या बाबतीतही तेच झाले. क्षुल्लक गोष्टींचे राजकारण करून १० ते १५ वर्षे हे प्रकल्प त्यांनी रखडवले होते. आम्ही त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून त्याला मूर्तरूप दिले. हे विकासाचेच द्योतक म्हणावे लागेल.पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज ओळखून पुरंदरमध्ये सुसज्ज विमानतळ येत्या काही वर्षांत सज्ज होईल. शेतकऱ्यांचे यामध्ये कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर व नितीन गडकरी यांच्या समवेत माझी ठोस चर्चा झाली असून आता लोहगाव विमानतळाचा प्रश्नही मार्गी लागेल.शहरात कचरा निर्मुलनाच्या सक्षम सुविधा राबविण्यात प्रशासन व राज्यकर्त्यांना अपयश आल्याने कचरा प्रश्न पेटल्याचे सांगून बापट म्हणाले, ‘‘त्यामुळे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी तातडीने बैठक बोलावून शहरातील कचरा शहरातच जिरवला जावा, असे आदेश प्रशासनाला दिले. यातूनच आता शहराच्या विविध भागांत छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. वनविभागाच्या जागेत साकारत असलेला पिंपरी सांडस घनकचरा प्रकल्पही आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात रहिवासी सोसायट्यांसाठी स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. याद्वारे सौरवीजनिर्मिती प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पाची उभारणी करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना शासनाचे अनुदान प्राप्त होईल. पुण्याला यंदाच्या वर्षी प्रथमच पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागला. राजकीय इच्छाशक्ती अभावी पाण्याचे आॅडिट हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. चोवीस तास पाणी हवे असेल तर प्रत्येक थेंबाच्या हिशेबालाही आपल्याला प्राधान्य द्यावे लागेल. मी पालकमंत्री झाल्यावर दीड ते दोन टीएमसी पाणी प्रक्रिया करून शेतीला सोडले. यामुळे तेथील शेतकरी खुश झाला आणि पुणेकरही माझ्यावर नाराज झाले नाहीत. आज पुण्याला पुरवठा जलवाहिन्यांत ३० टक्के पाण्याची गळती आहे. ती रोखण्याबरोबरच पाण्याच्या पुर्नवापर होण्यासाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यावरही आम्ही भर देणार आहे.(प्रतिनिधी)विरोधकांकडून राजकारण‘गुंडांचा पक्ष’ या आरोपावर विरोधकांवर पलटवार करताना ते म्हणाले, ‘आमच्या पक्षात जे आले ते गुंड असे ते म्हणतात. इकडे आले की ते कसे गुंड होतात. त्यांच्याकडे ते सज्जन होते. आमच्याकडे ते आले म्हणून त्यांना दु:ख होते. ते गुंड वाटू लागतात. याच्यातही विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. आम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. विकासाच्या मुद्यावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुणेकरांसाठी आम्ही काय करणार, हे ऐकायला लोक उत्सुक असतात.‘आपआपसांत न भांडता युती करून एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असे जनमानस होते. पण जागावाटपावरून समझोता न झाल्याने युती तुटली. ही युती आम्ही तोडली नसून शिवसेनेने तोडली आहे. याचा फटका शिवसेनेलाच अधिक प्रमाणात बसेल. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे