शहरं
Join us  
Trending Stories
1
Ujjwal Nikam MP: उज्ज्वल निकम यांचे खासदारकीचे स्वप्न अखेर पूर्ण! राष्ट्रपतींकडून राज्यसभेवर चार जणांची नियुक्ती
2
Air India Plane Crash : विमानाचे इंजिन पायलटमुळे बंद पडले की यांत्रिक बिघाडामुळे? एअर इंडियाच्या अपघाताच्या अहवालावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले
3
'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान भारतावर अणुहल्ल्याची तयारी करत होता? शाहबाज शरीफ यांनी दिले उत्तर
4
Delhi Accident: भरधाव कारने फूटपाथवर झोपलेल्या पाच जणांना चिरडले, चालक होता नशेत
5
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
6
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
7
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
8
"जीव घेतलात तरी मराठी बोलणार नाही", प्रसिद्ध अभिनेता बरळला, म्हणाला- "मी घाबरत नाही..."
9
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
10
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
11
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
12
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
13
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
14
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
15
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
16
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
17
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
18
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
19
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
20
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!

आठवडाभर पुरेल एवढेच पाणी

By admin | Updated: June 26, 2017 03:38 IST

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमंचर : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात केवळ आठवडाभर पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. अजून आठ दिवस पावसाने दडी मारली, तर मंचरकरांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे. ग्रामपंचायत प्रशासनाला मागील वर्षी जून महिन्यात पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. मागील वर्षाचा अनुभव घेता ग्रामपंचायतीने यावर्षी चांगली तयारी करून ठेवली आहे.मंचर शहराला सुलतानपूर येथून पाणीपुरवठा होतो. तेथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यातील पाणी मंचर शहराला पुरविले जाते. मागील वर्षी पाऊस लांबला होता. घोडनदीपात्र अक्षरश: कोरडे पडले होते. त्या वेळी ग्रामपंचायत प्रशासनाला पंधरा दिवस पाणीपुरवठा करण्यासाठी मोठी कसरत करावी लागली होती. सुलतानपूर येथील बंधारा कोरडा पडल्यावर वडगाव काशिंबेग बंधाऱ्यातून पाणी आणले ते पाणी संपल्यावर पद्मावती कुंडावर मोटारी लावून ते पाणी कसेबसे बंधाऱ्यात आणून दोन दिवसाआड थोडासा पाणीपुरवठा करता आला. सरपंच दत्ता गांजाळे व ग्रामपंचायत प्रशासन अक्षरश: नदीवर ठाण मांडून होते.यावर्षी परिस्थिती काहीशी बरी आहे. मागील वर्षी दमदार पाऊस पडल्याने घोडनदीला शेवटपर्यंत पाणी वाहत होते. शिवाय मॉन्सूनच्या पावसाने सुरुवातीला चांगली हजेरी लावली आहे. धरणातून कालव्यांना नुकतेच पाणी सोडले होते. त्यामुळे नदीपात्रात बऱ्यापैकी पाणीसाठा आहे. बहुतेक कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे ढापे काढले आहेत. नदीतून वाहणाऱ्या पाण्याचा प्रवाह बंद होण्याच्या मार्गावर आहे. सुलतानपूर येथील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यात आठ दिवस पुरेल एवढा पाणीसाठा शिल्लक आहे. आठ दिवसांत पाऊस पडला नाही तर मंचरकरांना पाणीटंचाईचा सामना करावा लागेल.