शहरं
Join us  
Trending Stories
1
ज्याला दिलं हृदय त्यानेच घेतला जीव! प्रेमविवाह करणाऱ्या अंजलीचा शेवट कसा झाला?; आरोपी पतीला अटक
2
खासदार श्रीकांत शिंदेंच्या बंगल्यातही शिरलं पाणी; विकासकामांवर बोलायचं नाही, मनसेचा खोचक टोला
3
Mumbai Rain Updates Live: शाळा-कॉलेजला २० ऑगस्टला सुट्टी जाहीर केल्याचा मेसेज खोटा - BMC
4
जग पाहण्याआधीच बाळाचा जीव गेला, आईनं गमावलं लेकरू; महाराष्ट्रात आरोग्य सेवेचे धिंडवडे निघाले
5
School Holiday: मुसळधार पावसाचा इशारा, प्रशासन सतर्क; २० ऑगस्टला कोणकोणत्या जिल्ह्यात शाळांना सुट्टी? वाचा
6
उपराष्ट्रपती निवडणूक: सी.पी राधाकृष्णन विरुद्ध सुदर्शन रेड्डी लढतीत कुणाचं पारडं मजबूत?
7
४० तोळं सोने अन् २० लाख खर्च करून लग्न लावलं; २ वर्षात पोरीनं स्वत:ला कायमचं संपवलं
8
मोनो रेल्वे बंद का पडली? CM देवेंद्र फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश, प्रवाशांना न घाबरण्याचं आवाहन
9
भारतातील श्रीमंत कुटुंबे रशियन तेलाचा फायदा घेत आहेत, डोनाल्ड ट्रम्प यांच्या मंत्र्यांचे मोठे विधान
10
Asia Cup 2025 : गिल वर्षभरानंतर संघात आला अन् उप-कर्णधार झाला! सूर्यकुमार यादवनं सांगितली आतली गोष्ट
11
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
12
भारताकडे शक्तिशाली क्षेपणास्त्रे, आमचे अनेक हवाई तळ उडवले; शरीफ यांच्या सहकाऱ्याने पाकिस्तानची पोलखोल केली
13
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
14
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
15
सेंच्युरीसह मुंबईकर पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दुसऱ्या बाजूला पुणेकर ऋतुराजनं घातला घोळ, अन्...
16
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
17
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
18
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
19
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
20
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका

धरणग्रस्तांचे प्रश्न मार्गी लागल्यावरच पाणी उचलू

By admin | Updated: April 17, 2017 06:33 IST

भामा आसखेड धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जॅकवेलमधून पाणी उचलणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भामा आसखेड

पाईट : भामा आसखेड धरणग्रस्तांचे सर्व प्रश्न मार्गी लागल्याशिवाय जॅकवेलमधून पाणी उचलणार नाही, असे पालकमंत्री गिरीश बापट यांनी भामा आसखेड धरणग्रस्तांच्या बैठकीत धरणग्रस्तांना रविवारी आश्वासन दिले.भामा आसखेड धरणग्रस्तांचे पुनर्वसन व त्यांना द्यावयाचे विशेष पॅकेज हे प्रश्न तातडीने सोडविण्याच्या मागण्यांसाठी आमदार सुरेश गोरे यांच्या पुढाकाराने भामा आसखेड विश्रामगृहावर धरणग्रस्त, संबंधित खात्याचे मंत्री व अधिकारी यांची बापट यांच्या अध्यक्षतेखाली बैैठक झाली. याप्रसंगी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार सुरेश गोरे, महेश लांडगे, महापौर मुक्ता टिळक, प्रभारी जिल्हाधिकारी रमेश काळे, पुणे महानगरपालिका आयुक्त कुणाल कुमार, पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त पी. जी. वाघमारे, प्रांतधिकारी सुनील गाढे, तहसीलदार सुनील जोशी, जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे-पाटील, अधीक्षक अभियंता अतुल कपोल, कार्यकारी अभियंता व्ही. एन. जाधव, उपविभागीय अधिकारी सर्जेराव मेमाणे आदी मान्यवर व धरणग्रस्त उपस्थित होते.भामा आसखेडमाधील १३०३ शेतकऱ्यांना अगोदर न्याय मिळाला पाहिजे. ६ गावांचे खास बाब पुनर्वसन झाले पाहिजे, या प्रमुख मागण्यांसह ११२ खातेदारांना जमिनीचा ताबा, ३८८ खातेदारांना न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे जमिनी, तालुक्यातील बंधारे भरण्याव्यतिरिक्त पाणी सोडू नये, कॅनॉलसाठी घेतलेल्या जमिनीचे शिक्के काढावे, या मागण्या आमदार सुरेश गोरे, जिल्हा नियोजन समिती सदस्य व जिल्हा परिषद सदस्य अतुल देशमुख, शरद बुट्टे पाटील, एल. बी. तनपुरे, चांगदेव शिवेकर, सत्यवान नवले, दत्ता होले, देविदास बांदल यांनी धरणग्रस्तांच्या वतीने या वेळी केल्या.यावर पालकमंत्री गिरीश बापट यांनी, धरणग्रस्तांवर अन्याय झाला, हे मान्य आहे. पण सर्व प्रश्न आता आंदोलनाने सुटणार नाहीत. शासन मदतीचा हात देत असताना आपण पुणे व पिंपरी महानगरपालिकेच्या जलवाहिनीला विरोध करू नये, असे आवाहन केले. या वेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी धरणग्रस्तांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन राज्यात ३५०० बुडित बंधाऱ्याची मागणी असताना येथे सर्वप्रथम १४ बुडित बंधाऱ्यांना मान्यता दिली आहे. यासाठी ७० लाख रुपयांची तरतूदही केली आहे. जलवाहिनीचे व धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाचे काम एकाच वेळी गुंजवणी धरणग्रस्तांप्रमाणे सोडविण्यात येर्ईल, असे सांगितले. पुनर्वसन राज्यमंत्री दिलीप कांबळे यांनी राज्य सरकारची पुनर्वसनासाठी भूमिका सकारात्मक असून ९५ टक्के प्रश्न सुटण्याच्या मार्गावर आहेत. ज्या दिवशी प्रश्न सुटेल त्या दिवशी लाभक्षेत्रातील शिक्के काढले जातील, असे सांगितले. (वार्ताहर)