शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
3
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
4
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
5
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
6
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
7
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
8
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
9
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
10
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
11
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
12
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
13
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
14
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
15
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...
16
ट्रम्प यांच्या धमक्यांचा परिणाम; रशियाकडून भारताला होणारा तेल पुरवठा झाला कमी, नव्या पुरवठादाराचा शोध घ्यावा लागणार?
17
वर्षभरापासून सेलिनाचा भाऊ दुबईच्या तुरुंगात कैद, भारत सरकारकडे मागितली मदत; प्रकरण काय?
18
हर'मन' जीत लिया! Will to Win मुळे जगज्जेतेपदाचं स्वप्न साकार, आता थांबायचं नाय...
19
५० लाखांचं पॅकेज असूनही दुःखी; कितीही कमावले तरी 'ते पुरेसे' का वाटत नाही? चार्टर्ड अकाउंटंटची पोस्ट Viral!
20
Tejashwi Yadav : "प्रत्येक महिलेला ३० हजार, शेतकऱ्यांना बोनस, मोफत वीज..."; तेजस्वी यादव यांच्या मोठ्या घोषणा

पाऊस सुरू झाल्याने भाताच्या रोपांना जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:08 IST

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या लागवडीला ...

भोर : भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांनी धूळवाफेवर पेरलेल्या भाताच्या रोपांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे शेतकऱ्यांनी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र मागील १२ ते १५ दिवसांपासून पावसाने उघडीप दिल्याने भाताच्या लावण्या रखडल्या होत्या. भाताची रोपे पाऊस नसल्यामुळे पिवळी पडली होती. त्यामुळे शेतकरी पावसाची आतुरतेने वाट पाहात होते. आज दुपारपासून पाऊस सुरू झाल्याने रोपांना जीवदान मिळणार असून, रखडलेल्या भात लागवडी पुन्हा सुरू होणार आहेत. यामुळे शेतकरी आनंदात आहेत.

भोर तालुक्यात पश्चिम व पूर्व असे दोन भाग पडत असून, पश्चिम भागात निरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोरे तर, भाटघर धरण भागातील भुतोंडे व वेळवंड खोऱ्यात महुडे खोरे, आंबवडे खोरे भागात मे महिन्यात दरवर्षी वळवाचे पाऊस झाल्यावर धूळवाफेवर भात पिकाची पेरणी करतात. १२ जूननंतर झालेल्या पावसामुळे भाताच्या बियाणांची उगवण चांगली झाली होती. त्यामुळे पश्चिम पट्यातील निरादेवघर धरण भागातील हिर्डोशी खोऱ्यातील शेतकरी भाताच्या लागवडीला सुरवात केली होती. मात्र, मागील १५ दिवसांपासून पाऊस गायब होऊन चक्क ऊन पडले आहे. त्यामुळे भाताच्या लागवडी रखडल्या होत्या आणि लावलेले भात वाळायला सुरवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला होता.

दरम्यान, जवळजवळ १५ दिवसांच्या विश्रांतीनंतर आज दीड वाजता पावसाला सुरवात झाली असून, असाच पाऊस कायम राहिल्यास भोर तालुक्याच्या पश्चिम भागातील भाताच्या रखडलेल्या लागवडी पुन्हा सुरू होतील आणि पावसाआभावी भाताची रोपे पिवळे पडू लागली होती. मात्र, पाऊस सुरू झाल्याने भाताच्या रोपांना जीवदान मिळणार आहे.

तालुक्याचे पूर्व भागातील पुणे-सातारा महामार्गावरील आजूबाजूची गावे, भोंगवली भागातील गावे, विसगाव खोरे भागात भाताच्या बियाणांची पेरणी केली असून, भाताच्या रोपांची उगवण झाली आहे. मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्यावर भाताची लागवड करतात. मात्र, सध्या पाणी नसल्याने माळरानावरील तरवे करपू लागले आहेत. पावसाची परिस्थिती अशीच राहिल्यास दुबार पेरणीचे संकट येऊ शकत होते. मात्र, पाऊस सुरू झाल्याने भाताच्या लागवडी सुरू होणार आहेत.

भोर तालुक्यात खरीप पिकाखालील क्षेत्र २० हजार हेक्टर असून, भात हे प्रमुख पीक असून, सुमारे ७४०० हेक्टरवर भाताची लागवड केली जाते. ५० हेक्टवर भाताच्या रोपांची पेरणी केली होती. भात हे प्रमुख पीक असून, यात हळव्या आणि गरव्या जातींच्या भाताची लागवड केली जात असून, गरव्या जातीत इंद्रायणी, बासमती, आंबेमोहर, पुसा बासमती तामसाळ, हळवे बारीक या जाती तर हळव्या जातीत रत्नागिरी २४, कर्जत १८४, सोनम इंडम फुले राधा या जातींच्या भाताची लागवड केली जाते. हळव्या जातीचे भात पीक ९० ते १०० दिवसांत तयार होते आणि त्याला पाणी कमी लागते. तर गरव्या जातीचे भात १०० ते १२० दिवसांत तयार होते. त्याला पाणी अधिक प्रमाणात लागते. तालुक्यात इंद्रायणी जातीच्या तांदळाला सर्वाधिक मागणी असून, भोर तालुक्यात ८० ते ९० टक्के इंद्रायणी भाताचीच सर्वाधिक लागवड केली जाते.