शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

इच्छुकांना भरावा लागणार आॅनलाइन अर्ज

By admin | Updated: July 6, 2015 04:31 IST

तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४ जुलैला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरून द्यावा लागणार आहे

भोर : तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी ४ जुलैला निवडणूक नोटीस प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निवडणुकीसाठी उमेदवारांना आॅनलाइन अर्ज भरून द्यावा लागणार आहे, असा आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिल्याचे तहसीलदार वर्षा शिंगण पाटील यांनी सांगितले.आॅगस्ट ते आॅक्टोबर २०१५ रोजी संपणाऱ्या ७० ग्रामपंचायतींच्या ५०० जागांसाठी, तर ४८ ग्रामपंचायतीच्या पोटनिवडणुकीतील ८८ रिक्त जागा मिळून ११८ ग्रामपंचायतींच्या ५४८ जागांचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. या निवडणूक कार्यक्रमाची नोटीस शनिवारी (दि. ४) प्रसिद्ध करण्यात आली. १३ ते २० जुलै या कालावधीत आॅनलाइन उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. २१ जुलैला उमेदवारी अर्जांची छाननी होणार आहे. २३ जुलैला अर्ज मागे घेणे व उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. त्यानंतर ४ आॅगस्टला मतदान व ६ आॅगस्टला मतमोजणी होणार आहे. निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी उमेदवारी अर्ज आॅनलाइन भरुन द्यावे, अशी सूचना राज्य निवडणूक आयोगाने जिल्हा व तालुका प्रशासनाला दिल्या आहेत. त्यानुसार राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर आॅनलाइन अर्ज भरल्यानंतर, त्याची प्रिंट घेऊन ती निवडणूक अधिकारी यांच्याकडे सादर करायची आहे. त्याचबरोबर उमेदवारी अर्जाबरोबर आवश्यक कागदपत्रे व प्रतिज्ञापत्र द्यावे लागणार आहे. आॅनलाइन अर्ज भरुन देण्यासाठी तालुक्याच्या तहसीलदार कार्यालयात एक हेल्पडेस्क (मदत केंद्र) सुरु करण्यात आले आहे. या ठिकाणी आॅनलाइन अर्ज भरुन देण्याची माहिती दिली जाणार असल्याचे नायब तहसीलदार डॉ. धनंजय जाधव यांनी सांगितले. दरम्यान इच्छूकांनी मोर्चे बांधणीला सुरवात केली आहे. या साठी मतदारांच्या भेटी गाठींना भेट घेण्यास सुरवात झाली आहे. (वार्ताहर)-------------तालुक्यातील ७० ग्रामपंचायतींपैकी ६६ ग्रामपंचायतींच्या प्रत्येकी ७ सदस्यांप्रमाणे ४६२, तर वेळू, नसरापूर व उत्रौली ग्रामपंचायतीच्या प्रत्येकी ९ सदस्यांप्रमाणे २७५, तर भोलावडे ग्रामपंचायतीचे ११ सदस्य असे एकूण ५०० जागा व पोटनिवडणूक लागलेल्या ४८ जागा अशी एकूण ५४८ जागांसाठी सदरची निवडणूक होत असल्याने आॅनलाईन उमेदवारी अर्ज भरायला एकच गर्दी होणार आहे. १३ जुलैपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे सर्व कामकाज शिक्षक भवनाच्या इमारतीत होणार आहे.