शहरं
Join us  
Trending Stories
1
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
2
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
3
“सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा”: अजित पवार
4
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
5
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
6
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
7
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
8
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
9
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
10
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
11
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
12
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
13
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
14
Maharashtra Day 2025 Wishes: महाराष्ट्र दिनाच्या हार्दिक शुभेच्छा द्या 'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून, शेअर करा सुंदर शुभेच्छापत्रं!
15
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
16
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
17
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
18
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
19
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)

....अन्यथा ग्रामपंचायतींना टाळे ठोकू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2021 04:11 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शासन निर्णयानुसार २०२०-२१ मधील ग्रामपंचायत व पंचायत समितीचा अखर्चित निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शासन निर्णयानुसार २०२०-२१ मधील ग्रामपंचायत व पंचायत समितीचा अखर्चित निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्याचे आदेश उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सर्व गटविकाास अधिकाऱ्यांना दिले आहेत. या निर्णयामुळे जिल्ह्यातील सर्व दिव्यांग व्यक्ती या योजनेपासून वंचित राहाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दिव्यांगांसाठीचा ५ टक्के निधी वर्ग झाल्यास पुढील परिणामास ग्रामपंचायतींना जबाबदार धरले जाईल आणि अशा ग्रामपंचायतींना टाळे ठोकले जाईल, असा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे देण्यात आला आहे.

कोरोनाच्या संकटामुळे दिव्यांगाच्या हाताला कोणतेही काम नाही. त्यांच्यासमोर रोजगार आणि रोटीचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यांच्या हक्काचा निधी खर्च करणे ग्रामपंचायत व पंचायत समितींना बंधनकारक आहे असे असतानाही वर्षभर वसुली न झाल्याने ग्रामपंचायत तो निधी खर्च करू शकले नाहीत. त्यानंतर ग्रामपंचायतीच्या निवडणुका आल्या. आता गट विकास अधिकारी यांनी पत्र काढून सर्व निधी जिल्हा परिषद खात्यामध्ये वर्ग करण्याचे आदेश ग्रामपंचायतला दिले आहेत. यामुळे अपंगांच्या वर उपासमारीची वेळ येणार आहे. मात्र ज्या ग्रामपंचायती दिव्यांगांचा ५ टक्के निधी जिल्हा परिषदेकडे वर्ग करतील व दिव्यांग बांधवांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवतील, अशा ग्रामपंचायतीवर कारवाई करून पुढील येणाऱ्या परिणामास ग्रामपंचायतीला जबाबदार धरले जाईल, अशा ग्रामपंचायतींना टाळे ठोकण्याचा इशारा प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेतर्फे दिला आहे.

कोरोना काळात शासनाने पंधरा दिवसाचे लॉकडाऊन जाहीर केले आहे. या काळामध्ये शासनाने चुकीचे आदेश काढले आहेत. संचार बंदी असताना दिव्यांगांचा हक्काचा निधी वर्ग केल्याने दिव्यांगांचे फार मोठे नुकसान होणार आहे तरी सर्व दिव्यांग बांधवांनी आपापल्या ग्रामपंचायतला लेखी पत्र देऊन त्वरित निधी खर्च करावयास सांगावे. सर्व दिव्यांग व्यक्तीस ५ टक्के निधी व न्याय मिळावा, अशी मागणी प्रहार संघटनेच्या महिला अध्यक्षा सुरेखा ढवळे यांनी केली आहे.