शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
‘’राज्याच्या विकासासाठी महायुती एकदिलाने लढणार, जागा वाटपाबाबत कोणतेच मतभेद नाहीत”, एकनाथ शिंदे यांचं मोठं विधान 
5
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
6
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
7
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
8
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
9
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
10
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
11
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
12
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
13
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
14
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
15
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
16
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
17
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
18
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
19
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
20
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."

किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून केवळ ७८ लाख १५ हजार वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतील पुणे जिल्ह्यातील १६ हजार ११८ बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतील पुणे जिल्ह्यातील १६ हजार ११८ बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केलेली तब्बल १५ कोटी ३८ लाख ४० हजार रुपये वसुल करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. पुणे जिल्ह्यात वसुलीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत केवळ ७८ लाख १५ हजार रुपयेच वसुल झाले आहेत.

केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यातील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले. देशातील अल्प भूधारक शेतकरी व पाच ऐकर व त्यापेक्षा कमी जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दर वर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या योजने अंतर्गत ५ लाख ३१ हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद केली आहे. यामध्ये तब्बल १६ हजार ११८ शेतकरी सरकारी नोकर, टॅक्स भरणारे मोठे व्यवसायिक, अनेक मयत व्यक्तींचा देखील समावेश झाला असल्याचे समोर आले आहे. या अपात्र लोकांच्या बँक खात्यात आता पर्यंत तब्बल १५ कोटी ३८ लाख ४० हजार रूपये जमा केले असून, या सर्व पैशांची पुन्हा वसुल करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हयातील सर्व तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे पुन्हा वसुल करण्याची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, याला खूपच कमी प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १५ कोटी ३८ लाखांपैकी केवळ ७८ लाख रुपयेच वसुल झाले आहेत.