शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
"मला ही भूमिका साकारायची...", आमिर खानने दिली 'महाभारत' प्रोजेक्टची हिंट, सुरु करणार काम
4
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
5
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
6
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
7
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
8
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
9
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
10
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
11
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
13
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
14
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
15
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! भारताचा सुस्पष्ट संदेश; आता पाकिस्तानने चूक केल्यास...
16
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
17
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
18
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
19
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  

आठवडाभर पुरेल एवढेच पाणी

By admin | Updated: June 26, 2017 03:38 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अजून आठ दिवस पावसाने दडी मारली, तर मंचरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला मागील वर्षी जून महिन्यात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. मागील वर्षाचा अनुभव घेता ग्रामपंचायतीने यावर्षी चांगली तयारी करून ठेवली आहे.मंचर शहराला सुलतानपूर येथून पाणीपुरवठा होतो. तेथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी मंचर शहराला पुरविले जाते. मागील वर्षी पाऊस लांबला होता. घोडनदीपात्र अक्षरश: कोरडे पडले होते. त्या वेळी ग्रामपंचायत प्रशासनाला पंधरा दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. सुलतानपूर येथील बंधारा कोरडा पडल्यावर वडगाव काशिंबेग बंधाऱ्यातून पाणी आणले ते पाणी संपल्यावर पद्मावती कुंडावर मोटारी लावून ते पाणी कसेबसे बंधाऱ्यात आणून दोन दिवसाआड थोडासा पाणीपुरवठा करता आला. सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामपंचायत प्रशासन अक्षरश: नदीवर ठाण मांडून होते.यावर्षी परिस्थिती काहीशी बरी आहे. मागील वर्षी दमदार पाऊस पडल्याने घोडनदीला शेवटपर्यंत पाणी वाहत होते. शिवाय मॉन्सूनच्या पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावली आहे. धरणातून कालव्यांना नुकतेच पाणी सोडले होते. त्यामुळे नदीपात्रात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. बहुतेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढले आहेत. नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावर आहे. सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर मंचरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.