शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

शेततळ्यांचा ४१४ गावांनाच लाभ

By admin | Updated: March 11, 2016 01:50 IST

टंचाई काळात देण्यात येणारा शेततळ्यांचा लाभ जिल्ह्यातील ४१४ गावांना होऊ शकतो. कारण, या गावांत गेल्या ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे.

पुणे : टंचाई काळात देण्यात येणारा शेततळ्यांचा लाभ जिल्ह्यातील ४१४ गावांना होऊ शकतो. कारण, या गावांत गेल्या ५ वर्षांत एक वर्ष तरी ५० पैसे पेक्षा कमी पैसेवारी जाहीर झाली आहे. राज्यात दुष्काळाचे चित्र दिवसेंदिवस गंभीर होत आहे. पाण्याबरोबर चाराटंचाईची तीव्रता वाढत आहे. पुणे जिल्ह्यातही टँकरने पन्नाशी फेबु्रवारीच्या पहिल्या आठवड्यातच पार केली आहे. केंद्र सरकारने या अर्थसंकल्पात ‘मागेल त्याला शेततळे’ घोषणा केली आहे. यातून जिल्ह्यात १,२७३ शेततळ्यांचे उद्दिष्ट मिळाले आहे. मागेल त्याला असे जरी शासनाने म्हटले असले, तरी काही निकष व अटी घातल्या आहेत.यात मागील ५ वर्षांत एक वर्ष तरी ५0 पैैशांपेक्षा कमी पैसेवारी असावी, दारिद्र्यरेषेखाली असलेल्या शेतकऱ्यांना प्राधान्य, कमीत कमी ०.६० हेक्टर जमीन असावी तसेच निवडलेली जमीन तांत्रिकदृष्ट्या पात्र असावी हे निकष आहेत. इतर निकष जरी योग्य असले, तरी ५० पैशांपेक्षा कमी पैसेवारी या निकषात जिल्ह्यातील १,४०४ गावांपैकी फक्त ४१४ गावे बसत असून, त्यांनाच याचा लाभ मिळू शकतो. वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील एकही गाव या निकषात बसत नासल्याचे दिसून येते़मावळ तालुक्यातील फक्त एका गावाचा समावेश असून, भोर तालुक्यातील ५ गावांचा समावेश आहे. सर्वांत जास्त पुरंदर तालुक्यातील ९६ गावे असून, त्याखालोखाल शिरूर ८३, बारामती ६७, आंबेगाव ५५, इंदापूर ३४, दौैंड २२, खेड १८, जुन्नर १७, हवेलीतील १६ गावांना याचा लाभ मिळू शकतो.भोर, वेल्हे, मुळशी यांवर अन्यायभोर, वेल्हे व मुळशी या तालुक्यांतील पश्चिम पट्टा हा पर्जन्यछायेचा प्रदेश. या भागात पडणाऱ्या पावसाचे पाणी येथील धरणांत अडविले जाते; मात्र त्याचा लाभ इतर तालुक्यांना होतो. शेतीसाठी म्हणून या पाणलोट क्षेत्रात या पाण्याचा व पावसाचा काहीही उपयोग होत नाही. भात हे एकच पीक; तेही फक्त खाण्यापुरते येथे घेतले जाते. तरीही येथील गावे ५० पैैसेवारीच्या अटीत बसत नाहीत. या भागात फळझाडे, दुबार पीक घेण्यासाठी शेततळी, बंधारे, बुडीत बंधारे घेण्याची गरज आहे. मात्र, शासन हे निकष समोर करून आमच्यावर नेहमीच अन्याय करीत असल्याची भावना येथील शेतकऱ्यांमध्ये आहे.