शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
2
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
3
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
4
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
5
दिल्ली-मुंबई एक्स्प्रेस वेवर भीषण अपघात; पिकअपला आग लागल्याने ३ जणांचा होरपळून मृत्यू
6
ऑनलाइन हेल्थ इन्शुरन्स घेताय? 'या' ५ चुका पडतील महागात; तुमचा क्लेम नाकारला जाऊ शकतो!
7
'सरन्यायाधीशांवर चप्पलफेक' यासारखे प्रकार परत घडू नयेत म्हणून सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
8
पाण्याच्या एक-एक थेंबासाठी तरसणार पाकिस्तान; भारतानंतर, आता अफगाणिस्तानचाही मोठा निर्णय
9
साताऱ्यातील ११५ कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात शिंदे कनेक्शन? सुषमा अंधारेंचा उपमुख्यमंत्र्यांच्या भावावर गंभीर आरोप
10
"साताऱ्यातील ड्रग्ज प्रकरणात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे लागेबांधे असल्याने प्रकरण दडपण्याचा प्रयत्न’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा गंभीर आरोप 
11
मोदी सरकार नववर्षाला गोड भेट देणार! १ जानेवारीपासून सीएनजी आणि पीएनजी स्वस्त होणार
12
कुठल्याही क्षणी अटकेची शक्यता असताना माणिकराव कोकाटे पडले आजारी; लीलावती रुग्णालयात दाखल
13
वाल्मीक कराडला जामीन नाकारला; संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडपीठाचा मोठा निकाल
14
Motorola: ६.८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP सेल्फी कॅमेरा आणि बरेच काही; मोटोरोलाचा नवा फोन लॉन्च!
15
भयंकर! लग्नात वाजत होता DJ; १५ वर्षांच्या मुलीला सहन झाला नाही आवाज, हार्ट अटॅकने मृत्यू
16
मार्गशीर्ष शेवटचा गुरुवार २०२५: उंबरठ्यावर करा 'हा' छोटा उपाय; अष्टलक्ष्मीचा मिळेल आशीर्वाद!
17
“किडनी विकावी लागणे शेतकऱ्यांच्या अडचणींची परीसीमा, अतिशय दुर्दैवी”; सुप्रिया सुळेंची टीका
18
'आता निष्पक्ष निवडणुका राहिलेल्या नाहीत', राजदचे खासदार मनोज कुमार झा स्पष्टच बोलले
19
बाजारात सलग तिसऱ्या दिवशी घसरण! टाटा समुहाच्या 'या' कंपनीला सर्वाधिक फटका, IT सेक्टरचा आधार
20
ICC T20 Rankings : तिलक वर्माची उंच उडी! बटलरसह पाकिस्तानच्या साहिबजादा फरहानला फटका
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने ‘ती’ ३० एकर जागा सरकारजमा

By admin | Updated: January 31, 2015 00:20 IST

शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ३० एकरांचा संपूर्ण उपबाजार आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने सरकारजमा करण्यात आला

कोरेगाव भीमा / केंदूर : शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथील ३० एकरांचा संपूर्ण उपबाजार आज जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या आदेशाने सरकारजमा करण्यात आला. १० वर्षांपूर्वी सरकारकडून बाजार समितीच्या उपयोगासाठी घेतलेल्या या ३० एकर क्षेत्रातील ११ एकर क्षेत्रामध्ये तुकडे पाडून ते भाडेतत्त्वावर देताना अटी व शर्तींचा भंग केल्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हाधिकाऱ्यांच्या वतीने ही कारवाई कोरेगाव भीमा मंडलाधिकारी राजेंद्र गायकवाड यांनी केली. मात्र, बाजार समितीकडून लाखो रुपयांना लिलावात घेतलेल्या १२१ आडत गाळे, ४३ दुकान गाळाधारकांवर व १४८ भूखंडधारकांवर गदा येणार असल्याने आता दाद कोणाकडे मागायची, हा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. पिंपळे जगताप (ता. शिरूर) येथे सन २००७च्या दरम्यान या भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी ही बाजार समिती सुरू करण्यात आलेली होती. शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीची उपसमितीची गट नं. ६० मधील सुमारे ३० एकर जमीन सरकारने शेतकरी बाजार, कृषीमाल गोदाम आणि शीतगृहासाठी शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीला दिली होती. मात्र, बाजार समितीने त्यामधील ११ एकर क्षेत्रात १४८ खातेदारांना २ , ३, ५ गुंठ्यांचे भूखंड पाडून ३० वर्षांच्या कराराने दिले व गुंतवणूकदारांकडून त्यामध्ये अनेक शेतकऱ्यांनी तेथील मोकळी जागा गुंतवणूक व व्यवसायाच्या दृष्टीने २० हजार रुपये प्रतिगुंठा, तर तीच जागा सन २०१०मध्ये ३० हजार रुपये प्रतिगुंठा याप्रमाणे १ कोटी ९८ लाख ६० हजार रुपये घेतले व उर्वरित जागेवर १२१ आडत गाळे, ४३ दुकाने, ३ भोजनगृहे व बाजार समितीच्या मुख्य इमारतींचा यामध्ये समावेश आहे. तसेच, या बाजार समितीतील आडतदारांचे सुमोरे १२१ गाळे व समोर असलेले ४३ व्यापारी गाळे ५ ते १२ लाखांमध्ये विक्री करण्यात आले होते. या ठिकाणी जनावरांच्या विक्रीचा बाजार ही सुरू करण्यात आला होता. कृषी उत्पन्न बाजार समिती शिरूर यांनी जागा प्रदान करताना मात्र त्यात फक्त पणन मंडळाचीच परवानगी घेतली; पण महसूल विभागाची कुठलीच परवानगी घेतली नसल्याने अटी व शर्तींचा भंग केल्याबाबत मुंबई उच्च न्यायालयात चंदन सोंडेकर यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विरोधात ८८/२०१० नुसार जनहित याचिका दाखल केली होती. यामध्ये बाजार समितीने भूखंड पाडताना सक्षम प्राधिकरण म्हणून महसूल विभागाची परवानगी घेणे बंधणकारक असताना तशी कोणतीही परवानगी बाजार समितीने घेतलेली नाही. त्यामुळे बाजार समितीने सदर भखंडवाटपात नियमांचा भंग केल्यामुळे जिल्हाअधिकाऱ्यांनीसदर जमीन सरकारजमा करण्याचे आदेश दिलेले आहेत. सदर शर्तभंग जमिनीचा ७/१२ उतारा, जागेचा पंचनामा, ताबा पावती व जागेचा नकाशा यांसह मंडल अधिकारी राजेंद्र गायकवाड व तलाठी एस. बी. पवार यांनी ७/१२ व फेरफार उताऱ्यावर नोंदवून सरकारजमा केल्याचे सांगितले. (वार्ताहर)