शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
2
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
3
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
4
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
5
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
6
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
7
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
8
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
9
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
10
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
11
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
12
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
13
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
14
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
15
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
16
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
17
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
18
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
19
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
20
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स

अधिकाऱ्यांसमोरच ग्रामसेवकांत हाणामारी

By admin | Updated: May 1, 2016 02:50 IST

जुन्नर तालुक्यात मोठी समजली जाणाऱ्या एका ग्रामपंचायतीमध्ये दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये जोरात हाणामारी झाल्याने याबाबत आज दिवसभर चर्चा सुरू होती. विशेष

नारायणगाव : जुन्नर तालुक्यात मोठी समजली जाणाऱ्या एका ग्रामपंचायतीमध्ये दोन ग्रामविकास अधिकाऱ्यांमध्ये जोरात हाणामारी झाल्याने याबाबत आज दिवसभर चर्चा सुरू होती. विशेष म्हणजे ही हाणामारी लेखापरीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांसमोर झाल्याने चर्चेला अजून उधाण आले. याबाबत अद्याप पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही. ही बाब सामंजसपणे मिटविण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य व प्रतिष्ठित नागरिक प्रयत्न करीत आहेत. जुन्नर तालुक्यात अग्रगण्य असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये सालाबादप्रमाणे लेखापरीक्षण सुरू आहे. हे लेखापरीक्षण अधिकारी करत असताना ग्रामपंचायतमध्ये तत्कालिन ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायतीमध्ये आला व त्याने सध्या कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला पूर्वी झालेल्या कामांच्या एमबीबाबत वाद सुरू केला. हा वाद विकोपाला गेला व तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याने सध्या कार्यरत असलेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याला लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या वेळी उपस्थित असलेले ग्रामपंचायत कर्मचारी व लेखापरीक्षणासाठी आलेल्या अधिकाऱ्यांनी दोघांना बाजूला करून वाद-विवाद थांबविण्याचा प्रयत्न केला. मात्र, दोघांमध्ये शिवीगाळ व खडाजंगी सुरूच होती. या ग्रामपंचायतीच्या तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याच्या कारकिर्दीमध्ये काही विकासकामे झाली. त्या विकासकामांची एमबी केली नसताना रक्कम अदा करण्यात आल्याने विद्यमान ग्रामविकास अधिकाऱ्याने याबाबत तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्यास जाब विचारला, कोणतेही रेकॉर्ड सापडत नसल्याने सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याने माहिती मागितली. त्या दोघांमध्ये कालदेखील वाद झाला होता. (वार्ताहर)या वादातून तत्कालिन ग्रामविकास अधिकाऱ्याने सध्याच्या ग्रामविकास अधिकाऱ्याची माफी मागून विषय संपविला होता. त्यानंतर आज दोघांमध्ये त्याच विषयावर वाद होऊन हाणामारीपर्यंत प्रकरण गेल्याने कामाच्या एमबीमध्ये काहीतरी दडलं असल्याची चर्चा सर्वत्र सुरू होती. मारहाणीनंतर विद्यमान ग्रामविकास अधिकारी ग्रामपंचायत सोडून घरी निघून गेला. दिवसभर त्यांचे सेलफोन बंद होते. त्यामुळे त्यांचेकडून अधिकृत प्रतिक्रिया मिळू शकली नाही. या ग्रामपंचायतीची दप्तर तपासणी नुकतीच झालेली आहे. या ग्रामपंचायतीच्या पाच ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गैरव्यवहाराचा ठपकादेखील ठेवण्यात आलेला आहे. यापूर्वी सन २०१३ मध्ये झालेल्या दप्तर तपासणीमध्ये या दोन्ही ग्रामविकास अधिकाऱ्यांवर गैरव्यवहार केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. या प्रकरणातूनच ही मारमारी झाल्याची गरमा गरम चर्चा परिसरात सुरू आहे. या ग्रामपंचायतीच्या गावातील यात्रा दोन-तीन दिवसांवर येवून ठेपली असतानाच या मारहाणीमुळे ही ग्रामपंचायत चर्चेत आलेली आहे. हे दोन्ही ग्रामविकास अधिकारी मारहाणीच्या प्रकरणाबाबत पोलीस ठाण्यात तक्रार करणार किंवा संघटनेच्या माध्यमातून झालेल्या हाणामारीवर पांघरून घालणार काय? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.