शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
Yuzvendra Chahal Hat Trick : आधी धोनीची विकेट; मग चहलनं साधला IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकचा डाव
4
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
5
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
6
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
7
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
8
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
9
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
10
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
11
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
12
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
13
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
14
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
15
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
16
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
17
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
18
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
19
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
20
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत

एका रक्तदात्यामुळे वाचतो तीन जणांचा प्राण,

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2021 04:09 IST

पुणे : ‘‘कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा प्रचंड भासत होता. आताही टंचाई आहेच. पण नागरिक रक्तदानासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे रक्ताची ...

पुणे : ‘‘कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा प्रचंड भासत होता. आताही टंचाई आहेच. पण नागरिक रक्तदानासाठी पुढे येत आहेत. त्यामुळे रक्ताची गरज कमी होताना दिसते. एकाने रक्तदान केले तर तीन जणांना जीवदान मिळते. त्यामुळे प्रत्येकाने हे कार्य करणे आवश्यक आहे,’’ अशी भावना भारती ब्लड बँक सेंटरच्या क्वालिटी मॅनेजर गौरी बागडे यांनी व्यक्त केली.

सध्या कोरोनाच्या महामारीमुळे अनेकांना रक्तदान करता येत नाही. कारण कोरोना प्रतिबंधक डोस घेतला असेल तर पंधरा दिवसांनंतरच रक्तदान करता येते. पण लोकांमध्ये अजून तेवढी जागृती झालेली नाही. त्यामुळे नागरिकांनी योग्य माहिती घेतल्यानंतरच रक्तदानासाठी पुढे यावे. कारण अगोदरच या महामारीमुळे रक्तदान करणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले आहे. त्यात या डोसमुळे अडथळा येत आहे. कात्रज परिसरात लव्ह केअर शेअर फाउंडेशन हा तरुणांचा ग्रुप आहे. या ग्रुपतर्फे नियमित रक्तदान करण्यात येते.

बागडे म्हणाल्या,‘‘रक्तदान करणे अत्यंत आवश्यक आहे. थॅलेसेमिया रुग्णांसाठी तर हे खूप गरजेचे आहे. कारण त्यांच्या शरीरात नवीन रक्त तयार होत नाही. म्हणून त्यांच्या शरीराला नवीन रक्ताची गरज भासते. ते जर मिळाले नाही तर रुग्णांना जीव गमवावा लागतो. त्यासाठी प्रत्येक व्यक्तीचे रक्तदान त्यांच्यासाठी नवसंजीवनीच असते. नवीन आयुष्य असते. हे नागरिकांनी समजून घेतले पाहिजे.’’

——————————————

रक्तदान करून खूप छान वाटत आहे. पुण्यातील रक्ताचा तुटवडा लक्षात घेता लव केअर शेअर फाउंडेशन आणि ‘लोकमत’ वृत्तपत्राने आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान करायचा योग आला. भारती हॉस्पिटलचे कर्मचारी आणि लव्ह केअर शेअर फाऊंडेशनचे स्वयंसेवक यांनी रक्तदात्यांना उत्तम सहकार्य केले. रक्तदानाचा अनुभव घेऊन छान वाटले.

- अपूर्वा जोगळ, रक्तदाता तरुणी