शहरं
Join us  
Trending Stories
1
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
2
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
3
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
4
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज
5
'ते त्रास देतायेत...!'; इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहूंवर डोनाल्ड ट्रम्प प्रचंड नाराज, अपशब्द वापरले!
6
Aamir Kaleem World Record: आमिर कलीमची कमाल! T 20I मध्ये असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
7
ECIची झाडाझडती! महाराष्ट्रातील ४४ पक्षांना दणका, यादीतून वगळले; देशभरात ४७४ पार्टींवर कारवाई
8
Hardik Pandya Run Out : कमनशिबी पांड्या! संजूचा फटका अन् तो नॉन स्ट्राइक एन्डला फसला (VIDEO)
9
IND vs Oman : सूर्या दादा बॅटिंग करायलाही विसरला की काय?
10
मराठा-ओबीसी वाद तापला, मकरंद अनासपुरे यांची मोठी प्रतिक्रिया; सरकारला केले महत्त्वाचे आवाहन
11
Shubman Gill Another KL Rahul: कॅज्युअल अप्रोच! बोल्ड झाल्यावर नेटकऱ्यांनी घेतली गिलची शाळा (VIDEO)
12
मारुती व्हिक्टोरिसचं खरं माइलेज आलं समोर, 1L पेट्रोलमध्ये फक्त 'एवढंच' धावली; कंपनीनं केलाय 21Kmpl चा दावा!
13
IND vs Oman : टॉस वेळी सूर्याचा झाला 'गजनी'; मग त्याने रोहितच्या नावे फाडलं बिल! नेमकं काय घडलं?
14
वा रे व्वा...! GST घटल्यानंतर तब्बल ₹98000 पर्यंत स्वस्त झाली TATA ची ही 5-स्टार सेफ्टी रिटिंग कार, जाणून घ्या व्हेरिअंट वाइज सूट
15
ज्योतिरादित्य शिंदेंच्या ४०,००० कोटींच्या संपत्तीच्या वादावर मोठी अपडेट; तीन आत्यांसोबत मिळून वाद सोडवावा लागणार
16
भारताला घेरण्याचा प्रयत्न? सौदीनंतर कतार-UAE देणार पाकला साथ? MEA ची पहिली प्रतिक्रिया आली
17
लाडकी बहीण योजना: यापुढेही १५००₹ हवे असल्यास ‘हे’ काम करणे अनिवार्य; पाहा, संपूर्ण प्रक्रिया
18
“१०० वर्षे पूर्ण करणाऱ्या RSSने आता संविधान अन् गांधी विचार स्वीकारावा”: हर्षवर्धन सपकाळ
19
१८ वर्षांनी पुनरावृत्ती, आता मीनाताई ठाकरे पुतळा रक्षणासाठी मोठा निर्णय; ठाकरे गट काय करणार?
20
२०२७ मध्ये भारताला मिळणार पहिली बुलेट ट्रेन; आतापर्यंत किती काम झाले? पाहा Video...

उजनीत केवळ २०.७१ टक्के पाणी

By admin | Updated: April 7, 2015 05:33 IST

उजनीचे पाणी दररोज मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतचा (बॅक वॉटर) शेतकरी धास्तावला आहे

पळसदेव : उजनीचे पाणी दररोज मोठ्या प्रमाणावर कमी होत असल्याने उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रालगतचा (बॅक वॉटर) शेतकरी धास्तावला आहे. सध्या उजनी धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीलाच पाण्याची टंचाई जाणवू लागल्याने मे महिन्यात काय परिस्थिती ओढावेल, याची चिंता शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत आहे. उजनी धरणातून मागील आठवड्यात चैत्रवारीसाठी भीमा नदीत पाणी सोडणे सुरू केले आहे. मात्र, सोमवारी दुपारी उजनी धरण व्यवस्थापनाशी संपर्क साधला असता, पाणी सोडणे बंद केले आहे. सध्या उजनी धरणात २०.७१ टक्के पाणीसाठा असल्याचे सांगितले. उजनीच्या पाण्यावरच निम्म्या तालुक्याचे अर्थकारण आहे. भिगवण ते हिंगणगावपर्यंतचा पट्टा उजनीच्या पाण्यावर अवलंबून असतो. शेतीसाठी लागणारे पाणी, औद्योगिक वसाहती व साखर कारखानेसुद्धा उजनीच्या पाण्यावरच अवलंबून आहेत. त्यामुळे उजनीला इंदापूर तालुक्याची वरदायिनी समजले जाते. उजनीच्या पाणलोट क्षेत्रात ऊस हे मुख्य पीक घेतले जाते. मात्र, गेल्या आठ दिवसांत उजनीची पाणीपातळी मोठ्या प्रमाणावर कमी झाली आहे. शेतीला पाणी मिळावे यासाठी शेतकऱ्यांना पाईपची संख्या वाढविणे, केबलची (वायर) लांबी वाढविणे आदी गोष्टी कराव्या लागत आहेत. मात्र दिवसेंदिवस कमी होत असलेल्या पाणीपातळीमुळे मे महिन्यात धरणात किती साठा शिल्लक राहणार अशी चिंता सध्या शेतकरी व्यक्त करीत आहेत. वास्तविक उजनीच्या पाण्याचे नियोजन करणे गरजेचे आहे. ज्यांनी उजनी धरणासाठी जमिनी दिल्या त्या शेतकऱ्यांवरच एक प्रकारे अन्याय केला जात असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये निर्माण झाली आहे. सोलापूर जिल्ह्यातील मंत्री, नेतेमंडळींनी ओरड केली की पाणी सोडले जाते. मात्र इंदापूर तालुक्याचे लोकप्रतिनीधी मात्र याकडे दुर्लक्ष करताना दिसतात. (वार्ताहर)