शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

पुरातत्त्व क्षेत्रात वाढताहेत करिअरच्या संधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:28 IST

भारतीय पुरातत्त्व संशोधनाच्या पद्धतीस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, देशभरातील पुरातत्त्वीय स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात संग्रहालय असावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जुन्या वास्तूंचे व्यवस्थापन व संवर्धन करण्याचा कल वाढत चालला आहे.

भारतीय पुरातत्त्व संशोधनाच्या पद्धतीस आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यता मिळाली असून, देशभरातील पुरातत्त्वीय स्थळे पर्यटनाच्या दृष्टीने विकसित केली जात आहेत. तसेच प्रत्येक जिल्ह्यात संग्रहालय असावे, अशी भूमिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर केली आहे. त्याचप्रमाणे जुन्या वास्तूंचे व्यवस्थापन व संवर्धन करण्याचा कल वाढत चालला आहे. महाराष्ट्रासह देशभरात सांस्कृतिक वारसा जपण्याचे काम मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना पुरातत्त्व क्षेत्रात करिअरच्या संधी वाढतायेत, असे डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वसंत शिंदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील इनामगाव येथे डेक्कन कॉलेजने १९६८मध्ये उत्खननाचे काम हाती घेतले होते. पुढे पुरातत्त्व अभ्यासक एम. के. ढवळीकर यांनी उत्खननाच्या क्षेत्रातील नवीन संकल्पनांच्या आधारे येथे काम सुरू केले, असे नमूद करून डॉ. वसंत शिंदे म्हणाले, महाराष्ट्रातील आद्य शेतकºयांचे ठिकाण म्हणून इनामगावकडे पाहिले जाते. डोळ्यांनी न दिसणाºया कणांचा व जळालेल्या धान्यांचा आणि लहान मण्यांचा अभ्यास करण्यासाठी नवीन तंत्र वापरण्यात आले. उत्खननात मिळालेल्या वस्तूंचा तेथील स्थळाशी असणारा संबंध तपासण्यात आला. पूर्वी सुमारे ३५0 वर्षांपूर्वीच्या काळातील पुरावे मिळत नाहीत, अशी धारणा होती. मात्र, इनामगाव येथील शास्त्रशुद्ध पद्धतीने केलेल्या संशोधनामुळे ही धारणा चुकीची ठरली. आधुनिक व शास्त्रीय पद्धतीने केलेल्या संशोधनामुळे भूशास्त्रज्ञांकडून जमिनीचा उतार, हवामानाची स्थिती समजू शकली. या संशोधनासाठी वनस्पतिशास्त्राचा समावेश प्रथमच करण्यात आला. त्यामुळे जळालेल्या धान्याच्या कणांचा व आद्य शेतकºयांच्या शेती पद्धतीचा अभ्यास तसेच प्राण्यांचा आहार यांसह रसायनशास्त्राच्या आधारे अनेक गोष्टींचा अभ्यास करता आला. त्यामुळे हे उत्खनन आधुनिक उत्खननाचे उत्कृष्ट उदाहरण ठरले.शिंदे म्हणाले, गुजरात मधील पादरी या ठिकाणी हडप्पन लोकांचा काळ इ.स. २ हजार ५00 असल्याचा समज होता. मात्र, या उत्खननात सिंधू संस्कृतीचा इ.स.पूर्व 4000 मागे जाणारा काळ शोधून काढला. त्याचप्रमाणे राजस्थानमधील मेवाड या ठिकाणी शेतीची सुरुवात बाहेरील लोकांनी येऊन केली अशी धारणा होती. मात्र, प्राप्त पुराव्यांवरून भटकंती करून शिकार करण्याची अवस्था होती तेव्हापासून शेतीस सुरुवात झाली असे दिसून आले, त्यामुळे महाराष्ट्रासह देशभरात व देशाबाहेर पुरातत्त्व क्षेत्रात महत्त्वाचे काम सुरू आहे.सध्या पुरातत्त्व अभ्यासाविषयी असणारे गैरसमज दूर करण्याचे काम सुरू असून, या विषयाचा अभ्यास का करावा, याचा प्रचार- प्रसार केला जात आहे. देशाची प्रगती करण्यासाठी देशाचा इतिहास माहीत असणे आवश्यक आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना या क्षेत्रात करिअर करण्याच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.महाराष्ट्रासह देशभरात अनेक महत्त्वाची पुरातत्त्व स्थळे आहेत. राज्य व केंद्र शासनाकडून ही स्थळे पर्यटकांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच प्रत्येकाने आपल्या संस्कृतीच्या वारश्याचे जतन केले पाहिजे. केवळ केंद्र किंवा राज्य शासन अथवा एखादे विद्यापीठ पुरातन ठेव्यांचे जतन करू शकत नाही. स्थानिक लोकांना या कामात सामावून घेतल्याशिवाय हे काम होऊ शकत नाही. त्यामुळे डेक्कन कॉलेजच्या वतीने केल्या जाणाºया प्रत्येक उत्खननाच्या ठिकाणी राहणाºया नागरिकांचेप्रबोधन करतो, असेही त्यांनीसांगितले. उत्खननाच्या क्षेत्रात गुणवत्तापूर्ण काम करणाºयांना महाराष्ट्रासह देशभरात निधीची कमतरता नाही. प्रत्यकाला या संदर्भातील संशोधन प्रस्ताव सादर करता येतात. शासनाकडे निधी आहे, मात्र योग्य विषयातील संशोधनालाहा निधी दिला जातो; मात्र योग्य संशोधक पुढे येत नाहीत.महाराष्ट्रासह देशभरातील शैक्षणिक संस्थांमध्ये पुरातत्त्वविषयक अभ्यासक्रम शिकवण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे डेक्कन कॉलेजमधील विद्यार्थी आता प्राध्यापक म्हणून अनेक ठिकाणी रुजू होत आहेत. त्यामुळे या क्षेत्रात करिअरच्या अनेक संधी वाढत चालल्या आहेत, असेही शिंदे यांनी नमूद केले.