शहरं
Join us  
Trending Stories
1
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
2
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
3
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
6
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
7
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
8
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
9
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
10
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
11
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
12
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
14
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
15
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
16
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
17
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
18
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
19
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."

पुण्याचा विकास हाच आमचा ध्यास

By admin | Updated: February 19, 2017 04:59 IST

गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी

पुणे : गेल्या दोन वर्षांत केलेली विकासकामे हाच आमचा अजेंडा. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या गलथान कारभारामुळे पुण्याच्या विकासाला ‘खो’ लागला होता. जी कामे त्यांनी १० ते १५ वर्षांत केंद्रात आणि राज्यात सत्ता असतानाही केली नाहीत तीच कामे आम्ही केवळ दोन वर्षांत मार्गी लावून दाखविली, असे पुण्याचे पालकमंत्री गिरीश बापट यांनी सांगितले. प्रचारातील विविध मुद्यांवर ‘लोकमत’शी बोलताना बापट म्हणाले, ‘शाब्दिक कोट्या, आरोप-प्रत्यारोप निवडणुकीपुरते गाजतात पण तुम्ही केलेल्या विकासकामांची दखल लोक पिढ्यान्पिढ्या घेतात. शहराचा सुनियंत्रित आणि समतोल विकास होणे ही गरज होती. पण काँग्रेस- राष्ट्रवादीच्या निष्क्रियतेमुळे तसे झाली नाही. आम्ही सत्तेत येताच पुणे मेट्रो प्रकल्पासाठी सक्रीय प्रयत्न केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनानुसार माझ्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली. समितीच्या माध्यामतून आम्ही पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ९५० कोटींचा निधी मंजूर करू घेतला. प्रस्तावित मेट्रो मार्गाप्रमाणेच आयटी क्षेत्राची गरज ओळखून केवळ १५ दिवसांत मुख्यमंत्र्यांनी हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रो मागार्ला मंजुरी दिली. विकास आराखडा, पीएमआरडीए यांच्या बाबतीतही तेच झाले. क्षुल्लक गोष्टींचे राजकारण करून १० ते १५ वर्षे हे प्रकल्प त्यांनी रखडवले होते. आम्ही त्यासाठी योग्य तो पाठपुरावा करून त्याला मूर्तरूप दिले. हे विकासाचेच द्योतक म्हणावे लागेल.पुण्यासाठी आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज ओळखून पुरंदरमध्ये सुसज्ज विमानतळ येत्या काही वर्षांत सज्ज होईल. शेतकऱ्यांचे यामध्ये कोणतेही नुकसान होऊ दिले जाणार नाही. लोहगाव विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी केंद्रीय मंत्री मनोहर पर्रिकर व नितीन गडकरी यांच्या समवेत माझी ठोस चर्चा झाली असून आता लोहगाव विमानतळाचा प्रश्नही मार्गी लागेल.शहरात कचरा निर्मुलनाच्या सक्षम सुविधा राबविण्यात प्रशासन व राज्यकर्त्यांना अपयश आल्याने कचरा प्रश्न पेटल्याचे सांगून बापट म्हणाले, ‘‘त्यामुळे पालकमंत्री पदाची सूत्रे हाती घेतल्यावर मी तातडीने बैठक बोलावून शहरातील कचरा शहरातच जिरवला जावा, असे आदेश प्रशासनाला दिले. यातूनच आता शहराच्या विविध भागांत छोटे कचरा प्रक्रिया प्रकल्प सुरू करण्यात येत आहेत. वनविभागाच्या जागेत साकारत असलेला पिंपरी सांडस घनकचरा प्रकल्पही आता कार्यान्वित होण्याच्या मार्गावर आहे. येत्या काळात रहिवासी सोसायट्यांसाठी स्वतंत्र्य महामंडळ स्थापन करण्याचा आमचा मानस आहे. याद्वारे सौरवीजनिर्मिती प्रकल्प, रेनवॉटर हार्वेस्टिंग, कचरा व्यवस्थापन प्रकल्प, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प यांसारख्या पर्यावरणपूरक प्रकल्पाची उभारणी करू इच्छिणाऱ्या सोसायट्यांना शासनाचे अनुदान प्राप्त होईल. पुण्याला यंदाच्या वर्षी प्रथमच पाणीटंचाईचा भीषण सामना करावा लागला. राजकीय इच्छाशक्ती अभावी पाण्याचे आॅडिट हा विषय दुर्लक्षित राहिला आहे. चोवीस तास पाणी हवे असेल तर प्रत्येक थेंबाच्या हिशेबालाही आपल्याला प्राधान्य द्यावे लागेल. मी पालकमंत्री झाल्यावर दीड ते दोन टीएमसी पाणी प्रक्रिया करून शेतीला सोडले. यामुळे तेथील शेतकरी खुश झाला आणि पुणेकरही माझ्यावर नाराज झाले नाहीत. आज पुण्याला पुरवठा जलवाहिन्यांत ३० टक्के पाण्याची गळती आहे. ती रोखण्याबरोबरच पाण्याच्या पुर्नवापर होण्यासाठी आवश्यक प्रकल्प उभारण्यावरही आम्ही भर देणार आहे.(प्रतिनिधी)विरोधकांकडून राजकारण‘गुंडांचा पक्ष’ या आरोपावर विरोधकांवर पलटवार करताना ते म्हणाले, ‘आमच्या पक्षात जे आले ते गुंड असे ते म्हणतात. इकडे आले की ते कसे गुंड होतात. त्यांच्याकडे ते सज्जन होते. आमच्याकडे ते आले म्हणून त्यांना दु:ख होते. ते गुंड वाटू लागतात. याच्यातही विरोधकांकडून राजकारण केले जात आहे. आम्ही इतक्या खालच्या पातळीवर जात नाही. विकासाच्या मुद्यावरच निवडणुकीला सामोरे जात आहोत. पुणेकरांसाठी आम्ही काय करणार, हे ऐकायला लोक उत्सुक असतात.‘आपआपसांत न भांडता युती करून एकत्रितपणे निवडणूक लढवावी, असे जनमानस होते. पण जागावाटपावरून समझोता न झाल्याने युती तुटली. ही युती आम्ही तोडली नसून शिवसेनेने तोडली आहे. याचा फटका शिवसेनेलाच अधिक प्रमाणात बसेल. - गिरीश बापट, पालकमंत्री, पुणे