शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांची समर्थ लेखणीच देशाला महासत्ताक बनवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध ...

पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध लेखणी बालकांच्या रुपाने उद्याचा समर्थ भारत घडवेल आणि त्यातूनच देश महासत्ता बनेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे आणि ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. ग. फगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कविता मेंहेदळे, मुकुंद तेलीचरी उपस्थित होते. वा. गो. आपटे पुरस्कार प्रा. प्रकाश करमरकर, उमाकांत देशपांडे, ग. ह. पाटील पुरस्कार डॉ. सुरेश सावंत, अ. म. पठाण, रा. ग. शेवडे पुरस्कार ज्योतिराम कदम, सुनंदा गोरे, श्री.बा. रानडे पुरस्कार देवबा पाटील, कै. शंकर सारडा पुरस्कार प्रा. विश्वास वसेकर, प्रा. रामदास केदार, वा. म. जोशी पुरस्कार संजय ऐलवाड, बबन शिंदे, चरित्रात्मक लेखन वीरभद्र मिरेवाड, चित्रा नाईक पुरस्कार डॉ. वैशाली देशमुख, इंदुमती अरगडी पुरस्कार स्नेहल डांगे, गायत्री सूर्यवंशी यांना प्रदान केला.

मुलांकडे अफाट कल्पना शक्ती आहे. आजकाल काही पुस्तके गाजविली जातात. तर काही पुस्तके पिढ्यानपिढ्या गाजत असतात. बालसाहित्यात सहजवृत्ती असावी, अशी अपेक्षाही डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केली.

किरण केंद्रे म्हणाले, बाल साहित्य लिहिणे सोपे नाही. पिढी बदलली आहे. त्यामुळे बाल साहित्याचे रूप आणि स्वरूप बदलले पाहिजे. बालसाहित्यात नवे प्रयोग करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यांच्या भाषेत, त्यांना रुचणारे, पचणारे साहित्य निर्माण झाल्यास मुलांची अभिरुची घडविणारे पुस्तके निर्माण होतील.

महावीर जोंधळे म्हणाले, बालसाहित्य ही सहज सोपी गोष्ट नसून, शब्दाला शब्द जोडून बालसाहित्याची निर्मिती होत नाही. बालकांसाठी साहित्य लिहिताना त्यांच्या मनोविश्वाचा, मानशास्त्राचा अभ्यास करून बाल साहित्याची निर्मिती होणे अपेक्षित आहे. बालसाहित्याबाबत पाश्चात्य देशांनी प्रयोगशीलता स्वीकारली असून, तिचं प्रयोगशीलता भारतीय बालसाहित्यातही अपेक्षित आहे. उद्याचा सुसंस्कारी नागरिक घडविणारे बाल साहित्य हवे. बालक सजग आहेत. ते विज्ञानाचा विचार करतात. बाल साहित्य चार भिंतीत लिहिण्याची गोष्ट नाही.

कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केले. डॉ. संगीता बर्वे यांनी प्रास्तविक केले. प्राजंली बर्वे यांनी स्वागत गीत सादर केले. डॉ. दिलीप गरूड यांनी तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.