शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
RSS मुख्यालयावरील हल्ल्याचा सूत्रधार सैफुल्लाचा १९ वर्षांनंतर खात्मा, संघ वर्तुळातून ‘अज्ञात’ व्यक्तीच्या कृतीचे स्वागत
4
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
5
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
6
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
7
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
8
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
9
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
10
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
11
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
12
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
13
शिक्षण घोटाळ्यात नागपूर पोलिसांची एसआयटी स्थापन, अनेक मोठ्या अधिकाऱ्यांचा भांडाफोड होण्याची शक्यता
14
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
15
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
16
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
17
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
18
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
19
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
20
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘ती’ ३० एकर जागा सरकारजमा

By admin | Updated: January 31, 2015 00:20 IST

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ३० एकरांचा संपूर्ण उपबाजार आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने सरकारजमा करण्यात आला

कोरेगाव भीमा / केंदूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ३० एकरांचा संपूर्ण उपबाजार आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने सरकारजमा करण्यात आला. १० वर्षांपूर्वी सरकारकडून बाजार समितीच्या उपयोगासाठी घेतलेल्या या ३० एकर क्षेत्रातील ११ एकर क्षेत्रामध्ये तुकडे पाडून ते भाडेतत्त्वावर देताना अटी व शर्तींचा भंग केल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने ही कारवाई कोरेगाव भीमा मंडलाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी केली. मात्र, बाजार समितीकडून लाखो रुपयांना लिलावात घेतलेल्या १२१ आडत गाळे, ४३ दुकान गाळाधारकांवर व १४८ भूखंडधारकांवर गदा येणार असल्याने आता दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे सन २००७च्या दरम्यान या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बाजार समिती सुरू करण्यात आलेली होती. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमितीची गट नं. ६० मधील सुमारे ३० एकर जमीन सरकारने शेतकरी बाजार, कृषीमाल गोदाम आणि शीतगृहासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली होती. मात्र, बाजार समितीने त्यामधील ११ एकर क्षेत्रात १४८ खातेदारांना २ , ३, ५ गुंठ्यांचे भूखंड पाडून ३० वर्षांच्या कराराने दिले व गुंतवणूकदारांकडून त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तेथील मोकळी जागा गुंतवणूक व व्यवसायाच्या दृष्टीने २० हजार रुपये प्रतिगुंठा, तर तीच जागा सन २०१०मध्ये ३० हजार रुपये प्रतिगुंठा याप्रमाणे १ कोटी ९८ लाख ६० हजार रुपये घेतले व उर्वरित जागेवर १२१ आडत गाळे, ४३ दुकाने, ३ भोजनगृहे व बाजार समितीच्या मुख्य इमारतींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, या बाजार समितीतील आडतदारांचे सुमोरे १२१ गाळे व समोर असलेले ४३ व्यापारी गाळे ५ ते १२ लाखांमध्ये विक्री करण्यात आले होते. या ठिकाणी जनावरांच्या विक्रीचा बाजार ही सुरू करण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांनी जागा प्रदान करताना मात्र त्यात फक्त पणन मंडळाचीच परवानगी घेतली; पण महसूल विभागाची कुठलीच परवानगी घेतली नसल्याने अटी व शर्तींचा भंग केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात चंदन सोंडेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात ८८/२०१० नुसार जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये बाजार समितीने भूखंड पाडताना सक्षम प्राधिकरण म्हणून महसूल विभागाची परवानगी घेणे बंधणकारक असताना तशी कोणतीही परवानगी बाजार समितीने घेतलेली नाही. त्यामुळे बाजार समितीने सदर भखंडवाटपात नियमांचा भंग केल्यामुळे जिल्हाअधिकाऱ्यांनीसदर जमीन सरकारजमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर शर्तभंग जमिनीचा ७/१२ उतारा, जागेचा पंचनामा, ताबा पावती व जागेचा नकाशा यांसह मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड व तलाठी एस. बी. पवार यांनी ७/१२ व फेरफार उताऱ्यावर नोंदवून सरकारजमा केल्याचे सांगितले. (वार्ताहर)