शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

मिरवडी ग्रामपंचायतची शंभर टक्के करवसुली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:10 IST

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामविकासाला ...

स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये ग्रामपंचायत हा ग्रामविकासाचा पाया आहे. परंतु बहुतांशी ग्रामपंचायतीमध्ये प्रचंड प्रमाणात घरपट्टी, पाणीपट्टी थकीत असल्याने ग्रामविकासाला खीळ बसली आहे. यामध्ये विविध कर वसुलीवरच ग्रामपंचायतीचा विकास अवलंबून आहे. मार्चअखेर असल्यानिमित्ताने सर्वत्र घरपट्टी पाणीपट्टी वसुलीवर मोठ्या प्रमाणावर भर दिला जात आहे. सालाबादप्रमाणे विविध अडचणींचा सामना नागरिकांना करावा लागत असल्याने घरपट्टी पाणीपट्टी भरणेबाबत उदासीनता दिसून येत आहे. मिरवडी ग्रामपंचायतीकडून संपूर्ण महिनाभर घरपट्टी पाणीपट्टी वसुलीचे सूत्रबद्ध नियोजन करण्यात आले होते.यामध्ये सरपंच सागर शेलार,उपसरपंच शांताराम थोरात तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य,ग्रामसेविका यांनी घरोघरी जाऊन वसुली करण्यासाठी प्राधान्य दिले होते. ३१ मार्च २०२१ अखेर एकूण घरपट्टी व पाणीपट्टी वसुली दहा लाख साठ हजार तीनशे सत्तावीस रुपये पूर्ण झाली.

ग्रामपंचायतीने वेळोवेळी केलेल्या आवाहनाला नागरिकांनी देखील उत्तम प्रतिसाद दिला असल्यामुळे शंभर टक्के कर वसुली करण्यात यश आले असून जमा झालेला कर तसेच विविध निधीतून ग्रामविकासाला प्राधान्य दिले जाणार असल्याचे यावेळी सरपंच सागर शेलार यांनी सांगितले.