शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेशभक्तांना घेऊन जाणारी बस कशेडी बोगद्याजवळ पेटली; प्रवासी झोपेत असतानाच उडाला आगीचा भडका
2
'राहुल गांधी बोलायला लागले की त्यांचे खासदार घाबरतात कारण...'; किरेन रिजिजूंची विरोधी पक्षावर जोरदार टीका
3
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
4
"या गोष्टी खेळाशी जोडू नयेत म्हणणारे लोक...";भारत-पाक सामन्यावरून गोंधळावरुन अजित पवारांचे स्पष्ट मत
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
पालिका बँक निवडणुकीत ठाकरे, दरेकर गटाला धक्का, सहकार पॅनलने मारली बाजी
7
चालू शूटिंगमध्ये कोसळले, सेटवरच ४७ वर्षीय दिग्दर्शकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
8
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
9
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
10
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
11
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
12
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
13
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
14
गणेशोत्सवात परीक्षा नको, अमित ठाकरे यांनी केली मागणी
15
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
16
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
17
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
18
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
19
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
20
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली

वेग अन् इजा होण्याचा फक्त १० टक्के संबंध

By admin | Updated: April 13, 2016 03:34 IST

चार ते पाच वर्षांपासून शहरात दुचाकींचे वाढते अपघात आणि त्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत असल्याने कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरण्याबाबत

पुणे : चार ते पाच वर्षांपासून शहरात दुचाकींचे वाढते अपघात आणि त्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत असल्याने कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरण्याबाबत पोलिसांकडून सक्ती केली जात आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि वाहतूककोंडी यामुळे वाहनांचा २० ते ३० किलोमीटरच वेग असल्याने अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही, अशी भूमिका शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच काही राजकीय नेत्यांकडून घेतली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वाहनाचा वेग आणि खाली पडून डोक्याला मार लागण्याचा अवघा १० टक्केच संबंध असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. एखादा वाहनचालक १० किलोमीटर वेगाने चालविताना गाडीवरून तोल जाऊन पडला, तरी डोक्याला गंभीर जखम होऊन मृत्यू ओढवू शकतो. तर, हेल्मेटमुळे हा डोक्यावर होणारा आघात कमी प्रमाणात होऊन प्राण वाचण्याची शक्यता ९० टक्क्यांनी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.हेल्मेटसक्तीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी एक मध्यम मार्ग काढला. कोणताही वाहतूक नियमभंग केल्यास त्याच्यासोबत हेल्मेट कारवाई केली जाऊ लागली. ती अद्याप सुरू आहे. वेळोवेळी वाहतूक शाखेकडून हेल्मेट कारवाई केली जाते. तर, काही महिन्यांपूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंबादनंतर पुण्यातही सक्ती करण्याचे सूतोवाच करताच वाहतूक पोलीसही बाह्या सरसावून कारवाईसाठी उतरले. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये आधी जनजागृतीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध करून शहरातील वाहनांचा वेग हा प्रतितास ३० किलोमीटरही नसल्याने अपघात झाला, तरी फारशी इजा होणार नाही, अशी भूमिका घेऊन सक्ती मागे घेण्यासाठी दबाब टाकला जात आहे. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये आधी जनजागृतीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध करून शहरातील वाहनांचा वेग हा प्रतितास ३० किलोमीटरही नसल्याने अपघात झाला, तरी फारशी इजा होणार नाही, अशी भूमिका घेऊन सक्ती मागे घेण्यासाठी दबाब टाकला जात आहे. हेल्मेट आणि वाद हे पुण्यातले एक प्रकारचे समीकरण झालेले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्यापासून सुरू झालेले हेल्मेटसक्ती राबविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. परंतु, वेळोवेळी झालेली सक्ती हाणून पाडली गेली. मध्यंतरी तर कॅन्टोन्मेंट भागात हेल्मेटसक्ती राबविण्यात आली होती. लष्करी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील काही भागांत हेल्मेटसक्ती, तर काही भागात सक्ती नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाहनाचा वेग आणि अपघाताचा संबध आहेच; पण वाहन कमी वेगात असले म्हणजे डोक्याला गंभीर इजा होणार नाही. त्यामुळे हेल्मेट घालणे हा पर्याय नाही, असे म्हणणे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे आहे. अनेकदा घरात अथवा बाथरूममध्ये घसरून डोक्याला गंभीर इजा होतात. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेट वापरणे चालकासाठीच आवश्यक आहे. हेल्मेटमुळे डोक्याला होणाऱ्या गंभीर इजा रोखल्या जाऊ शकतात. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठी आहे, अशा परदेशातील आणि भारतातील शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. त्यामुळे वेग हे हेल्मेट न घालण्याचे कारण आहे, असे म्हणता येणार नाही. - डॉ. पराग संचेती (ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ)वाहनाचा वेग व डोक्याला मार लागणे यांत केवळ १० टक्केच संबंध आहे. कोणतीही व्यक्ती पडताना तिचा प्रमुख संबंध तिच्या शरीराची लवचिकता, पडण्याची स्थिती आणि तिचे वजन यांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती गाडीवरून पडल्यास प्रामुख्याने डोक्याला मार लागून रक्तस्राव होणे, कवटीला इजा (फ्रॅक्चर) होणे, तसेच मणका फ्रॅक्चर होणे या गंभीर दुखापती होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट असल्यास हा डोक्यावर होणारा आघात हेल्मेटवर होऊन ८० ते ९० टक्के आघात हेल्मेटवर होतो. त्यामुळे गंभीर इजा होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो. - डॉ. अविशान भोंडवे (इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र उपाध्यक्ष )