शहरं
Join us  
Trending Stories
1
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
2
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
3
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
4
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
5
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?
6
नेपाळच्या लष्कर प्रमुखांनी भारतात प्रशिक्षण घेतले, देशाला एकसंघ ठेवण्याची आता त्यांच्यावर जबाबदारी
7
“PM मोदींच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५ ST बसस्थानकावर मोफत वाचनालय सुरू करणार”: सरनाईक
8
पृथ्वीवर ९ दिवस फिरत होत्या अज्ञात लहरी...; ग्रीनलँडची २०२३ ची ती घटना अन्...
9
भारतात पारडे पालटले! इन्स्टाने रील्समध्ये युट्यूबला मागे टाकले; मेटाने काय ट्रेडिंग असते ते जाहीर केले
10
२१ लाख लोक रस्त्यावर, आतापर्यंत ९०० जणांचा मृत्यू! पाकिस्तानात पुराचं थैमान 
11
वेफर्स अन् भुजिया बनवणारी कंपनीत हिस्सेदारीसाठी चुरस; पेप्सिको, आयटीसीसह अनेक कंपन्या शर्यतीत
12
शेअर बाजारातील नुकसानीपासून वाचण्याचा सॉलिड फंडा, नितीन कामथ यांनी सांगितली भन्नाट ट्रिक
13
"भविष्यात मुख्यमंत्री होण्याची माझ्याकडे ऑफर", असं कोण म्हणालं? वाचा
14
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
15
'भारताच्या वाढीमुळे घाबरले, म्हणून शुल्क लादला', ट्रम्प टॅरिफवर मोहन भागवतांचे सूचक विधान
16
क्रूरतेचा कळस! गुजरातमधून विमानानं आला, गर्लफ्रेंडवर अत्याचार केला अन् ५१ वेळा स्क्रूड्रायव्हर खुपसला; कोर्टाने सुनावली शिक्षा
17
एकेकाळी ५००० रुपये होता पगार, आता त्यांची कंपनी आणतेय ३८२० कोटींचा IPO; कोण आहे ही व्यक्ती?
18
पितृपक्ष २०२५: ५ रुपयांत मिळणाऱ्या ५ वस्तू पितरांना अर्पण करा; पूर्वज आयुष्यभर आशीर्वाद देतील
19
UPSC ची तयारी करणाऱ्या युवकानं उचललं धक्कादायक पाऊल; स्वत:चा प्रायव्हेट पार्ट कापला, कारण...
20
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता

कारभार अवघ्या दोन सरकारी वकिलांवरच

By admin | Updated: January 30, 2015 03:33 IST

न्यायालयीन बाब म्हटले की ‘तारीख पे तारीख’ असा अनेकांना अनुभव आहे. यामागची विविध कारणे असली, तरी सरकारी वकिलांची कमतरता हाही एक भाग आहे

मंगेश पांडे, पिंपरीन्यायालयीन बाब म्हटले की ‘तारीख पे तारीख’ असा अनेकांना अनुभव आहे. यामागची विविध कारणे असली, तरी सरकारी वकिलांची कमतरता हाही एक भाग आहे. पिंपरीतील दिवाणी व फौजदारी न्यायालयात पाच सरकारी वकिलांची आवश्यकता असताना सध्या केवळ दोन सरकारी वकिलांवर कामकाज सुरू आहे. त्यामुळे दाव्यांच्या सुनावण्या पूर्ण होत नसून, अनेक प्रकरणे वर्षानुवर्षे प्रलंबित राहतात. जुन्या पुणे-मुंबई महामार्गावरील पिंपरीतील अहल्याबाई होळकर चौकापासून अर्धा किलोमीटर अंतरावर दिवाणी व फौजदारी न्यायालय आहे. पिंपरी-चिंचवड शहराचा विस्तार मोठा आहे. दररोज वेगवेगळ्या स्वरूपाच्या गुन्ह्यांची पोलीस ठाण्यात नोंद होते. हे प्रकरण न्यायालयात गेल्यानंतर दावा सुरू होतो. शहरातील नागरिकांच्या सोईसाठी ८ मार्च १९८९ ला पिंपरीत न्यायालय उभारण्यात आले. सुरुवातीला एकच न्यायाधीश कक्ष होता. आता तीन मजली इमारतीत एकूण पाच न्यायाधीशांचे कक्ष असून, येथे दिवाणी व फौजदारी स्वरूपाचे दावे चालतात. भोसरी ठाण्यांत दाखल झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीचा दावा असल्यास त्याची सुनावणी तळमजल्यावरील न्यायाधीश कक्षात होते, तर पहिल्या मजल्यावर तीन न्यायाधीश कक्ष असून यामध्ये पिंपरी, निगडी आणि सांगवी ठाण्यात नोंद झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीच्या दाव्यांची सुनावणी होते. तसेच दुसऱ्या मजल्यावरील कक्षात चिंचवड ठाण्यात दाखल झालेल्या गुन्ह्यांतील फिर्यादीच्या दाव्यांची सुनावणी असते. प्रत्येक कक्षात दिवसाला सुमारे दीडशे दावे सुनावणीसाठी असतात. यामध्ये बचाव पक्षाची बाजू मांडण्यासाठी सरकारी वकिलांची आवश्यकता असते. त्याशिवाय सुनावणी घेता येत नाही. सरकारी वकिल हजर नसल्यास पुढची तारीख दिली जाते. यामुळे पक्षकाराला पुन्हा बोलाविले जाते. यामुळे सर्वांचाच वेळ वाया जातो. शिवाय संबंधितांना हेलपाटे मारण्याचीही वेळ येते. यासाठी प्रत्येक न्यायाधीश कक्षात एका सरकारी वकिलाची नेमणूक करण्याची आवश्यकता आहे. मात्र, अनेक वर्षांपासून मागणी करूनही सरकारी वकिलांची नेमणूक केली जात नाही.दोन सरकारी वकिलांवरच न्यायालयाचा कारभार सुरू आहे. यामुळे नागरिकांना गैरसोर्इंचा सामना करावा लागत आहे.