शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारवर निशाणा?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
Staff Gift: कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्यांना दितेय मोठे मोठे फ्लॅट, किंमतही कोट्यवधींमध्ये
4
बांगलादेशात उस्मान हादीनंतर आता NCP नेत्याची हत्या; अज्ञात हल्लेखोराने डोक्यात झाडली गोळी
5
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
6
आयटी ते शेती... भारत-न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराचे नेमके फायदे काय? 'या' गोष्टी होणार स्वस्त
7
"कुटुंबाच्या प्रतिमेसाठी गप्प होतो, पण आता..."; नितेश राणेंच्या पोस्टने महायुतीत धडकी, कणकवलीतील धक्का जिव्हारी?
8
हातावर मेहेंदी, हिरवा चुडा अन् मुंडावळ्या; प्रियदर्शिनी इंदलकरची लगीनघाई? 'तो' फोटो व्हायरल
9
नको असलेला पसारा २०२५ मध्येच सोडा, नवीन वर्षात 'मिनिमलायझेशन'ची सवय लावा
10
ऐन निवडणुकीत महायुती सरकारनं निवडणूक कायद्यात केला महत्त्वाचा बदल; काय परिणाम होणार?
11
YouTube वर १ बिलियन व्ह्यूज आले तर किती पैसे मिळतात? आकडा ऐकून हैराण व्हाल!
12
नोकरी गेली खड्ड्यात, आज राजीनामा देणारच, कारण...; ढसाढसा रडत शिक्षिकेने बनवला Video
13
बिबट्यानंतर आता लांडग्याची दहशत... तीन वर्षाच्या चिमुरड्याला उचलून नेलं; कुठे घडला प्रकार?
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दराचा नवा उच्चांक, चांदीच्या दरात ७,२१४ रुपयांची वाढ; सोन्याच्या दरातही जोरदार तेजी
15
"साजिद अकरमशी माझा कोणताही संबंध नाही"; दहशतवाद्याच्या पत्नीचा मृतदेह स्वीकारण्यास नकार
16
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
17
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
18
'बॉर्डर २'मध्ये दिसणार सुनील शेट्टी आणि अक्षय खन्ना? सनी देओलच्या सिनेमासंदर्भात मोठी अपडेट आली समोर
19
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
20
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
Daily Top 2Weekly Top 5

...तर निवडणुकीवर आमचा बहिष्कार

By admin | Updated: February 2, 2017 03:44 IST

चासकमान धरणातून चालू असलेल्या दुसऱ्या आवर्तनाला विरोध करण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी डेहणे येथे बुधवारी निषेध मेळावा घेतला व आपल्या

डेहणे : चासकमान धरणातून चालू असलेल्या दुसऱ्या आवर्तनाला विरोध करण्यासाठी खेड तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी डेहणे येथे बुधवारी निषेध मेळावा घेतला व आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. पाणी सोडण्यात आल्याने आमची पिके गेल्यातच जमा आहेत. निदान गाईगुरं तडफडून मरणार नाहीत, यासाठी तरी त्वरित पाणी सोडण्याचे बंद करावे, अन्यथा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा वांजळे गावचे शेतकरी विठ्ठल सोळसे यांनी दिला.डेहणे परिसरातील २७ गावांतील शेतकऱ्यांना हे धरण भविष्यात वरदान ठरणार आहे, अशी आशा दाखवण्यात आली. नाममात्र दरात जमिनी संपादित करण्यात आल्या. पण, दुर्दैवाने दर वर्षी शिरूर व खेडच्या पूर्वेकडील सधन शेतकऱ्यांच्या व पुढाऱ्यांच्या दबावाखाली पश्चिम भागातील आदिवासी शेतकऱ्यांचा विचार न करता पाणी सोडले जाते. या वेळी दुसरे आवर्तन फक्त २६ दिवसांच्या अंतराने सोडण्यात आले आहे. दुसऱ्या आवर्तनाने तर डेहणे परिसरात पाण्याने तळ गाठला आहे. या वेळी उपस्थित शेतकऱ्यांनी आपल्या संतप्त भावना व्यक्त केल्या. उपस्थित सर्व शेतकऱ्यांनी हक्काचे पाणी पळवले जाते. त्यावर पश्चिम भागातील शेतकऱ्यांचा अधिकार आहे व त्यासाठी त्वरित आवर्तन बंद करावे, असा ठराव संमत केला. हा ठराव तहसीलदार यांच्याकडे सादर करण्यात येणार आहे. या मोर्चाला पाठिंबा देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य मंगल चांभारे, माजी सभापती अरुण चांभारे, सभापती सुरेश शिंदे, शंकर कोरडे, गवारी गुरुजी, विठ्ठल वनघरे, शिवाजी वाळुंज, धोंडीभाऊ दरेकर, जिल्हा दक्षता कमिटीचे तुकाराम भोकटे आदी उपस्थित होते. मोर्चाचे आयोजन माऊली वाढाणे, अनिल सोळसे, रामदास कोरडे, विठ्ठल सोळसे या तरुण शेतकऱ्यांनी केले. प्रशासनाने आमच्या हक्काचे पाणी आम्हाला द्यावे . वांजाळे गावापर्यंत पाणीसाठा मार्चपर्यंत व किमान एप्रिलमध्ये डेहण्यापर्यंत राहील, असे नियोजन करावे. आता आमच्या जमिनी घेतल्या. पुन्हा पाण्यासाठी धरणात उड्या मारून जीव देण्याची वेळ आणू नका. - शंकर कोरडे, सामाजिक कार्यकर्ते. अस्तरीकरण अपूर्ण आहे. त्यामुळे कालव्यातून पाणी गळती होऊन पाण्याची प्रचंड प्रमाणात नासाडी होत आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्याने त्वरित पाणी सोडण्याचे बंद करावे. प्रस्तावित बुडीत बंधाऱ्यांना मंजुरी देऊन हा प्रश्न कायमचा निकाली काढावा .अरुण चांभारे, माजी सभापती, पुणे जिल्हा परिषद.