शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

पुनर्विकास प्रकल्पाला विरोधच, सर्वसाधारण सभेत विरोधात ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 10, 2017 02:19 IST

गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पैसे भरून गाळे घेण्याची मानसिकता दलालांची नाही

पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या प्रस्तावित पुनर्विकास प्रकल्पांतर्गत पैसे भरून गाळे घेण्याची मानसिकता दलालांची नाही, आडत्यांचे प्रस्थापित धंदे बंद करून त्यांना विस्थापित करू नका, बाजार समितीने सध्या गाळ्यातील वाढीव जागेची वाजवी रक्कम घेऊन गाळे द्यावेत, जागा उपलब्ध करून देऊन नव्याने मार्केट यार्डाची उभारणी व्हावी, आदी मागण्यांसह विविध सूचनांचा पूर गुरुवारी मार्केट यार्डातील शेतकरी निवास येथे आयोजित आडत्यांच्या बैठकीत निघाला. या वेळी बाजार समितीच्या वतीने प्रस्तावित करण्यात आलेला ७५० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पास आडत्यांनी एकमताने ठराव करत विरोध दर्शविला. परिणामी, बाजार समिती प्रशासक मंडळाला हा प्रकल्प गुंडाळावा लागणार का, अशी चर्चा सुरू झाली आहे.मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागातील मंडईचा प्रस्तावित ७५० कोटींच्या पुनर्विकास प्रकल्पावर चर्चा करण्यासाठी आडते असोसिएशन सर्वसाधारण सभेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी, बाजार समिती प्रशासक मंडळांच्या पदाधिकºयांकडून प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले. पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप खैरे, उपसभापती भूषण तुपे, आडते असोसिएशनचे अध्यक्ष विलास भुजबळ यांसह विविध पदाधिकारी तसेच आडते यादरम्यान उपस्थित होते.मार्केट यार्डातील भाजीपाला व फळ विभागाच्या इमारतीच्या काही भागास तीस ते पस्तीस वर्षे पूर्ण होत आहेत. त्यामुळे समिती प्रशासनाने येथील सर्व गाळे पाडून नव्याने उभारण्यासाठी हालचाली सुरू केल्या होत्या. या प्रकल्पास पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी काही दिवसांपूर्वी तत्त्वत: मान्यता देत बाजार समितीने यात लक्ष द्यावे, असे देशमुख यांनी सांगितलेहोते.प्रशासनाने आडत्यांना विचारात न घेता संबंधित प्रकल्पाचा आराखडादेखील तयार करून आडते असोसिएशनच्या पदाधिकाºयांना दाखविला होता. प्रकल्पासाठी आडत्यांना आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने आडते असोसिएशनने त्यावर चर्चा न करता निर्णय घेणे टाळले होते. अखेर गुरुवारी आडत्यांच्या सर्वसाधारण सभेत हा विषय मांडण्यात आला.