शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
3
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
4
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
5
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
6
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
7
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
8
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
9
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
10
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
11
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
12
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
13
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
14
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
15
'स्मार्टफोनपासून दूर राहा आणि पुस्तके वाचा' मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मुलांना सल्ला
16
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
17
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
18
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
19
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
20
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले

जेजुरीतील बीओटीचे काम सुरू करण्याचे आदेश

By admin | Updated: October 1, 2015 01:03 IST

जेजुरीतील बहुचर्चित बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शाळा खोल्या व गाळ्यांचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बांधकाम सभापतींनी दिल्या आहेत.

पुणे : जेजुरीतील बहुचर्चित बीओटी तत्त्वावर बांधण्यात येत असलेल्या शाळा खोल्या व गाळ्यांचे काम पुन्हा सुरू करण्याच्या सूचना बांधकाम सभापतींनी दिल्या आहेत. आज झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत विरोधकांनी याला विरोध केला असून, काम सुरू झाले, तर ते पुन्हा बंद पाडणार, असा इशारा दिला आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, शासनाने २००८ रोजी शासन निर्णय पारित करून जिल्हा परिषदेच्या रिकाम्या जागा ‘बांधा वापरा हस्तांतर करा’ या तत्त्वावर विकास करा, असा आदेश दिला होता. त्यानुसार पुणे जिल्हा परिषदेने ११ प्रकल्प हाती घेणेचे प्रस्तावित केले होते. सर्वसाधारण सभेत चर्चा होऊन प्राथमिकपणे जेजुरी, बिबवेवाडी व शिरूर येथे शाळा, विश्रामगृहे, कर्मचाऱ्यांची निवासस्थाने, कार्यालयीन इमारत आदींची अत्यंत आवश्यकता असल्याने सर्वानुमते ठरवले होते. त्यास शासनाने दि. २.५.२००९ रोजी मंजुरी दिली. त्यानुसार जेजुरी येथील मुख्य चौकात असलेल्या जिल्हा परिषदेच्या जागेतील जुन्या शाळेच्या जागेवर बीओटी तत्त्वावर शाळा वर्गखोल्या व गाळ््यांचे बांधकाम करण्यास २0११ मध्ये मंजुरी मिळाली होती. १२ हजार ४३३.४५ चौरस मीटरमध्ये हे बांधकाम करण्यात येत असून, १६१९.१ लाख रुपये इतका खर्च या प्रकल्पाला होणार आहे. यात रेस्ट हाऊस, मराठी शाळा, कंपाउंड वॉल, लॅन्ड डेव्हलपमेंट, पाण्याची टाकी बांधण्यात येत आहे. यातील १५ ते २० टक्के बांधकामही झाले आहे. मात्र, बीओटी तत्त्वावर हे बांधकाम करण्यास विरोधकांनी विरोध केला होता. तसेच सुरू असलेले काम हे निकृष्ट दर्जाचे होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. त्यानुसार उपअभियंता पुरंदर यांनी कामास भेट देऊन सुरू असलेले काम तांत्रिकदृष्ट्या अयोग्य रीतीने होत असल्याचे पत्र २२ फेबु्रवारी २0१३ रोजी दिले होते. त्यानुसार हे काम बंद ठेवण्यात आले होते. २२ सप्टेंबर २0१५ रोजी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाचे सभापती मंगलदास बांदल यांनी सदर काम सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या. आज जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीत हे काम सुरू करण्यासाठी टिप्पणी मांडण्यात आली होती. मात्र, याला विरोधकांनी तीव्र आक्षेप घेतला. शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य दशरथ काळभोर यांनी हे काम सुरू झाले, तर पुन्हा बंद पाडू, असा इशारा दिला असून, बीओटी तत्त्वावरच हे काम करण्याचा उद्देश काय? जिल्हा परिषद स्वत: ही जागा का विकसित करीत नाही, असा सवालही केला आहे. (प्रतिनिधी)