शहरं
Join us  
Trending Stories
1
“मतांची चोरी पकडली गेली, आता भाजपाची सत्ता जायची वेळ आली आहे”; उद्धव ठाकरेंचा मोठा दावा
2
Pune Crime: चुलतीला ‘आय लव्ह यू’ म्हटल्याचा राग… हॉकी स्टिकने मारहाण करत युवकाची हत्या
3
अनिल अंबानींना १,८२८ कोटी रुपयांचा दंड? सेबी करणार मोठी कारवाई; कारण काय?
4
आधार, पॅन बाळगले म्हणून कुणी भारतीय ठरत नाही; बांगलादेशी नागरिकाचे १० वर्षे वास्तव्य, जामीन नाकारला
5
२.५ लाखांपर्यंत पोहोचणार सोन्याचे दर? खरेदीदारांसाठी वाईट बातमी; ६ वर्षांत २००% झालीये वाढ
6
आजचे राशीभविष्य: बुधवार १३ ऑगस्ट २०२५; बोलण्यावर ताबा ठेवा, खर्च वाढणार नाही याकडे लक्ष द्या, कामात यश मिळेल
7
अमेरिकेतून मायदेशी परतत आहेत भारतीय; का वाटतेय हद्दपार करण्याची भीती?
8
आधी लाबूबू डॉल जाळली, आता तीच पुन्हा समोर आली; भारती सिंह म्हणाली, "ही माझा पिच्छाच..."
9
उद्धवसेना, शरद पवार गटाला खिंडार; पदाधिकारी, कार्यकर्त्यांचा अजित पवार गटात प्रवेश
10
पालिकांमध्ये 'एक वॉर्ड-एक नगरसेवक' पद्धत लागू करा; मनसेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी
11
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
12
सुवर्णयुगाचा अंत! 'देवदास' फेम बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन, सिनेसृष्टीवर शोककळा
13
'आमदार असल्याने मारहाण करण्याचे लायसन्स मिळत नाही'; बच्चू कडू यांना ३ महिन्यांची शिक्षा
14
आलिशान कारमधून ३१ कोटींची ड्रग्ज तस्करी; ठाणे पालिकेचा लोगो लावून कारमधून सुरू होता कारभार
15
अग्रलेख: भटक्यांचा 'अनाथाश्रम'; कल्पना यशस्वी झाली तर मोकळेपणाने करता येईल संचार
16
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
17
आधार कार्ड, मतदार ओळखपत्र नागरिकत्वाचा पुरावा नाहीत! मतदार यादीतून वगळण्याचा अधिकार निवडणूक आयोगालाच
18
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
19
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
20
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना

पाणलोट क्षेत्रातील जुन्या आठवणींना उजाळा, जुनी मंदिरे दिसू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:09 IST

भोर तालुक्यातील भोरपासून १८ किमीवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर ...

भोर तालुक्यातील भोरपासून १८ किमीवर वेळवंडी नदीवर ब्रिटिशकालीन भाटघर धरण बांधण्यात आले. त्यावेळी ४० गावांतील ५ हजार ६७१ एकर जमीन संपादित करण्यात आली, त्यावेळी धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील गावे उठवून स्थलांतरित झाली आहेत. स्थलांतरित झालीतरी जुन्या आठवणी तशाच राहिल्या आहेत. परंतु या गावाच्या वेशी, घरे, जुन्या वड्यांच्या खुणा, मंदिरे आजही आपल्याला या धरण क्षेत्रात पाणी कमी झाल्यावर पाहवयास मिळतात.

भाटघर पाणलोट क्षेत्रात जुन्या वेळवंड गावठाणातील पांडवकालीन नागोबाचे मंदिर गेले दहा महिने पाण्यामध्ये असते पाणी कमी झाल्यामुळे मंदिर पाहण्यास मिळत आहे. मंदिराचा गाभारा व मंदिराच्या भिंतीचे बांधकाम दगडात केलेले आहे. मंदिराच्या कळसाचे बांधकाम चुनखडक व वाळूमध्ये केलेले आहे. मंदिरासमोर पार्वतीमातेची मूर्ती व नंदी आहे. या भागात पाऊस जास्त असल्याने दरवर्षी पावसामुळे धरणातील गाळ व पाणी गाभाऱ्यामध्ये साचून राहते. वेळवंड गावातील ग्रामस्थ व तरुण मुले गाभऱ्यातील गाळ काढून मंदिराची स्वच्छता करतात. पांडवकालीन पौराणिक मंदिर पाहण्यासाठी परिसरातील भाविक दर्शनासाठी येतात. हा प्राचीन काळातील सांस्कृतीक वारसा जतन करण्याची काळाची गरज वेळवंड परिसरातील ग्रामस्थ करीत आहे.

भाटघर धरण पाणलोट क्षेत्रातील पाणी कमी झाल्यावर आपल्या गावदेवाचे दर्शन मिळते.

छाया - स्वप्निलकुमार पैलवान