शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

पर्यावरणाची काळजी घेतली, तरच ‘गो ग्रीन’ यशस्वी

By admin | Updated: January 14, 2017 03:20 IST

विकास करावाच लागेल. तो थांबवता येणार नाही; मात्र विकास करताना पर्यावरणविषयक काळजी घेतली, तरच ‘गो ग्रीन’ ही

शिरूर : विकास करावाच लागेल. तो थांबवता येणार नाही; मात्र विकास करताना पर्यावरणविषयक काळजी घेतली, तरच ‘गो ग्रीन’ ही संकल्पना यशस्वी होऊ शकेल, असे मत लखनौ विद्यापीठाचे माजी व्हाईस चॅन्सेलर डॉ. एस. बी. निमसे यांनी येथे व्यक्त केले.महाविद्यालय व विद्यापीठ विकास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ व चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने गो ग्रीन या विषयावर दोन दिवसीय आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेच्या समारोपाच्या कार्यक्रमात डॉ. निमसे बोलत होते. बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. सी. मोहिते हे अध्यक्षस्थानी होते. जोहान्सबर्ग विद्यापीठाचे प्राध्यापक व्ही. व्ही. श्रीनिवासू, लखनौ विद्यापीठाच्या प्राध्यापिका उषा वाजपेयी, परिषदेचे समन्वयक डॉ. बी. आर.नखोत, स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत धापटे यांच्यासह विविध विषयांत संशोधन करणारे संशोधक, प्राध्यापक व विद्यार्थी या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.डॉ. निमसे म्हणाले, ‘‘गेल्या १५० वर्षांत तंत्रज्ञानात मोठा विकास झाला. याचा फायदा झाला तसेच तोटेही सहन करावे लागले. कळत नकळत पर्यावरणाचा ऱ्हास होत गेला. विशेषत: ऊर्जा हे विकासाचा मुख्य स्रोत आहे. यामुळे नैसर्गिक स्रोतांचा मात्र नाश होत गेला.’’ याकडे गांभीर्याने पाहताना नवीन तंत्रज्ञान वापरून ऊर्जेचे नवीन स्रोत कसे निर्माण होतील, यासाठी सतत नवीन प्रकारचे संशोधन झाले पाहिजे, अशी अपेक्षा डॉ. निमसे यांनी व्यक्त केली. हा विषय सर्वांच्या दृष्टीने भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने विद्यार्थ्यांना महाविद्यालयीन जीवनातच त्याचे महत्त्व समजल्यास पर्यावरणाचे रक्षण योग्य प्रकारे होऊ शकेल, असेही त्यांनी नमूद केले. आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. मोहिते म्हणाले, की आपल्या जीवनात पाच ‘इ’ महत्त्वाचे आहेत. यात इकॉनॉमी, एनर्जी, एज्युकेशन, एम्प्लॉयमेंट व एन्व्हायर्नमेंट यांचा समावेश आहे. हे सर्व ‘इ’ महत्त्वाचे आहेत. मात्र ‘एन्व्हायर्नमेंट’ या ‘इ’चे खऱ्या अर्थाने संरक्षण, संवर्धन करणे गरजेचे आहे. शास्त्रज्ञांच्या व्यक्त केलेल्या मतानुसार या शतकाच्या अखेरपर्यंत तापमानात ४ अंश सेल्सिअसने वाढ होण्याची शक्यता आहे. ऊर्जेचा ज्या पद्धतीने वापर होतो आहे, ते पाहता ही भीती खरी होण्याची शक्यता असून मोठी आपत्ती उद्भवू शकते. यासाठी आपण सर्वांनी आताच जागृत होणे गरजेचे असल्याचे मतही प्राचार्य डॉ. मोहिते यांनी व्यक्त केले.वाजपेयी म्हणाल्या, की जर आपण ग्रीन झालोत तरच आपण पुढच्या पिढीला ग्रीन वातावरण, पर्यावरणपूर्वक वातावरण देऊ शकू. चां.ता.बोरा महाविद्यालयाच्या ग्रीन कॅम्पसचे त्यांनी कौतुक केले. प्रा. श्रीनिवासू म्हणाले, की आपण हरित बनलो तरच शाश्वत आर्थिक विकास झाला, असे म्हणता येईल. दरम्यान, दोन दिवसांत पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांसाठी आयोजित पोस्टर्स स्पर्धेतील निकिता हरगुडे (प्रथम), संदीप देवीकर (द्वितीय), मिलिंद देशपांडे, शैलेश देशमुख (तृतीय), व्ही. श्रीदेवी (चतुर्थ); तोंडी स्पर्धेतील नेहा देसाई (प्रथम), जयश्री बंगाली (द्वितीय), भूषण भुसारे (तृतीय) या विद्यार्थ्यांना प्रशास्तपत्रक देऊन गौरविण्यात आले.स्वागताध्यक्ष प्रा. चंद्रकांत धापटे यांनी स्वागत केले. प्रा. एन. एम. धनगावकर यांनी सूत्रसंचालन केले. प्रा. औटी यांनी आभार मानले.