शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
4
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
5
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
6
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
7
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
8
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
9
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
10
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
11
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
12
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
13
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
14
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
15
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
16
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
17
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
18
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
19
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
20
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
Daily Top 2Weekly Top 5

वेग अन् इजा होण्याचा फक्त १० टक्के संबंध

By admin | Updated: April 13, 2016 03:34 IST

चार ते पाच वर्षांपासून शहरात दुचाकींचे वाढते अपघात आणि त्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत असल्याने कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरण्याबाबत

पुणे : चार ते पाच वर्षांपासून शहरात दुचाकींचे वाढते अपघात आणि त्यांमध्ये मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या वारंवार वाढत असल्याने कायद्याने बंधनकारक असलेले हेल्मेट वापरण्याबाबत पोलिसांकडून सक्ती केली जात आहे. शहरातील वाढती वाहनांची संख्या आणि वाहतूककोंडी यामुळे वाहनांचा २० ते ३० किलोमीटरच वेग असल्याने अपघात झाला तरी मृत्यू होणार नाही, अशी भूमिका शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच काही राजकीय नेत्यांकडून घेतली जात आहे. मात्र, प्रत्यक्षात वाहनाचा वेग आणि खाली पडून डोक्याला मार लागण्याचा अवघा १० टक्केच संबंध असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. एखादा वाहनचालक १० किलोमीटर वेगाने चालविताना गाडीवरून तोल जाऊन पडला, तरी डोक्याला गंभीर जखम होऊन मृत्यू ओढवू शकतो. तर, हेल्मेटमुळे हा डोक्यावर होणारा आघात कमी प्रमाणात होऊन प्राण वाचण्याची शक्यता ९० टक्क्यांनी वाढत असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.हेल्मेटसक्तीला होत असलेला विरोध लक्षात घेऊन पोलिसांनी एक मध्यम मार्ग काढला. कोणताही वाहतूक नियमभंग केल्यास त्याच्यासोबत हेल्मेट कारवाई केली जाऊ लागली. ती अद्याप सुरू आहे. वेळोवेळी वाहतूक शाखेकडून हेल्मेट कारवाई केली जाते. तर, काही महिन्यांपूर्वी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी औरंबादनंतर पुण्यातही सक्ती करण्याचे सूतोवाच करताच वाहतूक पोलीसही बाह्या सरसावून कारवाईसाठी उतरले. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये आधी जनजागृतीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध करून शहरातील वाहनांचा वेग हा प्रतितास ३० किलोमीटरही नसल्याने अपघात झाला, तरी फारशी इजा होणार नाही, अशी भूमिका घेऊन सक्ती मागे घेण्यासाठी दबाब टाकला जात आहे. विशेष म्हणजे, औरंगाबादमध्ये आधी जनजागृतीसाठी एका महिन्याचा कालावधी देण्यात आला होता. पोलिसांकडून ही आक्रमक भूमिका घेण्यात आल्याने शहरातील स्वयंसेवी संस्था तसेच लोकप्रतिनिधींनी त्याला विरोध करून शहरातील वाहनांचा वेग हा प्रतितास ३० किलोमीटरही नसल्याने अपघात झाला, तरी फारशी इजा होणार नाही, अशी भूमिका घेऊन सक्ती मागे घेण्यासाठी दबाब टाकला जात आहे. हेल्मेट आणि वाद हे पुण्यातले एक प्रकारचे समीकरण झालेले आहे. तत्कालीन पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांच्यापासून सुरू झालेले हेल्मेटसक्ती राबविण्याचे प्रयत्न अद्यापही सुरूच आहेत. परंतु, वेळोवेळी झालेली सक्ती हाणून पाडली गेली. मध्यंतरी तर कॅन्टोन्मेंट भागात हेल्मेटसक्ती राबविण्यात आली होती. लष्करी अधिकाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे शहरातील काही भागांत हेल्मेटसक्ती, तर काही भागात सक्ती नसल्याचे चित्र निर्माण झाले होते. वाहनाचा वेग आणि अपघाताचा संबध आहेच; पण वाहन कमी वेगात असले म्हणजे डोक्याला गंभीर इजा होणार नाही. त्यामुळे हेल्मेट घालणे हा पर्याय नाही, असे म्हणणे वैद्यकीयदृष्ट्या चुकीचे आहे. अनेकदा घरात अथवा बाथरूममध्ये घसरून डोक्याला गंभीर इजा होतात. त्यामुळे वाहन चालविताना हेल्मेट वापरणे चालकासाठीच आवश्यक आहे. हेल्मेटमुळे डोक्याला होणाऱ्या गंभीर इजा रोखल्या जाऊ शकतात. त्यामुळेच ज्या ठिकाणी वाहनांची संख्या मोठी आहे, अशा परदेशातील आणि भारतातील शहरांमध्ये हेल्मेटसक्ती आहे. त्यामुळे वेग हे हेल्मेट न घालण्याचे कारण आहे, असे म्हणता येणार नाही. - डॉ. पराग संचेती (ज्येष्ठ अस्थिरोग तज्ज्ञ)वाहनाचा वेग व डोक्याला मार लागणे यांत केवळ १० टक्केच संबंध आहे. कोणतीही व्यक्ती पडताना तिचा प्रमुख संबंध तिच्या शरीराची लवचिकता, पडण्याची स्थिती आणि तिचे वजन यांवर अवलंबून असते. एखादी व्यक्ती गाडीवरून पडल्यास प्रामुख्याने डोक्याला मार लागून रक्तस्राव होणे, कवटीला इजा (फ्रॅक्चर) होणे, तसेच मणका फ्रॅक्चर होणे या गंभीर दुखापती होण्याची दाट शक्यता असते. अशा वेळी व्यक्तीच्या डोक्यावर हेल्मेट असल्यास हा डोक्यावर होणारा आघात हेल्मेटवर होऊन ८० ते ९० टक्के आघात हेल्मेटवर होतो. त्यामुळे गंभीर इजा होण्याचा धोका कमी प्रमाणात असतो. - डॉ. अविशान भोंडवे (इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्र उपाध्यक्ष )