शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या अनुभवाचा राज्याला काय उपयोग? कुंडमाळा पूल दुर्घटनेवरुन राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल
2
Uddhav Thackeray: विधानसभेची चूक पुन्हा करू नका, उद्धव ठाकरेंचा शाखाप्रमुखांना दम!
3
Air India Plane Crash: चित्रपट निर्माता बेपत्ता! विमान पडलेल्या ठिकाणाजवळ मोबाइलचं शेवटचं लोकेशन
4
१०-१५ हजारांत संसाराचा गाडा हाकायचा कसा? राज्यातील शिक्षणसेवकांचा सवाल
5
₹१७०० घेऊन गाझियाबादवरून अमेरिकेला पोहोचले; आज झुकरबर्ग, सुंदर पिचाईंपेक्षाही अधिक आहे सॅलरी
6
विशेष लेख: हवाई सुरक्षेबाबत भारत इतका मागास का?
7
तेजीसह शेअर बाजाराच्या कामकाजाला सुरुवात, Sensex ८१,१०० च्या वर; Nifty मध्येही तेजी, 'हे' स्टॉक्स वधारले
8
Ashish Shelar: गणेशोत्सव बंद होऊ देणार नाही, आशिष शेलार यांची ग्वाही; कोर्टात ३० जूनपर्यंत बाजू मांडणार!
9
लॅम्बोर्गिनी चलायी जाने हो...; राम कपूरने घरी आणली लक्झरियस कार, कोटींमध्ये आहे किंमत
10
लाईक्स आणि फॉलोअर्ससाठी आम्हाला त्रास का देता? विमानातल्या व्हायरल फोटोशी इन्फ्लुएन्सरकडून छेडछाड, कुटुंबियांचा संताप
11
Sharad Pawar: आगामी निवडणुकीत युतीबाबतचा निर्णय स्थानिक पातळीवर घेणार- शरद पवार
12
आजचा अग्रलेख: मध्य पूर्वेत पुन्हा आगडोंब!
13
मलायका अरोरा आणि अर्जुन कपूरचं झालं पॅचअप? या पोस्टनंतर चर्चेला उधाण
14
तुलाच पत्नी बनवेन! तरुणाने मृत प्रेयसीसोबत लग्न करून पूर्ण केलं वचन, नातेवाईक भावूक  
15
Matheran: माथेरानमधील तलावात नवी मुंबईचे तिघे बुडाले, एकाला वाचवण्यासाठी दोघांनी घेतल्या उड्या
16
आजचे राशीभविष्य - १६ जून २०२५, लाभदायी दिवस, व्यापार, व्यवसायात अपेक्षित यश मिळण्याची शक्यता
17
इस्रायल आणि इराणचे एकमेकांवरील हल्ले सुरूच, आतापर्यंत दोन्ही देशांचे किती नुकसान? जाणून घ्या
18
Kedarnath helicopter crash: पत्नीच्या ‘बर्थडे’साठी गेलेले यवतमाळचे कुटुंब केदारनाथला हेलिकॉप्टर अपघातात ठार
19
Pune Maval bridge collapses: कुंडमळाचा ३५ वर्षे जुना पूल कोसळला, इंद्रायणीत अनेक पर्यटक वाहून गेले, ५२ जणांना वाचविले 
20
कुंडमळा पूल दुर्घटनेतील मृतांचा आकडा चारवर; पाच वर्षांच्या बालकासह चौघांचा मृत्यू

ढगाळ वातावरणामुळे कांदा, गव्हाला धोका; शेतकरी चिंतातुर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 17, 2018 00:32 IST

बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत.

घोडेगाव : बुधवारपासून असलेले ढगाळ वातावरण अजून निवळलेले नसून मोठा पाऊस होतो की काय, या धास्तीने शेतकरी चिंतातुर झाला आहे. ढगाळ वातावरणामुळे काढणीसाठी आलेली कांदा, गहू, द्राक्ष, आंबा ही पिके धोक्यात आली आहेत.सध्या कांदा व गहू ही पिके काढणीला आली आहेत. ढगाळ वातावरणामुळे कांद्याची पात करपू शकते व मावा रोगाचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे जमिनीत कांदा वाढत नाही व उत्पादनात घट होते. अगोदरच कांद्याचा भाव घसरल्याने शेतकरी चिंचेत आहे व त्यात अशा वातावरणामुळे अजून नुकसान होणार आहे. तसेच काढणीसाठी आलेला गहू पावसामुळे जमिनीवर पडून खराब होऊ शकतो. आंब्याला या वातावरणाचा फटका बसणार आहे. मोहरातून निघालेली कनी या ढगाळ वातावरणामुळे गळून जाऊ लागली आहे. तसेच थोड्या मोठ्या झालेल्या फळावर पावसाचा थेंब पडल्याने हे फळ खराब होणार आहे. तसेच सध्या द्राक्षाला ३५ ते ४० रुपये असा बाजारभाव मिळत असला तरी अचानक पडलेल्या पावसामुळे काढणीला आलेली द्राक्ष खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे.वातावरणातील सततच्या बदलामुळे जशी माणसे आजारी पडतात तशीच अवस्था पिकांची झाली आहे. काही दिवस कडक ऊन तर मध्यच थंडी व ढगाळ वातावरण, शेतमाल कसा पिकवावा असा प्रश्न पडला आहे.या ढगाळ वातावरणाचा कांदा,गहू, आंबा या पिकांवर परिणाम होण्याची शक्यता शिनोलीयेथील शेतकरी मधुआप्पाबोºहाडे यांनी व्यक्त केली.