शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

आॅनलाईन सात-बाराचा उडाला बोजवारा

By admin | Updated: July 15, 2016 00:31 IST

आॅनलाईन सात-बारा ही महाराष्ट्र शासनाची योजना दिशाभूल करणारी ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे.

राहू : आॅनलाईन सात-बारा ही महाराष्ट्र शासनाची योजना दिशाभूल करणारी ठरत आहे. या योजनेमुळे शेतकऱ्यांना वेठीस धरले जात असल्याची वस्तुस्थिती समोर आली आहे. तलाठ्याकडच्या लेखी सात-बाऱ्यावरून आॅनलाईन रेकॉर्ड करताना संबंधित खात्याने सात-बारा उताऱ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर चुका ठेवल्या आहेत. त्यामुळे लेखी सात-बारा आणि संगणकीकृत सात-बारा यांमध्ये फरक पडत आहे. संगणकीकृत सात-बारे घेण्यासाठी सेवा नेहमीच विस्कळीत राहिल्याने शेतकऱ्यांना आठ-आठ दिवस तलाठी कार्यालयात हेलपाटे मारून सात-बारा मिळत नसल्याची एकंदरीत परिस्थिती आहे.सात-बाऱ्यातील चुकांमुळे बँकांमध्ये कर्ज घेण्यास शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे जोपर्यंत संगणकीकृत सात-बारा दुरुस्त होत नाही, तोपर्यंत तलाठ्याकडचे लेखी सात-बारे सर्व खात्यांमध्ये लागू करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गामधून पुढे आली आहे. संगणकीकृत सात-बाऱ्यावर पीक पाहणीस खातेदाराच्या नावाचा उल्लेखच आढळून येत नसल्याने पिके, विहीर व बोअर, पड यांच्या मालकी हक्क व तांबेवहिवाटी दिसत नाहीत. प्रत्यक्षात संगणकाचे काम अर्धवट झालेले असल्यामुळे दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये पीक पाहणीचा अंदाज येत नसल्याचे संबंधित खात्याच्या अधिकारीवर्गाकडून समजते. चार वर्षांपासून संगणकीकृत सात-बारा करण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. शासनाच्या या ढिसाळ धोरणामुळे शेतकरी मात्र वेठीस धरला जात असल्याची वस्तुस्तिथी आहे. दुय्यम निंबधक तलाठ्याचा हस्तलिखित व सहीशिक्क्याचा सात-बारा व पीक पाहणी विचारात घेत नाहीत. त्यामुळे अशा सात-बाऱ्यावर जमीन खरेदी-विक्री व्यवहारात मोठ्या प्रमाणावर अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे हे व्यवहार पार पाडताना शेतकऱ्यांना आर्थिक तडजोडी करण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. खरेदीखताच्या वेळी दुय्यम निबंधक कार्यालयात चुकीचा सात-बारा व पीक पाहणी यांमुळे स्टॅम्प ड्युटी मोठ्या प्रमाणावर भरावी लागत आहे. आॅनलाईन सात-बारे करण्यासाठी महसूल विभागाचे कर्मचारी काम करीत आहेत; परंतु आॅनलाईन सात-बारे जतन करणाऱ्या सॉफ्टेवअरमध्ये टेक्निकल प्रॉब्लेम आहे. त्यामुळे संगणकीकृत सात-बारा काढायचा झाल्यास सर्व्हर नेहमीच बंद असतो. परिणामी, शेतकऱ्यांना सात-बारा मिळण्यासाठी विलंब होत असल्याची वस्तुस्थिती आहे.- प्रशांत बेंडसे, नायब तहसीलदार, दौंडसात-बारा हा विषय किती गांभीर्याचा आहे, याची जाणीव महसूल विभागाला नाही. संगणकीकृत आणि हस्तलिखित सात-बारा यांमध्ये फरक असण्याचे कारण नाही. ज्यांनी संगणकीकृत सात-बारे करताना चुकीच्या नोंदी केल्या आहेत, त्यांच्यावर गुन्हे दाखल केले पाहिजेत. - बन्सीलाल फडतरे, आदर्श सरपंच कोरेगाव