शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
4
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
5
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
6
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
7
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
8
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
9
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
10
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
11
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
12
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
13
मैत्रिणीचे लग्न आटोपून घरी येताना अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार, ९ जणांना अटक
14
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
15
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
16
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
17
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
18
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
19
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे

सेंद्रिय पद्धतीने २१ गुंठ्यांत निघणार १ टन गहू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:10 IST

नारायणगाव येथील शेतकरी रामदास पंढरीनाथ काळे यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे. या गव्हाचे ४० रुपये प्रतिकिलो दराने ४०० ...

नारायणगाव येथील शेतकरी रामदास पंढरीनाथ काळे यांनी गव्हाचे उत्पादन घेतले आहे. या गव्हाचे ४० रुपये प्रतिकिलो दराने ४०० किलो गव्हाचे बुकिंग देखील झाल्याचे काळे यांनी सांगितले आहे. काळे यांनी अगदी गव्हाच्या पेरणीपासून गहू काढणीला येईपर्यंत एकही रासायनिक खत किंवा रासायनिक औषधांचा वापर न करता केवळ सेंद्रिय पद्धतीने हे पीक घेतले आहे. काळे यांनी २१ गुंठे क्षेत्रात ९ किलो गव्हाची पेरणी केली होती.रामदास काळे यांची आई,पत्नी यांच्यासह त्यांनी घरच्या घरीच या गव्हाच्या शेतीची मशागत केली आहे.

रासायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय पद्धतीने केलेल्या शेतीत गव्हाचे उत्पादन कमी मिळणार आहे. मात्र कोणत्याही रासायनिक खत व औषधाशिवाय घेतलेले शुद्ध अन्न म्हणून सेंद्रिय शेतीकडे पाहिले जाते. रासायनिक खते व औषधांचा वापराचा अतिरेक होऊ लागल्याने अनेक शेतकरी आता घरी खाण्यापुरते का होईना पण सेंद्रिय शेती करत असल्याचे चित्र आता दिसत आहे. काळे यांनी पेरणीअगोदर १ ट्रॉली चांगले कुजलेले शेणखत शेतात घातले आहे व त्यानंतर बियाण्याची पेरणी केली आहे. ढगाळ हवामानात वात्सल्यचे दशपर्णी अर्क फवारल्यामुळे मावा व इतर किडींचे चांगले नियंत्रण झाले. गहू १०० टक्के ओंबीमध्ये आल्यानंतर गायीचे कोवळे दुधाची (चीक) फवारणी केली. त्यामुळे गव्हामध्ये अधिकची पौष्टिकता तयार झाली आहे.

"अधिक उत्पादनाची अपेक्षा न ठेवता शेतकऱ्यांनी आरोग्याच्या हिताची शेती करावी. सेंद्रिय शेतीतून उत्पादन जरी कमी मिळत असले तरी किमान घरी खाण्यापुरती तरी शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेती करावी. कमीतकमी क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने उत्कृष्ट उत्पादन घेता येते."

- योगेश जालिंदर डोंगरे, खोडद

रामदास पंढरीनाथ काळे यांनी आपल्या २१ गुंठे क्षेत्रात सेंद्रिय पद्धतीने गव्हाचे उत्कृष्ट उत्पादन घेतले आहे.