शहरं
Join us  
Trending Stories
1
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
2
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
3
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
4
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
5
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
6
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
7
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
8
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
9
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
10
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
11
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले
12
Raigad Accident: रायगडमध्ये विचित्र अपघात, भरधाव टेम्पोची सायकलसह दोन वाहनांना धडक, ३ जण ठार
13
“आमच्याकडे आजही सगळे नियोजन, महिलांना ३ हजार रुपये देऊ शकतो”; ठाकरे गटाचा मोठा दावा
14
बलुचिस्तानमधील बोलान येथे पाकिस्तानी सैन्याच्या वाहनावर हल्ला, एका अधिकाऱ्यासह ६ सैनिकांचा मृत्यू 
15
MI vs GT : 'पॉवरप्ले'मध्ये DSP सिराजचा धाक! पहिल्याच ओव्हरमध्ये साधला विकेट्सचा डाव
16
मशिदीत होता हजारोंचा जमाव, मौलानाने विचारलं भारताविरोधात कोण लढणार? हात वर करा, मग घडलं असं काही...
17
"धोनीसाठी हे सगळं करण्यात आलंय..."; सुनील गावसकरांचा IPL 2025च्या नियमावरून प्रचंड संताप
18
चीनला मोठा धक्का; iPhone चे सर्व मॉडेल्स भारतात तयार होणार, केंद्रीय मंत्र्यांची माहिती...
19
“आमचा युद्धसराव झालेला आहे, महापालिका निवडणुकांसाठी तयार”; संजय राऊतांचा निर्धार
20
वैभव सूर्यवंशी नंतर आणखी एका 14 वर्षीय स्फोटक खेळाडूने झळकावले द्विशतक, कोण आहे तो?

किसान योजनेतील बोगस लाभार्थ्यांकडून केवळ ७८ लाख १५ हजार वसुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 04:38 IST

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतील पुणे जिल्ह्यातील १६ हजार ११८ बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा ...

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : प्रधानमंत्री किसान योजनेतील पुणे जिल्ह्यातील १६ हजार ११८ बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केलेली तब्बल १५ कोटी ३८ लाख ४० हजार रुपये वसुल करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. पुणे जिल्ह्यात वसुलीला खूपच कमी प्रतिसाद मिळाला आहे. आतापर्यंत केवळ ७८ लाख १५ हजार रुपयेच वसुल झाले आहेत.

केंद्र शासनाने गरीब व सर्वसामान्य शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी फेब्रुवारी २०१९ मध्ये प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना सुरु केली होती. काही दिवसांपूर्वी तामिळनाडूमध्ये या योजनेत मोठा घोटाळा झाल्याचे उघड झाले होते. त्यानंतर केंद्र शासनाने सर्वच राज्यातील बोगस लाभार्थी शोधण्याचे आदेश दिले. देशातील अल्प भूधारक शेतकरी व पाच ऐकर व त्यापेक्षा कमी जमिन असणाऱ्या शेतकऱ्यांना केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजने अंतर्गत दर वर्षी ६ हजार रुपये जमा केले जातात. पुणे जिल्ह्यात आतापर्यंत या योजने अंतर्गत ५ लाख ३१ हजार शेतकऱ्यांची ऑनलाईन नोंद केली आहे. यामध्ये तब्बल १६ हजार ११८ शेतकरी सरकारी नोकर, टॅक्स भरणारे मोठे व्यवसायिक, अनेक मयत व्यक्तींचा देखील समावेश झाला असल्याचे समोर आले आहे. या अपात्र लोकांच्या बँक खात्यात आता पर्यंत तब्बल १५ कोटी ३८ लाख ४० हजार रूपये जमा केले असून, या सर्व पैशांची पुन्हा वसुल करण्याचे आदेश केंद्र शासनाने दिले आहेत. त्यानुसार जिल्हयातील सर्व तलाठी व संबंधित कर्मचाऱ्यांना तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. या सर्व बोगस लाभार्थ्यांकडून त्याच्या बँक खात्यात जमा केलेले पैसे पुन्हा वसुल करण्याची प्रक्रिया गेल्या दोन महिन्यांपासून सुरू आहे. परंतु, याला खूपच कमी प्रतिसाद मिळत असून, आतापर्यंत १५ कोटी ३८ लाखांपैकी केवळ ७८ लाख रुपयेच वसुल झाले आहेत.