शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेना-मनसे युतीची घोषणा; १९ वर्षांनी उद्धव आणि राज दोन्ही भाऊ आले एकत्र; या प्रश्नांचे काय?
2
अखेर ठाकरेयुती! बदलेल ‘राज’नीती?  कोणत्याही भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा, राज-उद्धव काय म्हणाले...
3
थेट निवडलेल्या नगराध्यक्षास सदस्यत्व, मताचाही अधिकार; मंत्रिमंडळाचा निर्णय 
4
मोठा धक्का! बीकेसीतील बुलेट ट्रेन स्थानकाचे काम तात्काळ थांबवण्याची नाेटीस
5
देशातील हवाई वाहतूक क्षेत्रात आणखी दोन नव्या कंपन्यांची एन्ट्री; हिंद एअर, फ्लाईएक्स्प्रेसला केंद्र सरकारकडून मंजुरी
6
‘त्या’ कुटुंबाची जबाबदारी बांगलादेश सरकारने स्वीकारली
7
जिथे नेटवर्क नाही, तिथेही मोबाइल चालणार; आपत्तींतही इंटरनेट मिळेल
8
बिहार संघाने नोंदवली विश्वविक्रमी धावसंख्या; वैभवने चोपल्या १९० धावा, त्याही एवढ्याच चेंडूत...
9
विजय हजारे स्पर्धेत विक्रमच विक्रम, एकाच दिवसात दोन दीड शतके, दोन स्फोटक शतके...
10
वायुप्रदूषण असेच कायम राहिल्यास बांधकामे थांबवण्याचे आदेश देऊ! मुंबई उच्च न्यायालयाचा महापालिकेला इशारा
11
कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

साहित्यिकांची समर्थ लेखणीच देशाला महासत्ताक बनवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध ...

पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध लेखणी बालकांच्या रुपाने उद्याचा समर्थ भारत घडवेल आणि त्यातूनच देश महासत्ता बनेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे आणि ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. ग. फगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कविता मेंहेदळे, मुकुंद तेलीचरी उपस्थित होते. वा. गो. आपटे पुरस्कार प्रा. प्रकाश करमरकर, उमाकांत देशपांडे, ग. ह. पाटील पुरस्कार डॉ. सुरेश सावंत, अ. म. पठाण, रा. ग. शेवडे पुरस्कार ज्योतिराम कदम, सुनंदा गोरे, श्री.बा. रानडे पुरस्कार देवबा पाटील, कै. शंकर सारडा पुरस्कार प्रा. विश्वास वसेकर, प्रा. रामदास केदार, वा. म. जोशी पुरस्कार संजय ऐलवाड, बबन शिंदे, चरित्रात्मक लेखन वीरभद्र मिरेवाड, चित्रा नाईक पुरस्कार डॉ. वैशाली देशमुख, इंदुमती अरगडी पुरस्कार स्नेहल डांगे, गायत्री सूर्यवंशी यांना प्रदान केला.

मुलांकडे अफाट कल्पना शक्ती आहे. आजकाल काही पुस्तके गाजविली जातात. तर काही पुस्तके पिढ्यानपिढ्या गाजत असतात. बालसाहित्यात सहजवृत्ती असावी, अशी अपेक्षाही डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केली.

किरण केंद्रे म्हणाले, बाल साहित्य लिहिणे सोपे नाही. पिढी बदलली आहे. त्यामुळे बाल साहित्याचे रूप आणि स्वरूप बदलले पाहिजे. बालसाहित्यात नवे प्रयोग करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यांच्या भाषेत, त्यांना रुचणारे, पचणारे साहित्य निर्माण झाल्यास मुलांची अभिरुची घडविणारे पुस्तके निर्माण होतील.

महावीर जोंधळे म्हणाले, बालसाहित्य ही सहज सोपी गोष्ट नसून, शब्दाला शब्द जोडून बालसाहित्याची निर्मिती होत नाही. बालकांसाठी साहित्य लिहिताना त्यांच्या मनोविश्वाचा, मानशास्त्राचा अभ्यास करून बाल साहित्याची निर्मिती होणे अपेक्षित आहे. बालसाहित्याबाबत पाश्चात्य देशांनी प्रयोगशीलता स्वीकारली असून, तिचं प्रयोगशीलता भारतीय बालसाहित्यातही अपेक्षित आहे. उद्याचा सुसंस्कारी नागरिक घडविणारे बाल साहित्य हवे. बालक सजग आहेत. ते विज्ञानाचा विचार करतात. बाल साहित्य चार भिंतीत लिहिण्याची गोष्ट नाही.

कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केले. डॉ. संगीता बर्वे यांनी प्रास्तविक केले. प्राजंली बर्वे यांनी स्वागत गीत सादर केले. डॉ. दिलीप गरूड यांनी तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.