शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

अतिक्रमण हटविण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

By admin | Updated: July 1, 2015 23:40 IST

मंदिर परिसर व शहरातील प्रमुख पालखी प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून राबवण्यात येत आहे.

आळंदी : मंदिर परिसर व शहरातील प्रमुख पालखी प्रदक्षिणा मार्गावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम गेल्या तीन दिवसांपासून राबवण्यात येत आहे. मात्र, प्रथम शहरातील मोठ्या प्रमाणात असलेली अनधिकृत बांधकामे हटवा व मगच आमची दुकाने हटवा, असा पवित्रा घेत मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांनी दुकाने पाडण्यास तीव्र विरोध दर्शविला. त्यामुळे पुढील कार्यवाहीला ब्रेक द्यावा लागला. येथील नगर प्रदक्षिणा मार्गावरील पालिकेने बांधलेले मिनी व्यापारी संकुल पाडल्याने प्रदक्षिणा रस्त्याने मोकळा श्वास घेतला असल्याने याबाबत नागरिकांनी समाधान व्यक्त केले. मात्र, शहरातील अनेक ठिकाणी व्यापाऱ्यांच्या दुकानापुढील वाढलेले पत्र्याचे शेड, ओटा याबाबी तशाच दिसून येत आहेत, तर काहींनी समंजसपणे हे अतिक्रमण काढून घेत न.प. च्या कार्यवाहीला प्रतिसाद दिला.दरम्यान, बुधवारी सकाळी मंदिर परिसरात पूजेचे साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे शेड पाडण्यासाठी अतिक्रमणविरोधी पथक दाखल होताच एकत्र येऊन विरोध दर्शविला. गेल्या अनेक वर्षांपासून आम्ही या दुकानाचे भाडे सर्व करासहीत भरत आहोत. मग आम्ही अतिक्रमण केले कसे म्हणता येईल, आम्ही भाडेकरू आहोत. राष्ट्रीय फेरीवाला धोरणानुसार व हा परिसर आळंदी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात येत असल्यामुळे आम्हा बाधित होणाऱ्या व्यापाऱ्यांसाठी अगोदर मंदिर परिसरातील अन्य पर्यायी जागेत पुनर्वसन करा व मगच आमच्या दुकानाचे शेड तोडा, असा खंबीर पवित्रा व्यापाऱ्यांनी घेतला. शहरातील मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामावर कसलीच कार्यवाही न करणाऱ्या मुख्याधिकाऱ्यांनी प्रथम ही अनधिकृत बांधकामे तोडावीत, मगच आमच्या लहान व्यापाऱ्यांची दुकाने तोडावीत व याकामी त्यांनी प्रत्यक्ष कार्यवाहीत भाग घेऊन आपली धडक मोहीम यशस्वी करून दाखवावी, अशीही मागणी काही व्यापाऱ्यांनी केली. या वेळी संतापलेल्या व्यापाऱ्यांनी बुलडोझरसमोर चक्क आडवे होण्याची तयारी ठेवून बुलडोझरपुढे बसून राहिल्याने कार्यवाहीत अडथळा निर्माण झाला.मुख्याधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दर्शविणाऱ्या व्यापाऱ्यांशी त्यांची भेट होऊ शकली नाही; कारण विभागीय आयुक्तांच्या दौऱ्याची तयारी करीत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. मात्र, त्यानंतर व्यापाऱ्यांचा वाढता विरोध लक्षात घेऊन पथकाने दिवसभराची कार्यवाही स्थगित केली.शहरातील पालिकेच्या जागा प्रथम मोकळ्या करण्यासाठी आम्ही हे अतिक्रमण काढून टाकण्याची मोहीम राबवत आहोत. सद्य:स्थितीत मंदिर परिसर मोकळा करण्याचे वरिष्ठांचे आदेश असल्याने ही कार्यवाही करणे आवश्यक आहे. जेव्हा पालिकेकडे तशी पर्यायी जागा उपलब्ध होईल तेव्हा मंदिर परिसरातील व्यापाऱ्यांचे पुनर्वसन शक्य आहे.- विनायक औंधकर, मुख्याधिकारी.शहरातील अनेक अनधिकृत बांधकामे पाडण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही ती का पाडली जात नाहीत, त्याचे अगोदर उत्तर द्या. - नंदकुमार कुऱ्हाडे