शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

आॅनलाईन सात-बाराचा उडाला बोजवारा

By admin | Updated: July 15, 2016 00:31 IST

आॅनलाईन सात-बारा ही महाराष्ट्र शासनाची योजना दिशाभूल करणारी ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राहू : आॅनलाईन सात-बारा ही महाराष्ट्र शासनाची योजना दिशाभूल करणारी ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. तलाठ्याकडच्या लेखी सात-बाऱ्यावरून आॅनलाईन रेकॉर्ड करताना संबंधित खात्याने सात-बारा उताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका ठेवल्या आहेत. त्यामुळे लेखी सात-बारा आणि संगणकीकृत सात-बारा यांमध्ये फरक पडत आहे. संगणकीकृत सात-बारे घेण्यासाठी सेवा नेहमीच विस्कळीत राहिल्याने शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून सात-बारा मिळत नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे.सात-बाऱ्यातील चुकांमुळे बँकांमध्ये कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत संगणकीकृत सात-बारा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत तलाठ्याकडचे लेखी सात-बारे सर्व खात्यांमध्ये लागू करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गामधून पुढे आली आहे. संगणकीकृत सात-बाऱ्यावर पीक पाहणीस खातेदाराच्या नावाचा उल्लेखच आढळून येत नसल्याने पिके, विहीर व बोअर, पड यांच्या मालकी हक्क व तांबेवहिवाटी दिसत नाहीत. प्रत्यक्षात संगणकाचे काम अर्धवट झालेले असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पीक पाहणीचा अंदाज येत नसल्याचे संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाकडून समजते. चार वर्षांपासून संगणकीकृत सात-बारा करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शासनाच्या या ढिसाळ धोरणामुळे शेतकरी मात्र वेठीस धरला जात असल्याची वस्तुस्तिथी आहे. दुय्यम निंबधक तलाठ्याचा हस्तलिखित व सहीशिक्क्याचा सात-बारा व पीक पाहणी विचारात घेत नाहीत. त्यामुळे अशा सात-बाऱ्यावर जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे व्यवहार पार पाडताना शेतकऱ्यांना आर्थिक तडजोडी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खरेदीखताच्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयात चुकीचा सात-बारा व पीक पाहणी यांमुळे स्टॅम्प ड्युटी मोठ्या प्रमाणावर भरावी लागत आहे. आॅनलाईन सात-बारे करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत; परंतु आॅनलाईन सात-बारे जतन करणाऱ्या सॉफ्टेवअरमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे संगणकीकृत सात-बारा काढायचा झाल्यास सर्व्हर नेहमीच बंद असतो. परिणामी, शेतकऱ्यांना सात-बारा मिळण्यासाठी विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे.- प्रशांत बेंडसे, नायब तहसीलदार, दौंडसात-बारा हा विषय किती गांभीर्याचा आहे, याची जाणीव महसूल विभागाला नाही. संगणकीकृत आणि हस्तलिखित सात-बारा यांमध्ये फरक असण्याचे कारण नाही. ज्यांनी संगणकीकृत सात-बारे करताना चुकीच्या नोंदी केल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. - बन्सीलाल फडतरे, आदर्श सरपंच कोरेगाव