शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
3
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
4
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
5
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
6
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
7
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
8
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
9
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
10
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
11
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
12
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
13
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
14
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
15
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
16
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
17
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं
18
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
19
IPL 2025: कगिसो रबाडा ड्रग टेस्टमध्ये दोषी, झाले निलंबन! स्पर्धा सोडून परतला मायदेशी
20
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान

दीड महिन्यापासून १६ गावे पाण्यापासून राहिली वंचित

By admin | Updated: April 10, 2017 02:14 IST

पुरंदरमधील पारगाव माळशिरस-कोळविहिरे आदी १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा

जेजुरी : पुरंदरमधील पारगाव माळशिरस-कोळविहिरे आदी १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेची समिती विसर्जित करून ती जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचा निर्णय राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी घेतल्याने या योजनेच्या समितीचे अध्यक्ष बापू भोर यांनी आपल्या पदाचा राजीनामा पंचायत समितीचे सभापती अतुल म्हस्के व गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला आहे.तब्बल ३ कोटी ४१ लक्ष रुपये वीजबिल थकल्याने सदरील १६ गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या नाझरे धरणावरील योजनेचा ३ मार्चपासून महावितरण विभागाकडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला असल्याने गेल्या दीड महिन्यांपासून या १६ गावातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. यातच ही योजना चालवणारी समितीच बरखास्त केल्याने योजनेबाबत प्रश्नचिन्हच निर्माण झालेले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेअंतर्गत पारगाव, माळशिरस, कोळविहीरे आदी १६ गावांसाठी पाणीपुरवठा योजना सन १९९८ -९९ साली सुरू करण्यात आली होती. सन २०११ पर्यंत ही योजना जीवन प्राधिकरणकडून चालवली जात होती. मात्र येणारे वीजबिल आणि त्याप्रमाणात होणारी वसुली यामध्ये मोठी तफावत असल्याने सन २०११ साली ही योजना बंद पडली. त्यावेळी तेथील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक आदी सदस्यांची प्रादेशिक पाणीपुरवठा समिती स्थापन करण्यात येवून सदरील योजना चालविण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाकडून हस्तांतरित करण्यात आली. सन २०१४ साली सुद्धा थकीत वीजबिलामुळे महावितरण कडून वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता. मात्र त्यावेळी लोकसभा निवडणुका असल्याने येथील काही लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी पदरमोड करीत सुमारे २ ते ३ लाख रुपये गोळा करीत थकीत वीजबिलातील काही रक्कम भरली होती. सध्याच्या तीव्र उन्हाळ्यात व दुष्काळसदृश परिस्थितीमध्ये गेल्या महिन्यात महावितरण विभागाकडून पाणीपुरवठ्याचा वीजपुरवठा खंडित केल्यामुळे पारगाव माळशिरस -कोळविहीरे आदी १६ गावातील नागरिक तीव्र पाणीटंचाईचा सामना करीत आहेत. राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांच्या अध्यक्षतेखाली २० मार्चला प्रादेशिक पाणीपुरवठा समितीची आढावा सभा घेण्यात आली होती. यावेळी ही योजना जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित करण्याचे ठरविण्यात आले असल्याने समिती बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला असला तरी सध्याच्या दुष्काळ आणि तीव्र उन्हाळ्याच्या परिस्थितीमध्ये ग्रामवासीयांच्या पिण्याच्या पाण्याचे काय? थकीत वीजबिल कुणी भरावयाचे ?असा प्रश्न अनुत्तरीत राहिला आहे. (वार्ताहर)लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष : माणिकराव झेंडे-पाटील १६ गावांची पाणीपुरवठा योजना गेल्या दीड महिन्यापासून बंद असून नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत. याबाबत पुरंदरचे लोकप्रतिनिधी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत आहेत. मागे आम्ही कधीही पाणीपुरवठा विस्कळीत होऊ दिला नाही. राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी व कार्यकर्त्यांनी पदरमोड करून व वर्गणी काढून- रक्कम गोळा करून वीजबिलापोटी काही रक्कम भरीत योजना कार्यान्वित ठेवण्याचा प्रयत्न केला होता.औद्योगिक वसाहतीमधील काही कारखान्यांना पाणीपुरवठा सुरूआहे; मात्र शेतकरी पिण्याच्या पाण्यापासून वंचित आहेत. थकीत वीजबिलाबाबत लोकप्रतिनिधींनी शासनस्तरावर चर्चा करून मार्ग काढावा व वीजबिल माफ करावे, अथवा आपल्या अधिकारात पाणीपुरवठा सुरू करावा, अशी प्रतिक्रिया माजी उपसभापती माणिकराव झेंडे-पाटील यांनी दिली आहे. आपण या योजनेची समिती बरखास्त करण्याचा निर्णय किंवा सूचना केलेली नव्हती. केवळ महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून योजना हस्तांतरित करण्यात आली, तेव्हा तिचे थकीत वीजबिलही भरून घ्यायला हवे होते. जर योजना व्यवस्थित चालवता येत नसेल, तर महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे परत वर्ग करण्याचा प्रयत्न करायला हवा होता किंवा त्यांच्याकडील थकबाकी वसूल करायला पाहिजी होती. तसे प्रयत्न कोणीच केले नाहीत. एवढी मोठी थकबाकी भरणे शक्य नाही, पण ती भरावी लागणार आहे. आपण स्वत: याबाबत प्रयत्नशील आहोत. योजनेबाबत कोणीही राजकारण करू नये.- विजय शिवतारे, जलसंपदा राज्यमंत्री