शहरं
Join us  
Trending Stories
1
गृहमंत्र्यांचा राजीनामा, २० जणांचा मृत्यू, सोशल मीडियावरील बंदी उठवली; नेपाळमध्ये काय काय घडले?
2
रोहित शर्मा रुग्णालयात; 'हिटमॅन'ला अचानक काय झालं? Viral Video मुळे फॅन्स चिंतेत
3
Post Office ची ही स्कीम करेल मालामाल; दर महिन्याला मिळेल ₹५,५०० चं फिक्स व्याज, पटापट चेक करा डिटेल्स
4
"तू बाहेर चल, तुझं तोंडच फोडतो…’’, ट्रम्प यांच्या डिनर पार्टीत वादावादी, वित्तमंत्री आणि फायनान्स अधिकारी भिडले
5
लवकर भरा आयकर रिटर्न, अन्यथा...; कर विवरणपत्र दाखल करण्यासाठी फक्त आठवडाच शिल्लक
6
Asia Cup 2025: संजू सॅमसन पहिला सामना खेळणार की नाही? टीम इंडियाच्या सरावात चित्र स्पष्ट
7
मुंबईत दहशत माजवण्याचे षडयंत्र? अग्नीवीर जवानाला फसवून लोडेड 'इन्सास रायफल'ची चोरी!
8
Tariff: अमेरिकेच्या टॅरिफवर भारताचा तोडगा! शेती व दुग्धव्यवसाय क्षेत्र खुले करण्यास दिला ठाम नकार
9
कुर्डूतील मुरुम उपसा बेकायदाच, IPS अंजना कृष्णा यांनी केलेली कारवाई योग्य; जिल्हाधिकाऱ्यांनीच सांगितलं सत्य
10
अमेरिकेतील दुकानात चोरी करताना पकडली गेली गुजराती महिला? चौकशीवेळी ढसाढसा रडू लागली, त्यानंतर...
11
सी. पी. राधाकृष्णन की बी. सुदर्शन रेड्डी, भारताचे १५ वे उपराष्ट्रपती कोण होणार? आज निवडणूक
12
GEN-Z च्या आंदोलनापुढे नेपाळ सरकार झुकले; सोशल मीडियावरील बंदी उठवली
13
केंद्र सरकारने रोखले पीएम किसानचे मानधन; दोघांच्या नावे शेती असल्यास पत्नीलाच मिळेल लाभ
14
आजचे राशीभविष्य - ९ सप्टेंबर २०२५, नशिबाची साथ लाभेल, परदेशातून शुभ समाचार मिळतील
15
अग्रलेख: चिमुकल्यांच्या जिवाशी खेळ; प्रश्नांकडे दुर्लक्ष ही धोरणात्मक चूक
16
नेपाळच्या संसदेत घुसली तरुणाई, प्रचंड तोडफोड-जाळपोळ; सैन्याचा आंदोलकांवर गोळीबार
17
विशेष लेख:बिहारचे मैदान तापले; सर्वांच्या अस्तित्वाची लढाई!
18
हैदराबाद गॅझेटियरची अंमलबजावणी १७ सप्टेंबरपूर्वी करा, अन्यथा...; जरांगेंनी थोपटले दंड, ओबीसी समाज आक्रमक
19
आधार हा नागरिकत्वाचा नाही तर ‘ओळखी’चा पुरावा; १२ वे दस्तावेज म्हणून ग्राह्य धरा, सुप्रीम कोर्टाचे निर्देश 
20
जीपच्या धडकेत तिघे ५० फूट फेकले, पती-पत्नीसह एक वर्षाचा चिमुकला ठार

आॅनलाईन फ्रॉड वाढले

By admin | Updated: December 30, 2016 04:32 IST

माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशात कॅशलेस व्यवहार सुरु करण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीनंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत

पुणे : माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून देशात कॅशलेस व्यवहार सुरु करण्याचे केंद्र शासनाचे प्रयत्न सुरु आहेत. नोटाबंदीनंतर याबाबत मोठ्या प्रमाणावर जाहिरात करण्यात येत आहे. तसेच केंद्र शासनाने थेट अ‍ॅपही सुरु केले आहेत. परंतु या कॅशलेस व्यवहारांमधून आॅनलाईन फ्रॉड होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नोटाबंदीपासून ५0 दिवसांमध्ये अशा शेकडो तक्रारी सायबर गुन्हे शाखेकडे दाखल झाल्या आहेत.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ८ नोव्हेंबर रोजी रात्रीपासून पाचशे आणि एक हजाराच्या जुन्या नोटा चलनामधून बाद केल्या. या निर्णयाचे देशभरात स्वागत करण्यात आले तसाच मोठ्या प्रमाणावर विरोधही झाला. वेळोवेळी नवनवीन नियम सांगतानाच कॅशलेस व्यवहार करण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले. परंतु कॅशलेस व्यवहार सर्वसामान्य आणि गोरगरिबांना जमणार का हा प्रश्न आहे. जेथे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन सुशिक्षितांनाच कोट््यवधी रुपयांचा गंडा घालण्यात येत आहे, तेथे गोरगरीब अशिक्षितांचा निभाव कसा लागणार हा प्रश्न आहे. पुण्यासारख्या प्रगत शहरामध्येही सायबर गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलिसांकडे वर्षाला दाखल होणाऱ्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय आहे. पोलिसांकडून या तक्रारी दाखल करुन घेतल्या जात असल्यामुळे नागरिकांना किमान दिलासा मिळतो. बँक खात्यांची आणि क्रेडिट कार्डची माहिती चोरुन तसेच ई मेल हॅक करुन , कार्डाचे क्लोनिंग अशा एक ना अनेक प्रकारच्या पद्धती वापरुन चोरटे नागरिकांची खाती रिकामी करीत आहेत. या गोरख धंद्यामध्ये दिल्लीमधील कॉल सेंटर्स मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहेत. यासोबतच बँकांकडून होणारे केवायसी पॉलिसीबाबतचे दुर्लक्ष कारणीभूत आहे. प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करणे जेवढे सोईस्कर होणार आहे, तेवढेच ते धोकादायकही असणार आहे. घरबसल्या नागरिकांच्या खात्यांमधून रातोरात लाखो रुपये लंपास करण्याच्या घटना आगामी काळातही मोठ्या प्रमाणावर वाढण्याचा धोका आहे. ग्राहकाला मोबाईलवर फोन करुन बँकेचा वरिष्ठ अधिकारी बोलत असल्याची बतावणी केली जाते. त्यांच्याकडून एटीएम अथवा क्रेडीट कार्डची माहिती विचारुन घेतली जाते. त्या माहितीच्या आधारे खात्यामधून लाखो रुपये वर्ग करुन घेतले जातात. यासोबतच ई-मेल आणि फोन कॉल्स अथवा मेसेज पाठवून अशा प्रकारची फसवणूक केली जात आहे. पुण्यामध्ये गेल्या दहा महिन्यांत अशा प्रकारे नागरिकांना तीन कोटी रुपयांचा गंडा घालण्यात आला आहे. (प्रतिनिधी)तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण अधिकपोलिसांकडील उपलब्ध आकडेवारीनुसार, महाविद्यालयीन तरुण, नोकरदार व गृहिणींचे प्रमाण यात अधिक आहे. विविध विमा कंपन्यांच्या नावे ग्राहकांना फोन करून त्यांच्या चालू अथवा पूर्ण होत आलेल्या पॉलिसींचे पैसे तसेच त्यासोबतच आणखी जास्ती रकमेचे पॅकेज देण्याचे आमिष दाखवले जाते. त्या बदल्यात ग्राहकांना दिलेल्या बँक खात्यावर पैसे भरायला लावले जातात. लाखो रुपये भरल्यानंतरही ग्राहकांना पैसे मिळत नाहीत. ८ नोव्हेंबर ते २८ डिसेंबर (५0 दिवस) दरम्यान दाखल तक्रारीप्रकार अर्जक्रेडीट/डेबीट/एटीएम कार्ड७७माहिती चोरुन पैसे वर्ग करणे२२६बनावट क्रेडीट कार्ड२२३इन्श्युरन्स फ्रॉड0३ई मेल हॅक करुन पैसे वर्ग करणे0२आॅनलाईन बिझनेस फ्रॉड २१सोशल नेटवर्किंग९१मल्टी लेवल मार्केटींग0१हॅकिंग२७मोबाईलसंदर्भात गुन्हे१५लॉटरी फ्रॉड१८