शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

भामा आसखेडचे पाणी शहराच्या अन्य भागास देण्यास विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:29 IST

पुणे : नगररोड परिसरातील सर्वच भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय लष्कर, वारजे जलकेंद्रासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणातून होणारा पाणी पुरवठा ...

पुणे : नगररोड परिसरातील सर्वच भागातील पाणी पुरवठा सुरळीत झाल्याशिवाय लष्कर, वारजे जलकेंद्रासोबतच महाराष्ट्र जीवन प्राधीकरणातून होणारा पाणी पुरवठा बंद करून अन्यत्र वळवू नये़ तसेच भामा आसखेडचे पाणी अन्य भागात नेऊन, पुन्हा नगररस्ता परिसराला पाणी टंचाईच्या खाईत लोटू नये़ तसे केल्यास त्याला आमचा विरोध राहिल असे पत्र धानोरी येथील नगरसेवक अनिल उर्फ बॉबी टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना दिले आहे.

नगररोड परिसराला सध्या दररोज १९० एमएलडी पाणी पुरवठा होत असतानाही दिवसांतून एकचवेळ आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. नव्याने सुरू होत असलेल्या भामा आसखेड प्रकल्पातूनही साधारण २०० एमएलडी पाणी दररोज मिळणार आहे. यानुसार नगररोड परिसरातील धानोरी, कळस, टिंगरेनगर, येरवडा, विमाननगर, वडगावशेरी, खराडी, चंदननगर परिसराला पाणी पुरवठा करण्यासाठी आखण्यात आलेल्या भामा आसखेड पाणी पुरवठा प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. येत्या आठवड्याभरात या योजनेचे उदघाटन होउन प्रत्यक्ष पाणी पुरवठाही सुरु होईल़ परंतु, प्रत्यक्ष पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच आत्तापासूनच वानवडी, हडपसर परिसरातील नगरसेवकांकडून भामा आसखेडचे पाणी त्यांच्या भागाला मिळावे अशी मागणी जोर धरू लागली आहे.

या पार्श्वभूमीवर नगरसेवक अनिल टिंगरे यांनी महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन भामा आसखेडचे पाणी अन्य भागास देण्यास थेट विरोध दर्शविला आहे. तसे केल्यास वेळप्रसंगी व्यापक जनआांदोलनही उभारू़ असा इशाराही टिंगरे यांनी या पत्राव्दारे दिला आहे़

-----------------------