शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत गाझामध्ये सैन्य पाठवणार? संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांची परिषद बोलावली, चीन आणि पाकिस्तानला बोलावले नाही
2
"हिंदू समाज संघटित आणि बलशाली होणे, या देशाच्या सुरक्षिततेची अन् विकासाची गॅरंटी; कारण...!" - मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
WhatsApp वापरकर्त्यांची प्रतीक्षा संपली! फक्त नंबर डायल करा आणि कॉल करा, नवीन फिचर आले
4
TATA Motors च्या गुंतवणूकदारांसाठी मोठी बातमी; डीमर्जरची तारीख आली समोर, एकावर १ शेअर मिळणार
5
काय आहे 'सर क्रिक' वाद? ज्यावरून भारताचे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांची पाकिस्तानला थेट धमकी
6
IND vs WI : जादूगर आला अन् जादू दाखवून गेला! काही कळायच्या आत कुलदीपनं कॅरेबियन बॅटरचा खेळ केला खल्लास (VIDEO)
7
इस्रायलने ग्रेटा थनबर्गसह पाकिस्तानच्या माजी खासदाराला पकडले; गाझाकडे जात असताना समुद्रात अनेक जहाजं रोखली
8
हायप्रोफाईल चोर! विमानानं दिल्लीला जायचे अन् कार चोरायचे; ५ आलिशान कारसह ८३ लाखांचा माल जप्त
9
शुक्रवारपासून पंचक प्रारंभ: ५ दिवस अत्यंत प्रतिकूल, अशुभ; ‘या’ गोष्टी करूच नयेत, अमंगल काळ!
10
Video - "माझ्यासाठी सरकारी नोकरी विष, मी खूप थकलीय"; सायकोलॉजिस्ट ढसाढसा रडली
11
पहलगाम घटनेने आपल्याला शिकवले की कोण शत्रू आणि कोण मित्र: मोहन भागवत
12
Delhi Encounter: कॉमेडियन मुनव्वर फारुकीच्या हत्येचा कट, दिल्लीत धुमश्चक्री; गोल्डी बरार गँगच्या दोन शूटर्संना बेड्या
13
अश्विन पाशांकुशा एकादशी २०२५: श्रीविष्णूंचे पद्मनाभ स्वरुप पूजन, ‘असे’ करा व्रत; शुभ-लाभ!
14
जगातल्या अब्जाधीश कलाकारांमध्ये शाहरुख खानचा दबदबा कायम; श्रीमंत अभिनेत्रींमध्ये जुही चावलाचा समावेश
15
IND vs WI: वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्याच सामन्यात शुभमन गिलच्या नावावर नकोशा विक्रमाची नोंद!
16
Archana Puran Singh : एकेकाळी जेवणासाठी अभिनेत्रीकडे होते फक्त ११ रुपये; संघर्षाचे दिवस आठवून झाली भावुक
17
IND vs WI : DSP सिराजची 'दबंगगिरी'! कमबॅकमध्ये दिग्गज स्टारच्या पोराच्या पदरी 'भोपळा'
18
पत्नीच्या नावे 'या' योजनेत १ लाख रुपये जमा करा, २ वर्षांनंतर तुम्हाला किती रिटर्न मिळेल? पटापट पाहा डिटेल्स
19
दे दणादण! रस्त्याच्या कडेला स्टॉल लावण्यावरुन भाजपाचे २ नगरसेवक भिडले, झाली हाणामारी
20
बिहार विधानसभा निवडणुकीपूर्वी भाजपाला झटका; ४ वेळा आमदार राहिलेल्या नेत्याचा पक्षाला रामराम

शेततळ्यांचा ४१४ गावांनाच लाभ

By admin | Updated: March 11, 2016 01:50 IST

टंचाई काळात देण्यात येणारा शेततळ्यांचा लाभ जिल्ह्यातील ४१४ गावांना होऊ शकतो. कारण, या गावांत गेल्या ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे.

पुणे : टंचाई काळात देण्यात येणारा शेततळ्यांचा लाभ जिल्ह्यातील ४१४ गावांना होऊ शकतो. कारण, या गावांत गेल्या ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे. राज्यात दुष्काळाचे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्याबरोबर चाराटंचाईची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही टँकरने पन्नाशी फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यातच पार केली आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ‘मागेल त्याला शेततळे’ घोषणा केली आहे. यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळ्यांचे उद्दिष्ट मिळाले आहे. मागेल त्याला असे जरी शासनाने म्हटले असले, तरी काही निकष व अटी घातल्या आहेत.यात मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५0 पैैशांपेक्षा कमी पैसेवारी असावी, दारिद्र्यरेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य, कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी तसेच निवडलेली जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी हे निकष आहेत. इतर निकष जरी योग्य असले, तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी या निकषात जिल्ह्यातील १,४०४ गावांपैकी फक्त ४१४ गावे बसत असून, त्यांनाच याचा लाभ मिळू शकतो. वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील एकही गाव या निकषात बसत नासल्याचे दिसून येते़मावळ तालुक्यातील फक्त एका गावाचा समावेश असून, भोर तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. सर्वांत जास्त पुरंदर तालुक्यातील ९६ गावे असून, त्याखालोखाल शिरूर ८३, बारामती ६७, आंबेगाव ५५, इंदापूर ३४, दौैंड २२, खेड १८, जुन्नर १७, हवेलीतील १६ गावांना याचा लाभ मिळू शकतो.भोर, वेल्हे, मुळशी यांवर अन्यायभोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील पश्चिम पट्टा हा पर्जन्यछायेचा प्रदेश. या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी येथील धरणांत अडविले जाते; मात्र त्याचा लाभ इतर तालुक्यांना होतो. शेतीसाठी म्हणून या पाणलोट क्षेत्रात या पाण्याचा व पावसाचा काहीही उपयोग होत नाही. भात हे एकच पीक; तेही फक्त खाण्यापुरते येथे घेतले जाते. तरीही येथील गावे ५० पैैसेवारीच्या अटीत बसत नाहीत. या भागात फळझाडे, दुबार पीक घेण्यासाठी शेततळी, बंधारे, बुडीत बंधारे घेण्याची गरज आहे. मात्र, शासन हे निकष समोर करून आमच्यावर नेहमीच अन्याय करीत असल्याची भावना येथील शेतकऱ्यांमध्ये आहे.