शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
3
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
4
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
5
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
6
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
7
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
8
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
9
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
10
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
11
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
12
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
13
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
14
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
15
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
16
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
17
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
18
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
19
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
20
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांना पाठिंब्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीम

By admin | Updated: April 10, 2017 02:51 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे काही कर्मचारी संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पीएमपी प्रवासी मंचाने मुंढे यांच्या या निर्णयांना पाठिंबा दिला असून त्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीमही सुरू केली आहे.मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून पीएमपीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच मार्गावर अधिकाधिक बस आणण्यासाठीही संंबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत कामाला लावले आहे. कामात हलगर्जीपणा करणे, कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत बदल्याही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. सुट्टे भाग वेळेवर न दिल्याने भांडार व्यवस्थापकांनाही निलंबित केले आहे. पीएमपीच्या कार्यालयीने वेळेतही बदल करण्यात आला असून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर काही कर्मचारी संघटनांनी मुंढे बेकायदेशीरपणे कर्मचाऱ्यांचे निलंबन करीत असल्याचा दावा केला आहे. पीएमपी प्रवासी मंचाने मात्र मुंढे यांच्या या कारवाईला पाठिंबा दर्शविला आहे. मुंढे हे कार्यक्षम अधिकारी असून, संस्थेला शिस्त लावण्यासाठी ते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा असेल, असे मंचाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, मुंढे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिस्त घालून दिली आहे. कामाच्या वेळात वाढ केली. कामातील हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या निर्णयामुळे काही कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यामुळे मुंढे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, मुंढे पीएमपी व प्रवासीहिताचे निर्णय घेत असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या सह्या पोहचविल्या जाणार आहेत.(प्रतिनिधी)याला पाठिंंबा नाहीमुंढे यांनी प्रवासीकेंद्री निर्णय घेतल्यास त्याला पूर्णपणे समर्थन आहे. पण काही दिवसांपूर्वीच तोट्यातील काही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय चुकीचा असून, त्याला मंचाचा पाठिंबा असणार नाही. सर्व निर्णय प्रवासीहिताचेच व्हायला हवेत. मार्ग बंद करणे हा पर्याय नसून त्यात प्रवाशांचीही चुक नाही, असे जुगल राठी यांनी स्पष्ट केले.