शहरं
Join us  
Trending Stories
1
बॅडमिंटन स्टार सायना नेहवाल आणि पारुपल्ली कश्यप यांचा घटस्फोट, ७ वर्षांनी लग्न तुटले!
2
Wimbledon 2025 Final : अल्काराझची हॅटट्रिक हुकली! नंबर वन यानिक सिनरनं विम्बल्डन जेतेपद जिंकत रचला इतिहास
3
इंग्लंड: लंडनच्या साऊथएन्ड विमानतळावर मोठा अपघात! उड्डाणानंतर काही वेळातच विमानाला आग
4
मैत्रिणीला सोडायला गेलेली स्नेहा परत आलीच नाही; थेट यमुना नदीत सापडला मृतदेह; नेमकं काय घडलं?
5
अमरावती: पोलिसांनी उधळली तरुणाईची मद्य पार्टी ! अल्पवयीन मुला-मुलींसह १००-१५० जण ताब्यात
6
टीम इंडियासाठी सोपा वाटणारा पेपर झाला अवघड; ५८ धावांत ४ विकेट्स! KL राहुल एकटा पडला!
7
क्रॉसिंग गेटवर रेल्वेचे ‘झिरो अ‍ॅक्सिडेन्ट’चे लक्ष्य; मध्य रेल्वे नागपूर विभागात सुरक्षा मोहीम
8
"भाजपाने पेरलेल्या विषाला..."; प्रवीण गायकवाड प्रकरणावरून संजय राऊत यांनी व्यक्त केला संताप
9
IND vs ENG : वॉशिंग्टन सुंदरनं घेतली इंग्लंडची फिरकी; टीम इंडियासमोर १९३ धावांचे आव्हान
10
Video: बापरे!! पर्यटक समोर असताना चित्ता अचानक माणसांसारखा दोन पायांवर उभा राहिला अन्...
11
लातुरात ड्रग्ज विक्री नेटवर्कचा उलगडा! आणखी तिघांना अटक; चार दिवसांची पाेलिस काेठडी
12
दुर्गम जंगलातील खोल गुहेमध्ये २ मुलींसह सापडली रशियन महिला, विठ्ठल मूर्तीची करायची पूजा, तपासामधून धक्कादायक माहिती उघड  
13
IND vs ENG : अति 'सुंदर'! वॉशिंग्टनच्या फिरकीतील जादूसह टीम इंडियाच्या विजयातील मोठा अडथळा झाला दूर
14
नीरज चोप्रा अन् अरशद नदीम पुन्हा भिडणार; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिलीच लढत
15
ठाणे: जि.प., पं. समित्यांचा निवडणूक प्रभाग रचना मसुदा प्रसिद्ध; हरकतींसाठी २१ जुलैपर्यंत मुदत
16
भाजपाकडून खासदारकी मिळालेल्या उज्ज्वल निकम यांची संपत्ती किती? मुंबईत किती कोटींची घरं?
17
ब्रूकची आडवी-तिडवी फटकेबाजी! ३ चेंडूत कुटल्या १४ धावा; मग आकाशदीपनं 'मिडल स्टंप' उडवत घेतला बदला
18
"प्रवीण गायकवाड यांच्यावर हल्ला करणाऱ्या गुंडांना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करा’’, काँग्रेसची मागणी  
19
जगद्गुरू अविमुक्तेश्वरानंद यांनी व्यक्त केली मराठी शिकण्याची इच्छा; शिंदेसेना देणार मराठीचे धडे
20
मोठी बातमी! संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना अक्कलकोटमध्ये काळं फासलं

साहित्यिकांची समर्थ लेखणीच देशाला महासत्ताक बनवेल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2021 04:10 IST

पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध ...

पुणे : बालसाहित्यकारांनी शिकवण्याच्या भूमिकेतून बालसाहित्य निर्मित न करता, त्या साहित्यातून अप्रत्यक्षपणे मूल्य शिक्षण दिले पाहिजे. बाल साहित्यकारांची समृद्ध लेखणी बालकांच्या रुपाने उद्याचा समर्थ भारत घडवेल आणि त्यातूनच देश महासत्ता बनेल असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. न. म. जोशी यांनी केले.

अ. भा. मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या वार्षिक पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ साहित्यिक महावीर जोंधळे आणि ‘किशोर’ मासिकाचे कार्यकारी संपादक किरण केंद्रे यांच्या हस्ते झाले. महाराष्ट्र राष्ट्रभाषा प्रचार समितीचे संचालक ज. ग. फगरे यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा झाला. संस्थेच्या अध्यक्षा डॉ. संगीता बर्वे, नगरसेविका माधुरी सहस्रबुद्धे, कविता मेंहेदळे, मुकुंद तेलीचरी उपस्थित होते. वा. गो. आपटे पुरस्कार प्रा. प्रकाश करमरकर, उमाकांत देशपांडे, ग. ह. पाटील पुरस्कार डॉ. सुरेश सावंत, अ. म. पठाण, रा. ग. शेवडे पुरस्कार ज्योतिराम कदम, सुनंदा गोरे, श्री.बा. रानडे पुरस्कार देवबा पाटील, कै. शंकर सारडा पुरस्कार प्रा. विश्वास वसेकर, प्रा. रामदास केदार, वा. म. जोशी पुरस्कार संजय ऐलवाड, बबन शिंदे, चरित्रात्मक लेखन वीरभद्र मिरेवाड, चित्रा नाईक पुरस्कार डॉ. वैशाली देशमुख, इंदुमती अरगडी पुरस्कार स्नेहल डांगे, गायत्री सूर्यवंशी यांना प्रदान केला.

मुलांकडे अफाट कल्पना शक्ती आहे. आजकाल काही पुस्तके गाजविली जातात. तर काही पुस्तके पिढ्यानपिढ्या गाजत असतात. बालसाहित्यात सहजवृत्ती असावी, अशी अपेक्षाही डॉ. न. म. जोशी यांनी व्यक्त केली.

किरण केंद्रे म्हणाले, बाल साहित्य लिहिणे सोपे नाही. पिढी बदलली आहे. त्यामुळे बाल साहित्याचे रूप आणि स्वरूप बदलले पाहिजे. बालसाहित्यात नवे प्रयोग करण्यासाठी प्रचंड वाव आहे. त्यांच्या भाषेत, त्यांना रुचणारे, पचणारे साहित्य निर्माण झाल्यास मुलांची अभिरुची घडविणारे पुस्तके निर्माण होतील.

महावीर जोंधळे म्हणाले, बालसाहित्य ही सहज सोपी गोष्ट नसून, शब्दाला शब्द जोडून बालसाहित्याची निर्मिती होत नाही. बालकांसाठी साहित्य लिहिताना त्यांच्या मनोविश्वाचा, मानशास्त्राचा अभ्यास करून बाल साहित्याची निर्मिती होणे अपेक्षित आहे. बालसाहित्याबाबत पाश्चात्य देशांनी प्रयोगशीलता स्वीकारली असून, तिचं प्रयोगशीलता भारतीय बालसाहित्यातही अपेक्षित आहे. उद्याचा सुसंस्कारी नागरिक घडविणारे बाल साहित्य हवे. बालक सजग आहेत. ते विज्ञानाचा विचार करतात. बाल साहित्य चार भिंतीत लिहिण्याची गोष्ट नाही.

कविता मेहेंदळे आणि निर्मला सारडा यांनी परीक्षक म्हणून काम पाहिले. केले. डॉ. संगीता बर्वे यांनी प्रास्तविक केले. प्राजंली बर्वे यांनी स्वागत गीत सादर केले. डॉ. दिलीप गरूड यांनी तर माधुरी सहस्रबुद्धे यांनी आभार मानले.