शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड! आदित्य ठाकरे-देवेंद्र फडणवीस एकाच वेळी एकाच हॉटेलमध्ये, बंद दाराआड चर्चा?
2
लोकसभेत दारुण पराभव, मग विधानसभेत दमदार 'कमबॅक' कसा? महायुतीच्या नेत्याने सांगितलं गुपित
3
धक्कादायक बातमी! बुधवार पेठेतून ५ बांगलादेशी महिलांना पकडले; देशात होते अवैध वास्तव्य
4
रत्नागिरी: आरेवारे येथे लाटांचा अंदाज न आल्याने समुद्रात बुडून तीन बहिणींसह चौघांचा मृत्यू
5
बाबा ताजुद्दीन उरूस: नागपूर रेल्वे स्थानकावर कडेकोट बंदोबस्त; सुरक्षा यंत्रणा, प्रशासन सज्ज
6
महापालिका उमेदवारीची सर्वाधिक स्पर्धा भाजपमध्ये; आताच ५०० पेक्षा अधिक इच्छुकांची यादी तयार
7
पडळकरांना सभागृहात एक दिवस न बोलण्याची शिक्षा दिल्याने त्यांच्यात सुधारणा - नीलम गोऱ्हे
8
"असले राजकीय स्टंट सहन करणार नाही, माफी मागा"; राज ठाकरेंच्या वक्तव्याने गुजरातमध्ये संताप
9
आधी 'जिथं तू तिथं मी...' आता एकमेकांना अनफॉलो करत हार्दिक-जास्मिन यांच्यातील प्रेमाचा खेळ संपला!
10
वहिनीच्या अवतीभवती फिरायचा दीर, 'त्या' दिवशी हाताला धरून तिला घरी आणलं अन् कहरच केला...
11
Porsche Cayenne: पोर्शे केयेन ब्लॅक एडिशन भारतात लॉन्च; किंमत सर्वसामन्यांच्या आवाक्याबाहेर!
12
'बिहारमध्ये वीजच नाही तर बिल कुठून येणार'; नितीश कुमारांच्या घोषणेची भाजप मंत्र्याने उडवली खिल्ली
13
IND vs ENG : बुमराह 'ऑन ड्यूटी'; सिराजला मिळणार सुट्टी! टीम इंडियात शिजतोय हा प्लॅन
14
'कोल्डप्ले' कॉन्सर्टमध्ये CEO आणि HRचं अफेअर झालं उघड, आता कंपनीने केली 'ही' कारवाई
15
Electric Scooter: ओला, टीव्हीएस, बजाजसाठी धोक्याची घंटा, बाजारात येतेय रेट्रो स्टाईल इलेक्ट्रीक स्कूटर!
16
सुंदरा मनामध्ये भरली... फ्रान्समध्ये दिसला सारा तेंडुलकरचा नवा लूक, चाहतेही झाले फिदा
17
विनयभंगाच्या गुन्ह्याखाली तरुंगात गेला; सुटून आल्यानंतर पीडिताच्या घरासमोरच फोडले फटाके!
18
"...मग नितेश राणे सरकारमध्ये बसून फक्त पंखा हलवणार का?"; मनसे नेत्याचा खोचक सवाल
19
Rohini Khadse : "अरे कुणाला मूर्ख बनवता? पोलीस सत्ताधाऱ्यांच्या इशाऱ्यावर नाचताहेत...”, रोहिणी खडसेंचा संताप
20
सुनेवर होती वाकडी नजर, सतत मुलाशी भांडण अन् एके दिवशी सासऱ्याने टोकच गाठलं...

कारभार अवघ्या दोन सरकारी वकिलांवरच

By admin | Updated: January 30, 2015 03:33 IST

न्यायालयीन बाब म्हटले की ‘तारीख पे तारीख’ असा अनेकांना अनुभव आहे. यामागची विविध कारणे असली, तरी सरकारी वकिलांची कमतरता हाही एक भाग आहे

मंगेश पांडे, पिंपरीन्यायालयीन बाब म्हटले की ‘तारीख पे तारीख’ असा अनेकांना अनुभव आहे. यामागची विविध कारणे असली, तरी सरकारी वकिलांची कमतरता हाही एक भाग आहे. पिंपरीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाच सरकारी वकिलांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोन सरकारी वकिलांवर कामकाज सुरू आहे. त्यामुळे दाव्यांच्या सुनावण्या पूर्ण होत नसून, अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील अहल्याबाई होळकर चौकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार मोठा आहे. दररोज वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दावा सुरू होतो. शहरातील नागरिकांच्या सोईसाठी ८ मार्च १९८९ ला पिंपरीत न्यायालय उभारण्यात आले. सुरुवातीला एकच न्यायाधीश कक्ष होता. आता तीन मजली इमारतीत एकूण पाच न्यायाधीशांचे कक्ष असून, येथे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे चालतात. भोसरी ठाण्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीचा दावा असल्यास त्याची सुनावणी तळमजल्यावरील न्यायाधीश कक्षात होते, तर पहिल्या मजल्यावर तीन न्यायाधीश कक्ष असून यामध्ये पिंपरी, निगडी आणि सांगवी ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीच्या दाव्यांची सुनावणी होते. तसेच दुसऱ्या मजल्यावरील कक्षात चिंचवड ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीच्या दाव्यांची सुनावणी असते. प्रत्येक कक्षात दिवसाला सुमारे दीडशे दावे सुनावणीसाठी असतात. यामध्ये बचाव पक्षाची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलांची आवश्यकता असते. त्याशिवाय सुनावणी घेता येत नाही. सरकारी वकिल हजर नसल्यास पुढची तारीख दिली जाते. यामुळे पक्षकाराला पुन्हा बोलाविले जाते. यामुळे सर्वांचाच वेळ वाया जातो. शिवाय संबंधितांना हेलपाटे मारण्याचीही वेळ येते. यासाठी प्रत्येक न्यायाधीश कक्षात एका सरकारी वकिलाची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकारी वकिलांची नेमणूक केली जात नाही.दोन सरकारी वकिलांवरच न्यायालयाचा कारभार सुरू आहे. यामुळे नागरिकांना गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे.