शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
२६ चेंडू अन् ४१ मिनिटांचा ब्लॉकबस्टर शो! RCB चा पिक्चर पडला; वैभव सूर्यवंशी Orange Cap सह हिरो ठरला
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
6
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
7
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
8
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
9
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
10
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
11
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
12
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
13
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
14
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
15
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
16
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
17
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
18
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
19
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
20
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
Daily Top 2Weekly Top 5

मनाच्या आरोग्याकडे वेळीच लक्ष द्या

By admin | Updated: August 13, 2014 04:31 IST

‘‘शरीराच्या आजाराकडे आपण काळजीपूर्वक पाहतो, तितके मनाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यावर ही वेळीच उपचार करून घ्यावेत आणि मनाचे आरोग्यही जपावे

पिंपरी : ‘‘शरीराच्या आजाराकडे आपण काळजीपूर्वक पाहतो, तितके मनाच्या आरोग्याकडे लक्ष देत नाही, त्यावर ही वेळीच उपचार करून घ्यावेत आणि मनाचे आरोग्यही जपावे,’’ असा मोलाचा सल्ला मनोविकार तज्ज्ञांनी दिला. लोकमततर्फे मनोविकार तज्ज्ञांच्या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मनोविकारतज्ज्ञ डॉ. धनंजय अष्टुरकर, डॉ. भारत सरोदे, डॉ. दीपक मेटकर, डॉ. सुरेशकुमार मेहता, डॉ. संदीप जगताप उपस्थित होेते. मनोविकाराबाबत बोलताना डॉक्टर म्हणाले, ‘‘ मानसिक आजार झाल्याचे जनसामान्यांच्या लवकर लक्षात येत नाही. विविध आजारांवर वेगवेगळे उपचार केले जातात. त्यानंतर मनोविकार तज्ज्ञांकडे उपचारासाठी येतात. त्यात चार ते पाच वर्षाचा कालावधी जातो. तसेच या आजाराबद्दल बरेच गैरसमज आहेत. याकडे बघण्याचा (दृष्टीकोन) वेगळा आहे. मनोविकार तज्ज्ञांकडे गेले की कलंकित झाल्याची भावना रुग्णाच्या मनात निर्माण होते. ही भावना कमी झाली पाहिजे. हे आजार बहुतांशी ताणामुळे होतात. तसेच अनुवांशिकतेमुळेही हा आजार होतो. सर्वच आजारांचे कारण बहुतांशी मानसिकच असते. या आजाराच्या उपचार पद्धतीबाबतही गैरसमज आहेत. तसेच याबाबत काही चित्रपटांमधूनही चुकीची माहिती देण्यात येते. मनोविकार तज्ज्ञांची प्रतिमा मलिन केली जाते. देवराई,चौकट राजा या चित्रपटांमधून मात्र वास्तववादी चित्र दाखवण्यात आले आहे. अन्य चित्रपटांमध्ये मनोविकार तज्ज्ञांबद्दल दाखविण्यात येणारे प्रसंग समाजात गैरसमज पसरविण्यास कारणीभूत ठरतात. या आजारावर उपचार केल्यामुळे कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत. इतर आजारासारखीच ही उपचारपद्धती आहे. जसे मधुमेह आणि रक्तदाबाची औषधे घेतो, त्याप्रमाणे ही औषधे घ्यावीत. आजाराच्या स्वरूपानुसार औषधानुसार कालावधी ठरला जातो. यासाठी अनेक वर्ष उपचार करावे लागतात, हा गैरसमज आहे. पण औषधे ही तज्ज्ञांच्या मागदर्शनानुसार घ्यावीत. अनेक वर्ष तीच औषधे खाऊ नयेत. व्यसन हा मानसिक आजार व्यसन हा मोठा मानसिक आजार आहे. यावरही उपचार केल्यास त्यापासून मुक्ती मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. पण व्यसनमुक्तीच्या जाहिराती देऊन लोकांची लुबाडणूक केली जाते. हे प्रकाराला लोकांनी बळी पडू नये, असे आवाहनही त्यांनी केले.संमोहनशास्त्र उपचारपद्धतीकाही जण संमोहन शास्त्राद्वारे उपचार करून आजार बरा करण्याची जाहिरात देतात, परंतु ही एक उपचार पद्धती आहे. सर्वच आजारावर याद्वारे उपचार करणे धोक्याचे असते. तज्ज्ञांच्या मार्गदर्शनानुसार या उपचारपद्धतीचा वापर करणे गरजेचे आहे. विनाकारण या उपचार पद्धतीचा वापर केल्यास दुष्यपरिणाम होण्याची शक्यता आहे, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. विमा संरक्षण हवेया आजारासाठी शासनाकडून अथवा विमा कंपनीकडून बिलांची परिपूर्ती मिळत नाही. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होते, यासाठी विमा कंपनीने आणि शासनाने व्यवस्था करण्याची आवश्यकता आहे, अशी मागणीही मनोविकार तज्ज्ञांनी केली. वैद्यकीय शिक्षणात विषयाकडे दुर्लक्षया आजाराकडे वैद्यकीय शिक्षणात दुर्लक्ष केले आहे. एमबीबीएससाठी तर हा विषय पाच गुणांसाठी आहे. तोही ऐच्छिक आहे. या विषयाचा समावेश शालेय शिक्षणापासून करणे गरजेचे आहे.अत्याधुनिक उपचार केंद्र पुणे शहर जसे आयटी हब म्हणून प्रसिद्ध आहे. तसेच मनोविकारावर उपचारासाठी अत्याधुनिक यंत्रणा असलेली उपचार केंद्र पुण्यात आहेत. तीन पुनर्वसन केंद्र आहेत. दोन व्यसनमुक्ती केंद्रसुद्धा आहेत. मनोविकार तज्ज्ञांच्या इंडियन सायकियॅट्रिक सोसायटी आणि पुना सायकियाट्रिक सोसायटी अशा दोन संस्था कार्यरत आहेत. (प्रतिनिधी)