शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

तांत्रिक कारणांमुळे ऑनलाइन वर्ग भरेना, ग्रामीण विद्यार्थ्यांचा अभ्यास होईना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 11, 2021 04:09 IST

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्यापासून पहिली व दुसरीचे विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि ...

कोरोनामुळे शाळा बंद आहेत. शाळा सुरू झाल्यापासून पहिली व दुसरीचे विद्यार्थी शाळेतच गेले नाहीत. या विद्यार्थ्यांना अक्षर ओळख आणि अंक गणिताची ओळख चांगल्या प्रकारे होणे गरजेचे आहे. सर्व साधारणपणे पहिली ते चौथीपर्यंत विद्यार्थ्यांना विद्यार्थ्यांना वाचन लेखनासह बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार या बाबी उत्तम पध्दतीने येणे अपेक्षित आहे. परंतु, शाळा सुरू नसल्यामुळे विद्यार्थी व शिक्षक संवाद होत नाही. त्यामुळे पालकांनीच यात लक्ष देऊन ‘घर घर पाठशाला’ हा उपक्रम राबवला पाहिजे,असे मत शिक्षणतज्ज्ञांकडून व्यक्त केले जात आहे.

ग्रामीण भागात आॅनलाईन शिक्षणास अडचणी येतात.त्यातच लहान मुलांना मोबाईल समोर बसवणे शक्य होत नाही. त्यामुळे आम्हा पालकांनाच वेळ मिळेल तेव्हा शिकवावे लागते. अक्षर ओळख व गणिताची ओळख करून देण्याचा प्रयत्न करतो.

- एम.आर.सुतार , पालक

---------------------

इंटनेट कनेक्टिव्हिटीबाबत अडचण असल्याने आॅनलाईन शिक्षणात अडथळे येतात.त्यामुळे पालक सुशिक्षत असल्यास मुलांना शिकवू शकतात.परंतु, अशिक्षित पालक मुलांना शिकवू शकत नाहीत. इंग्रजी विषयाचे ज्ञान सर्व पालकांना असतेच असे नाही. त्यामुळे इंग्रजी विषयात मुले मागे राहणाची शक्यता आहे.

- महेंद्र भालेराव , पालक

--------------------------

अभ्यास टाळण्याची मुलांकडून सांगितली जातात ही कारणे

१) माझा आत्ता अभ्यासाचा मूड नाही.

२)मी थोड्या वेळाने अभ्यास करणार आहे.

३) भाऊ अभ्यास करत नाही; मलाच अभ्यास करायला का सांगता?

४) गुरूजींनी शिकवलेले मला समजले नाही; मग मी काय अभ्यास करू ?

---------------------

प्राथमिक स्तरावर शिक्षण घेणा-या विद्यार्थ्यांसाठी अक्षर ओळख वाचन, लेखन फार महत्त्वाचे आहे. सध्या शाळा सुरू नसल्यामुळे विद्यार्थ्यांना कोणत्याच प्रकारचे ज्ञान मिळत नाही. पालकांनी वाचन, लेखन, बेरीज, वजाबाकी, गुणाकार ,भागाकार हे शिकवावे.या संकल्पना स्पष्ट झाल्या तरच विद्यार्थ्यांना पुढील वर्गातील शिक्षण घेणे सोपे जाते.त्यामुळे पालकांनी घर घर पाठशाला हा उपक्रम राहवला पाहिजे.

- गोविंद नांदेडे, शिक्षणतज्ञ

----------------------------

‘ग्रह शाळेअंतर्गत’ग्रामीण भागात एखाद्या गल्लीतील मुलांना वाड्यात किंवा मंदीरात एकत्रित करून त्यांना मुलभूत अभ्यासक्रम शिकवले पाहिजे.तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना बेरीज वजाबाकी,गुणाकार भागाकार यासह अक्षर ओळख आणि वाचन लेखन याची ओळख करून दिली पाहिजे.

- डॉ. अ. ल. देशमुख, शिक्षणतज्ञ

------------

जिल्ह्यातील वर्गनिहाय विद्यार्थी संख्या

पहिली - १,९०,०६१

दुसरी-१,९२,५९२

तिसरी-१,९०,१३१

चौथी-१,९०,५७५