शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
5
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
6
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
7
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
8
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
9
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
10
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
11
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर
12
ऑनलाइन गेमिंग विधेयकावरुन अनुपम मित्तल यांची सरकारवर टीका; म्हणाले 'या निर्णयामुळे थेट...'
13
UPI वापरणाऱ्यांसाठी मोठी बातमी! १ ऑक्टोबरपासून 'हे' महत्त्वाचे फीचर कायमस्वरूपी बंद होणार
14
श्रावण शनि अमावास्या: शनिदोष, प्रतिकूल प्रभाव कसा ओळखावा? ‘हे’ ५ उपाय तारतील, कृपा होईल!
15
हा पी अर्जुन तेंडुलकर कोण? तुफानी खेळीत १२ चेंडूत ३ चौकार, ३ षटकार ठोकले; मुंबई इंडियन्सच्या नजरेत भरला?...
16
रोज इथे माणसं आदळत आहेत, झोपड्या वाढताहेत, 'अर्बन नक्षल'पेक्षा...; राज ठाकरेंचं 'मिशन मुंबई'
17
विद्यार्थ्याच्या हत्येवरून अहमदाबाद तापले, रस्त्यावर उतरले हजारो लोक, पोलीस आणि NSUI मध्ये वादावादी
18
युद्ध थांबण्याचे नाव नाही! रशियाचा युक्रेनवर आतापर्यंतचा सर्वात मोठा हल्ला; एकाच वेळी डागली ४० क्षेपणास्त्र
19
छत गळतेय, उंदीर फिरतात आणि वीज नसते; इमरान खान यांच्या पत्नी बुशरा बीबींची तुरुंगात दयनीय अवस्था
20
Viral Video: लोणावळ्यात मद्यधुंद महिलांमध्ये फ्री-स्टाईलमध्ये हाणामारी; पोलीस आल्यानंतरही थांबल्या नाहीत!

मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

By admin | Updated: February 7, 2016 04:05 IST

शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी

पुणे : शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील मेंदूविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या अशा गंभीर रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे.हेल्मेटसक्तीवरून सध्या शहरात मोठे वादळ उठले आहे. पण हेल्मेट न वापरता अपघात झाल्यास डोक्याला मार लागून जीव जाण्याची वेळही येऊ शकते, याकडे मात्र विरोधक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.याबाबत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप म्हणाले, की शहरात आणि प्रामुख्याने हायवेवर दुचाकीचे जे अपघात होतात त्यातील बहुतांशी नागरिकांना डोक्याला मार लागतो. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून अनेक गंभीर गोष्टी होऊ शकतात. डोक्याला नुसता मुका मार लागला तरी आत रक्तस्राव होऊ शकतो, सूज येऊ शकते आणि ती रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. माझ्याकडे अपघातात डोक्याला लागलेले अनेक रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे ८० ते ९० टक्के रुग्णांनी हेल्मेटच वापरलेले नसते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश भंडारी म्हणाले, की अनेकदा आपण ऐकतो की एखाद्याचा अपघात झाला, त्याच्या शरीराला काहीच झाले नाही, पण डोक्याला मार लागला आणि त्याला अर्धांगवायू झाला, रक्तवाहिन्या फुटल्या, रक्तस्राव झाला, हे खरे आहे. शहरात जे अपघात होतात, त्यात डोक्यावर दुचाकीस्वार पडला आणि त्याने हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. खोपडी फुटली तरच गंभीर इजा होते असे नाही. तर पडताना डोक्याला जोराने हादरा बसला, मेंदू हालला, छोट्या मेंदूला मार लागला तरी ते जिवावर बेतू शकते. यामुळे रक्तवाहिन्या फाटू शकतात. आमच्याकडे अशी अपघात झालेल्या येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांशी रुग्ण हे तरुण असतात.हेल्मेट वापराचे असेही फायदेहेल्मेट वापरामुळे डोक्याची सुरक्षा होते. त्याचबरोबर प्रदूषणयुक्त हवा कमी प्रमाणात शरीरात जाते, डोळयांचे वारा आणि धुरापासून संरक्षण होते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्या हेल्मेट वापरामुळे दुचाकीवरून जाताना कानांना वारा लागत नाही आणि मायग्रेनचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. सुजित जगताप यांनी दिली.