शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

...अन्यथा रस्त्यावरच भाजीविक्री करू

By admin | Updated: December 29, 2014 00:43 IST

भोर शहरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांविरोधात मंडईतील भाजीव्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई

भोर : भोर शहरातील अनधिकृत भाजी विक्रेत्यांविरोधात मंडईतील भाजीव्यावसायिकांनी दंड थोपटले आहेत. नगरपरिषदेने त्यांच्यावर कारवाई न केल्यास त्यांच्या विरोधात रस्त्यावरच दुकाने थाटण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. भोर शहरातील रस्त्यावर अनाधिकृतपणे भाजी विक्री करणा-यांमुळे भाजी मंडईत अधिकृतपणे भाजी विक्री करणा-या दुकानदारांचा व्यावसाय होत नसल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. भोर शहरात भाजी विक्रेत्यांसाठी सुमारे २५ वर्षापुर्वी भाजी मंडई उभारण्यात आली होती. मात्र सध्या ही इमारत गळत असुन धोकादायक बनली आहे. यामुळे भाजी विक्रेत्यांनी मंडईच्या बाहेर तातपुरत्या स्वरुपात ताडपत्रीच्या साहयाने स्टॉल उभारले आहेत. मंडईला संरक्षक भिंत नसल्याने मोकाट जनावरांचा अधिक वावर असतो. सर्वत्र कच-याचे ढिग,गवत केरकचरा पडलेला असल्याने या परिसरात दुर्गंधी पसरली असते. या ठिकाणी डांबरीकरण नाही तसेच वीजेचीही सोय नाही. यामुळे रात्री अपरात्री जनावरे भाजी पाला खातात. अनेकदा चो-या ही होतात. अशा वातावरणात व्यावसायिकांना भाजी पाला विकावा लागतो. दरम्यान, भोर शहरात सुमारे २२ ते २५ भाजी विक्रेते महात्मा फुले भाजी मंडईत अधिकृतपणे भाजीपाला विक्री करूण आपला उदरनिर्वाह करतात. मात्र, मगिल दोन ते तीन वर्षांपासुन भोर शहरातील नगरपलिका चौक ते एस टी स्टॉड व नीरा नदीच्या पुलाच्या पलिकडे भोलावडे गावाच्या हद्दीत भर रस्त्यात बसुन अनाधिकृतपणे भाजी विक्री करणा-यांची संख्या वाढली आहे. यामुळे भोर शहरासह ग्रामीण भागातुन येणारे ग्राहकांना ते जवळ पडत असल्याने रस्त्यातच भाजी खरेदी करतात आणी पुन्हा एस. टी.स्टॅडवर जातात. यामुळे भाजी मंडईत भाजी खरेदी करण्यासाठी ग्राहक येत नसल्याने अधिकृतपणे भाजी विक्री करणा-या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. यामुळे अनेकांनी आपला यावसायही बंद केला आहे. भोर नगरपलिकेला याबाबत वारंवार निवेदन देऊनही त्यांनी दुर्लक्ष होत असल्याने नगरपलिकेकडुन पावत्या फाडणा-या ठेकेदाराकडुन या अनाधिकृत भाजी विक्र्रत्यांकडुन जादा पैसे घेऊन त्यांना अभय देत असल्याची चर्चा आहे. यामुळे महात्मा फुले भाजी मंडईतील अधिकृत भाजी विक्री करणारे दुकानदार त्रस्त झाले आहेत. भाजी विक्रीच होत नसल्याने उपासमारीची वेळ त्यांच्यावर आली आहे. रस्त्यावरील अनाधिकृत भाजीपाला विक्रेते बंद करा अन्यथा रस्त्यावर दुकाने मांडून भाजी विक्री करु असा इशारा विक्रत्यांनी दिला आहे.