शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
3
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
4
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
5
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
6
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
7
समृद्धी महामार्गावर अपघात, आयशर वाहन खांबावर आदळले! संभाजीनगरचा चालक ठार, सहकारी जखमी
8
"अशीच कुठूनतरी येईल गोळी किंवा फुटेल ग्रेनेड...", श्रेयस राजेची पहलगाम हल्ल्यावरील कविता चर्चेत
9
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
10
EPFO पोर्टलनं वाढवली युजर्सची डोकेदुखी; लॉग इन पासून पासबुक डाऊनलोडपर्यंत येताहेत समस्या
11
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
12
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
13
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
14
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
15
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
16
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
17
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
18
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
19
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
20
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान

चिमण्यांसाठी एक एकर ज्वारी राखीव, पक्ष्यांच्या रक्षणासाठी पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2018 01:24 IST

रणगाव (ता. इंदापूर) येथील नितीन मुरलीधर महाडिक या शेतकऱ्याने परिसरातील चिमण्या दुर्मिळ होत असल्याने चारापाणी मिळत नसल्यामुळे त्यांना खाद्यान्न देण्याच्या हेतूने स्वत:च्या शेतातील एक एकर ज्वारी न काढण्याचा निर्णय घेतला आहे.

वालचंदनगर : रणगाव (ता. इंदापूर) येथील नितीन मुरलीधर महाडिक या शेतकऱ्याने परिसरातील चिमण्या दुर्मिळ होत असल्याने चारापाणी मिळत नसल्यामुळे त्यांना खाद्यान्न देण्याच्या हेतूने स्वत:च्या शेतातील एक एकर ज्वारी न काढण्याचा निर्णय घेतला आहे. याबरोबरच त्यांनी पक्ष्यांसाठी पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था केली आहे.रणगाव (ता. इंदापूर) येथील तरुण शेतकºयाने मुक्या पक्ष्यांच्या सहवेदना जाणून घेतलेल्या आहेत. तीव्र उन्हाळ्यात चिमण्यांना अन्न-पाणी मिळत नसल्यामुळे चिमण्यांचे दु:ख लक्षात घेऊन स्वत:च्या शेतातील ज्वारी सोडून देऊन सर्वांपुढे आदर्श ठेवला आहे. नितीन महाडिक या शेतकºयांना लहानपणापासूनच पक्ष्यांविषयी प्रेम असल्याने दरवर्षी पक्ष्यांना पाण्याची सुविधा उपलब्ध करून देत असत. दरवर्षी चिमण्यांचे घटते प्रमाण व चिमण्यांची दुर्मिळता लक्षात घेऊन या वर्षी चिमण्यांना अन्न-पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला. घरातील सर्वच सदस्यांनी त्यांच्या निर्णयाला अनुमती दर्शविल्यामुळे आज जवळजवळ १ एकर जमिनीवर असलेली ज्वारी राखण न करता पाखरे न हुसकावण्याचा निर्णय घेतल्याने हजारो चिमण्या या ज्वारीवर ताव मारून पाणी पिऊन भुर्रर्रर्र उडून जाताना दिसत आहेत.परिसरातील पशू-पक्ष्यांकडे माणसाने स्वत:च काळजीपूर्वक लक्ष दिल्यास दुर्लक्षित होणारे पक्षी पुन्हा आपल्याला थव्याथव्याने पाहावयास मिळतील.प्रत्येकाने जमेल तेवढ्या प्रमाणात पाणी व चारा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केल्यास मुक्या पक्ष्यांना आधार मिळणार असल्याचे नितीन याने सांगितले.