शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
आपने जिंकल्या विधानसभेच्या २ जागा; भाजपने लावली होती ताकद पणाला
12
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
13
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
14
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
15
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
16
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
17
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
18
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
19
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
20
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी

दीड महिन्यापासून १६ गावे पाण्यापासून राहिली वंचित

By admin | Updated: April 10, 2017 02:14 IST

पुरंदरमधील पारगाव माळशिरस-कोळविहिरे आदी १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा

जेजुरी : पुरंदरमधील पारगाव माळशिरस-कोळविहिरे आदी १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची समिती विसर्जित करून ती जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतल्याने या योजनेच्या समितीचे अध्यक्ष बापू भोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के व गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे.तब्बल ३ कोटी ४१ लक्ष रुपये वीजबिल थकल्याने सदरील १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणावरील योजनेचा ३ मार्चपासून महावितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याने गेल्या दीड महिन्यांपासून या १६ गावातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. यातच ही योजना चालवणारी समितीच बरखास्त केल्याने योजनेबाबत प्रश्नचिन्हच निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पारगाव, माळशिरस, कोळविहीरे आदी १६ गावांसाठी पाणीपुरवठा योजना सन १९९८ -९९ साली सुरू करण्यात आली होती. सन २०११ पर्यंत ही योजना जीवन प्राधिकरणकडून चालवली जात होती. मात्र येणारे वीजबिल आणि त्याप्रमाणात होणारी वसुली यामध्ये मोठी तफावत असल्याने सन २०११ साली ही योजना बंद पडली. त्यावेळी तेथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी सदस्यांची प्रादेशिक पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात येवून सदरील योजना चालविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून हस्तांतरित करण्यात आली. सन २०१४ साली सुद्धा थकीत वीजबिलामुळे महावितरण कडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी लोकसभा निवडणुका असल्याने येथील काही लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत सुमारे २ ते ३ लाख रुपये गोळा करीत थकीत वीजबिलातील काही रक्कम भरली होती. सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात व दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये गेल्या महिन्यात महावितरण विभागाकडून पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पारगाव माळशिरस -कोळविहीरे आदी १६ गावातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली २० मार्चला प्रादेशिक पाणीपुरवठा समितीची आढावा सभा घेण्यात आली होती. यावेळी ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे ठरविण्यात आले असल्याने समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सध्याच्या दुष्काळ आणि तीव्र उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचे काय? थकीत वीजबिल कुणी भरावयाचे ?असा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. (वार्ताहर)लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : माणिकराव झेंडे-पाटील १६ गावांची पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत पुरंदरचे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मागे आम्ही कधीही पाणीपुरवठा विस्कळीत होऊ दिला नाही. राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पदरमोड करून व वर्गणी काढून- रक्कम गोळा करून वीजबिलापोटी काही रक्कम भरीत योजना कार्यान्वित ठेवण्याचा प्रयत्न केला होता.औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूआहे; मात्र शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. थकीत वीजबिलाबाबत लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर चर्चा करून मार्ग काढावा व वीजबिल माफ करावे, अथवा आपल्या अधिकारात पाणीपुरवठा सुरू करावा, अशी प्रतिक्रिया माजी उपसभापती माणिकराव झेंडे-पाटील यांनी दिली आहे. आपण या योजनेची समिती बरखास्त करण्याचा निर्णय किंवा सूचना केलेली नव्हती. केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजना हस्तांतरित करण्यात आली, तेव्हा तिचे थकीत वीजबिलही भरून घ्यायला हवे होते. जर योजना व्यवस्थित चालवता येत नसेल, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे परत वर्ग करण्याचा प्रयत्न करायला हवा होता किंवा त्यांच्याकडील थकबाकी वसूल करायला पाहिजी होती. तसे प्रयत्न कोणीच केले नाहीत. एवढी मोठी थकबाकी भरणे शक्य नाही, पण ती भरावी लागणार आहे. आपण स्वत: याबाबत प्रयत्नशील आहोत. योजनेबाबत कोणीही राजकारण करू नये.- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री