शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

By admin | Updated: February 7, 2016 04:05 IST

शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी

पुणे : शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील मेंदूविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या अशा गंभीर रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे.हेल्मेटसक्तीवरून सध्या शहरात मोठे वादळ उठले आहे. पण हेल्मेट न वापरता अपघात झाल्यास डोक्याला मार लागून जीव जाण्याची वेळही येऊ शकते, याकडे मात्र विरोधक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.याबाबत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप म्हणाले, की शहरात आणि प्रामुख्याने हायवेवर दुचाकीचे जे अपघात होतात त्यातील बहुतांशी नागरिकांना डोक्याला मार लागतो. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून अनेक गंभीर गोष्टी होऊ शकतात. डोक्याला नुसता मुका मार लागला तरी आत रक्तस्राव होऊ शकतो, सूज येऊ शकते आणि ती रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. माझ्याकडे अपघातात डोक्याला लागलेले अनेक रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे ८० ते ९० टक्के रुग्णांनी हेल्मेटच वापरलेले नसते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश भंडारी म्हणाले, की अनेकदा आपण ऐकतो की एखाद्याचा अपघात झाला, त्याच्या शरीराला काहीच झाले नाही, पण डोक्याला मार लागला आणि त्याला अर्धांगवायू झाला, रक्तवाहिन्या फुटल्या, रक्तस्राव झाला, हे खरे आहे. शहरात जे अपघात होतात, त्यात डोक्यावर दुचाकीस्वार पडला आणि त्याने हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. खोपडी फुटली तरच गंभीर इजा होते असे नाही. तर पडताना डोक्याला जोराने हादरा बसला, मेंदू हालला, छोट्या मेंदूला मार लागला तरी ते जिवावर बेतू शकते. यामुळे रक्तवाहिन्या फाटू शकतात. आमच्याकडे अशी अपघात झालेल्या येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांशी रुग्ण हे तरुण असतात.हेल्मेट वापराचे असेही फायदेहेल्मेट वापरामुळे डोक्याची सुरक्षा होते. त्याचबरोबर प्रदूषणयुक्त हवा कमी प्रमाणात शरीरात जाते, डोळयांचे वारा आणि धुरापासून संरक्षण होते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्या हेल्मेट वापरामुळे दुचाकीवरून जाताना कानांना वारा लागत नाही आणि मायग्रेनचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. सुजित जगताप यांनी दिली.