शहरं
Join us  
Trending Stories
1
शिवसेना-मनसेची ताकद मुंबईत जास्त; राज ठाकरेंच्या दाव्यावर CM फडणवीसांनी आकेडवारीच दिली
2
पहिल्यांदाच सुप्रीम कोर्टासमोर EVM मधील मतमोजणी झाली; पराभूत उमेदवार बनला 'विजयी', गावकरी अवाक्
3
ट्रम्प यांच्या नाकावर टिच्चून आली...! अ‍ॅप्पल, टेस्लानंतर या कंपनीची भारतात एन्ट्री, बिग टेकने घोषणा केली...
4
किश्तवाड येथे धरालीसारखी दुर्घटना, ढगफुटी होऊन आला पूर, १० जणांचा मृत्यू
5
राहुल गांधींवर खोटी साक्ष दिल्याचा आरोप, सावरकरांच्या पणतूने  कोर्टात दिलेल्या अर्जाने अडचणी वाढणार? 
6
गोकुळाष्टमीच्या मराठी शुभेच्छा: Messages, WhatsApp Status ला शेअर करा;कृष्ण भक्तांना द्या हार्दिक शुभेच्छा!
7
सचिन तेंडुलकरहून ५ वर्षांनी मोठी अंजली; आता अर्जुनची होणारी पत्नीही मोठीच...किती आहे अंतर?
8
बाजारात संमिश्र कल! विप्रो-इन्फोसिस वधारले; पण, टाटासह 'या' स्टॉक्समध्ये मोठी घसरण
9
मतदार यादीतून काढलेल्या ६५ लाख लोकांची नावे सार्वजनिक करा; SC चे निवडणूक आयोगाला निर्देश
10
Rapido देणार Zomato, Swiggy ला टक्कर, पोहोचवणार जेवण; काय आहे कंपनीचा प्लान?
11
'अमेरिकाच नाही, संपूर्ण जग तुमचे ऐकेल', गडकरींनी भारत विश्वगुरु बनण्याचा मास्टर प्लान सांगितला
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'मुळे कंपनीची चांदी! शेअरमध्ये १०% वाढ, ३ महिन्यात ६२ टक्के परतावा
13
ट्रम्प यांनी डेड इकॉनॉमी म्हटलेलं, आता अमेरिकेच्याच एजन्सीनं भारताचं रेटिंग केलं अपग्रेड
14
किश्तवाड ढगफुटी: फारुख अब्दुल्ला म्हणाले, "संपूर्ण देशाने देवाकडे प्रार्थना करावी, बचाव कार्यही कठीण!"
15
'लव्ह अँड वॉर', 'अल्फा'च नाही तर आलिया भट आणखी एका सिनेमाच्या तयारित, वाचा सविस्तर
16
गोकुळाष्टमी स्पेशल: गोकुळाष्टमीला करा सात्त्विक चवीचा पंचामृत केक; घरचे बालगोपाळ होतील खुश
17
नाशिकच्या दिंडोरी येथे जोरदार हादरा, २५ किमी परिसरात मोठा आवाज; नागरिक घाबरले, नेमकं काय घडले?
18
"मूल जन्माला घाला आणि ६ लाख रुपये मिळवा"; चीनला टक्कर देत 'या' देशाने केली मोठी घोषणा!
19
इथेनॉलनंतर आता डिझेलमध्ये बायोफ्युएल मिसळणार; गडकरींनी वादाच्या पार्श्वभूमीवर केली घोषणा
20
२ मुलांना घेऊन आईनं मारली नदीत उडी; पतीच्या निधनानंतर दीराशी केले होते लग्न, मात्र...

...अन्यथा न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2021 04:13 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आमची ‘सेलिब्रेशन’ची इंडस्ट्री आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जवळपास वर्षभर कोणतेही मोठे कार्यक्रम झालेले नाहीत. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आमची ‘सेलिब्रेशन’ची इंडस्ट्री आहे. कोरोनाच्या महामारीमुळे जवळपास वर्षभर कोणतेही मोठे कार्यक्रम झालेले नाहीत. या इव्हेंट क्षेत्रावर छोटे-मोठे असे मिळून ८३ टक्के व्यवसाय अवलंबून आहेत. मात्र कोरोनाकाळात या व्यवसायातील तब्बल सहा कोटी लोकांनी रोजगार गमावला आहे. या व्यवसायावर उपजीविका असलेल्या महाराष्ट्रातील जवळपास दीड ते दोन कोटी, तर पुण्यातील आठ ते दहा लाख लोकांवर उपासमारीची वेळ आली आहे. कोरोनापेक्षा जगायचं कसं? असा प्रश्न सर्वांसमोर पडला आहे. कारमध्ये चार जणांना मास्क न लावता परवानगी आहे. मग आमच्या बाबतीत हा दुजाभाव का? असा सवाल पुणे साऊंड इलेट्रिकल्स जनरेटर इव्हेंटस इक्विपमेंटस व्हेंडर, केटरिंग व लॉन्स असोसिएशनने उपस्थित केला आहे. राज्य शासनाने इव्हेंट क्षेत्राला कोरोना नियमांच्या सरसकट चौकटीत न बसवता धोरणात लवचिकता आणावी, अन्यथा आम्हाला न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, असा इशारा असोसिएशनच्या वतीने देण्यात आला आहे.

कोविड-१९ च्या महामारीमुळे जवळपास वर्षभर कोणतेही मोठे कार्यक्रम झालेले नाहीत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लग्न समारंभांना केवळ ५० पन्नास व्यक्तींची परवानगी दिल्याने लॉन्स किंवा बँक्वेट हॉलचे संपूर्ण आर्थिक नियोजन ढासळत आहे. याकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी असोसिएशनतर्फे सनदशीर मार्गाने कोरोनाच्या सर्व नियमांचे पालन करुन सामाजिक अंतर राखत मानवी साखळी करुन आंदोलन केले. आंदोलनानंतर असोसिएशनतर्फे पत्रकार परिषद घेण्यात आली.

---

कोरोनापेक्षा जगायचं कसं असा प्रश्न पडला आहे. बँकेचा ईएमआय भरता येत नाही, बँकेने तगादा लावलाय... आमच्या क्षेत्राला कुणी कर्ज द्यायला तयार नाही. एप्रिल लग्नसराई निर्बंध घातले तर व्यवसाय करायचा कसा? मार्च, एप्रिल, मे हा आमच्या व्यवसायाचा मुख्य हंगाम असतो. या काळात होणाऱ्या व्यवसायावर आमचा आगामी काळ सुखकर जातो. मात्र शासन निर्णयामुळे अनेकांचा रोजगार गेला आहे.

- सिकंदर रमजान शेख (बबलू रमझानी), अध्यक्ष, पुणे साउंड इलेक्ट्रिकल्स जनरेटर इव्हेंट्स इक्विपमेंट्स व्हेंडर असोसिएशन

--

केटरिंग असोसिएशनने भुकेलेल्यांना जेवण दिले आहे. आम्ही खऱ्या अर्थाने कोव्हिड योद्धे आहोत. आमच्या योद्धांचे देखील लसीकरण करावे... राष्ट्रीय सकल उत्पन्नात आमच्या क्षेत्राचा आठ टक्के वाटा आहे. सध्या कोरोनावर उपाययोजना होतीये, लोक बरे होत आहेत. कोरोनाची खबरदारी घेऊन व्यवसाय चालू ठेवण्यास काही हरकत नाही. शासनाचे ५० टक्के उपस्थितीचे लॉजिक समजू शकलेले नाही. त्यामुळे आता न्यायालय हा एकमेव मार्ग दिसत आहे. आगामी काळात शासनाने योग्य भूमिका घेतली नाही तर न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील.

- जी. एस. बिंद्रा आणि किशोर सरपोतदार, विश्वस्त पुणे केटरिंग असोसिएशन महाराष्ट्र