शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
4
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
5
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
6
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
7
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
8
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
9
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
10
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
11
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
12
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
13
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
14
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
15
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
16
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
17
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
18
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
19
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
20
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग

मिरवडी ग्रामपंचायतची शंभर टक्के करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामविकासाला ...

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे. यामध्ये विविध कर वसुलीवरच ग्रामपंचायतीचा विकास अवलंबून आहे. मार्चअखेर असल्यानिमित्ताने सर्वत्र घरपट्टी पाणीपट्टी वसुलीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. सालाबादप्रमाणे विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने घरपट्टी पाणीपट्टी भरणेबाबत उदासीनता दिसून येत आहे. मिरवडी ग्रामपंचायतीकडून संपूर्ण महिनाभर घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचे सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले होते.यामध्ये सरपंच सागर शेलार,उपसरपंच शांताराम थोरात तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका यांनी घरोघरी जाऊन वसुली करण्यासाठी प्राधान्य दिले होते. ३१ मार्च २०२१ अखेर एकूण घरपट्टी व पाणीपट्टी वसुली दहा लाख साठ हजार तीनशे सत्तावीस रुपये पूर्ण झाली.

ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला असल्यामुळे शंभर टक्के कर वसुली करण्यात यश आले असून जमा झालेला कर तसेच विविध निधीतून ग्रामविकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी सरपंच सागर शेलार यांनी सांगितले.