शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मुंढे यांना पाठिंब्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीम

By admin | Updated: April 10, 2017 02:51 IST

पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त

पुणे : पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्षपदी नियुक्त झाल्यानंतर तुकाराम मुंढे यांनी बेशिस्त कर्मचाऱ्यांना निलंबित करण्याचा धडाका सुरू केला आहे. त्यामुळे काही कर्मचारी संघटनांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. मात्र, पीएमपी प्रवासी मंचाने मुंढे यांच्या या निर्णयांना पाठिंबा दिला असून त्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीमही सुरू केली आहे.मुंढे यांनी पहिल्या दिवसापासून पीएमपीतील कर्मचारी व अधिकाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. तसेच मार्गावर अधिकाधिक बस आणण्यासाठीही संंबंधित अधिकाऱ्यांना फैलावर घेत कामाला लावले आहे. कामात हलगर्जीपणा करणे, कामाच्या वेळी झोपा काढणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहेत. तसेच अंतर्गत बदल्याही मोठ्या प्रमाणात करण्यात आल्या आहेत. सुट्टे भाग वेळेवर न दिल्याने भांडार व्यवस्थापकांनाही निलंबित केले आहे. पीएमपीच्या कार्यालयीने वेळेतही बदल करण्यात आला असून बेशिस्त वर्तणूक करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईही सुरू केली आहे. यापार्श्वभूमीवर काही कर्मचारी संघटनांनी मुंढे बेकायदेशीरपणे कर्मचाऱ्यांचे निलंबन करीत असल्याचा दावा केला आहे. पीएमपी प्रवासी मंचाने मात्र मुंढे यांच्या या कारवाईला पाठिंबा दर्शविला आहे. मुंढे हे कार्यक्षम अधिकारी असून, संस्थेला शिस्त लावण्यासाठी ते जो निर्णय घेतील, त्याला पाठिंबा असेल, असे मंचाने स्पष्ट केले आहे. त्यासाठी आॅनलाईन सह्यांची मोहीमही सुरू करण्यात आली आहे. मंचचे अध्यक्ष जुगल राठी म्हणाले, मुंढे यांनी अध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर शिस्त घालून दिली आहे. कामाच्या वेळात वाढ केली. कामातील हलगर्जीपणा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना निलंबित केले. या निर्णयामुळे काही कर्मचारी नाराज झाले आहेत. त्यामुळे मुंढे कायद्याच्या बाहेर जाऊन काम करत असल्याचा आरोप होत आहे. मात्र, मुंढे पीएमपी व प्रवासीहिताचे निर्णय घेत असल्याने आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत या सह्या पोहचविल्या जाणार आहेत.(प्रतिनिधी)याला पाठिंंबा नाहीमुंढे यांनी प्रवासीकेंद्री निर्णय घेतल्यास त्याला पूर्णपणे समर्थन आहे. पण काही दिवसांपूर्वीच तोट्यातील काही मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय चुकीचा असून, त्याला मंचाचा पाठिंबा असणार नाही. सर्व निर्णय प्रवासीहिताचेच व्हायला हवेत. मार्ग बंद करणे हा पर्याय नसून त्यात प्रवाशांचीही चुक नाही, असे जुगल राठी यांनी स्पष्ट केले.