शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

मेंदूच्या ७० टक्के इजा हेल्मेट न वापरामुळेच

By admin | Updated: February 7, 2016 04:05 IST

शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी

पुणे : शहरात अपघात होणाऱ्यांमध्ये मेंदूला इजा पोहोचणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही खूप आहे. यातील सुमारे ७० टक्के गंभीर इजा या दुचाकीस्वारांनी हेल्मेट न वापरल्यामुळे होतात, अशी माहिती मेंदूविकारतज्ज्ञांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. शहरातील मेंदूविकारतज्ज्ञांकडे येणाऱ्या अशा गंभीर रुग्णांपैकी बहुतांशी रुग्ण हे हेल्मेट वापरत नसल्याचे दिसून येत आहे.हेल्मेटसक्तीवरून सध्या शहरात मोठे वादळ उठले आहे. पण हेल्मेट न वापरता अपघात झाल्यास डोक्याला मार लागून जीव जाण्याची वेळही येऊ शकते, याकडे मात्र विरोधक दुर्लक्ष करीत असल्याचे चित्र आहे.याबाबत मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. सुजित जगताप म्हणाले, की शहरात आणि प्रामुख्याने हायवेवर दुचाकीचे जे अपघात होतात त्यातील बहुतांशी नागरिकांना डोक्याला मार लागतो. हेल्मेट न घातल्यामुळे डोक्याला मार लागून अनेक गंभीर गोष्टी होऊ शकतात. डोक्याला नुसता मुका मार लागला तरी आत रक्तस्राव होऊ शकतो, सूज येऊ शकते आणि ती रुग्णाच्या जिवावर बेतू शकते. माझ्याकडे अपघातात डोक्याला लागलेले अनेक रुग्ण येतात. त्यापैकी सुमारे ८० ते ९० टक्के रुग्णांनी हेल्मेटच वापरलेले नसते. त्यामुळे त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत होते आणि मोठ्या शस्त्रक्रिया कराव्या लागतात.मेंदूविकारतज्ज्ञ डॉ. नीलेश भंडारी म्हणाले, की अनेकदा आपण ऐकतो की एखाद्याचा अपघात झाला, त्याच्या शरीराला काहीच झाले नाही, पण डोक्याला मार लागला आणि त्याला अर्धांगवायू झाला, रक्तवाहिन्या फुटल्या, रक्तस्राव झाला, हे खरे आहे. शहरात जे अपघात होतात, त्यात डोक्यावर दुचाकीस्वार पडला आणि त्याने हेल्मेट घातलेले नव्हते, त्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर इजा होऊ शकते. खोपडी फुटली तरच गंभीर इजा होते असे नाही. तर पडताना डोक्याला जोराने हादरा बसला, मेंदू हालला, छोट्या मेंदूला मार लागला तरी ते जिवावर बेतू शकते. यामुळे रक्तवाहिन्या फाटू शकतात. आमच्याकडे अशी अपघात झालेल्या येणाऱ्या रुग्णांमध्ये बहुतांशी रुग्ण हे तरुण असतात.हेल्मेट वापराचे असेही फायदेहेल्मेट वापरामुळे डोक्याची सुरक्षा होते. त्याचबरोबर प्रदूषणयुक्त हवा कमी प्रमाणात शरीरात जाते, डोळयांचे वारा आणि धुरापासून संरक्षण होते. ज्यांना मायग्रेनचा त्रास आहे त्यांच्या हेल्मेट वापरामुळे दुचाकीवरून जाताना कानांना वारा लागत नाही आणि मायग्रेनचा त्रास होत नाही, अशी माहिती डॉ. सुजित जगताप यांनी दिली.