शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

सेवाभाव जपणे हीच खरी श्रीमंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2016 00:34 IST

समाजात वावरताना आपण समाजाकडून खूप काही घेत असतो. पण आता घेण्याची वेळ संपली असून देण्याची वेळ आली आहे, असा सेवाभाव निर्माण झाला पाहिजे.

पुणे : समाजात वावरताना आपण समाजाकडून खूप काही घेत असतो. पण आता घेण्याची वेळ संपली असून देण्याची वेळ आली आहे, असा सेवाभाव निर्माण झाला पाहिजे. हा भावच खरी श्रीमंती असूून, समाजासाठी महत्त्वपूर्ण आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे केले.पूना हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटरमधील श्री मुकुंददास लोहिया नेत्रालय आणि विविध सोयी-सुविधांनी सुसज्ज अशा बाह्यरुग्ण विभागाचे उद््घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. पालकमंत्री गिरीश बापट, राज्यमंत्री दिलीप कांबळे, महापौर प्रशांत जगताप, मुकुंददास लोहिया, व्यवस्थापकीय विश्वस्त देविचंद जैन, सहव्यवस्थापकीय विश्वस्त राजकुमार चोरडिया, संचालिका डॉ. जे.रवींद्रनाथ आदी उपस्थित होते. श्री मुकुंद भवन ट्रस्ट यांच्या देणगीतून हे नेत्रालय उभारण्यात आले आहे. कार्यक्रमात सरकारला दुष्काळग्रस्तांकरिता २१ लाख रुपये मदत देण्याचे आश्वासन ट्रस्टतर्फे देण्यात आले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, ग्रामीण भागात वय वर्षे ५५च्या पुढील लोक मोतिबिंदूने ग्रासलेले असतात. कोणतीही उपचाराची सुविधा नसल्याने आता हा आजार भोगायचा, ही मानसिकता त्यांच्यामध्ये तयार होते. शासन त्यांच्याकरिता विविध शिबिरे आणि जनजागृतीपर कार्यक्रमांच्या माध्यमातून काम करीत आहे. परंतु मुकुंददास लोहिया नेत्रालयाच्या माध्यमातून देखील पुण्यासह महाराष्ट्राच्या ग्रामीण भागात सेवा पुरविली जाईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. बापट म्हणाले, पैसा हा केंद्रबिंदू न ठेवता आरोग्यसेवा हा केंद्रबिंदू ठेवून हॉस्पिटलचे विश्वस्त मंडळ काम करीत आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा देण्याचा प्रयत्न शासन करते. परंतु त्याला समाजातील दानशूर व्यक्तींच्या कार्याची जोड आवश्यक आहे, असे प्रशांत जगताप यांनी नमूद केले. चोरडिया यांनी प्रास्ताविकामध्ये नेत्रालयातील अत्याधुनिक सुविधांची माहिती दिली. विश्वस्त पुरुषोत्तम लोहिया यांनी आभार मानले.