शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

तेल्याचे एकात्मिक पध्दातीने व्यवस्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2021 04:09 IST

उरुळी कांचन : "शेतकऱ्यांनी डाळींब बागा उपटून न टाकता तेल्या रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे व तेल्याग्रस्त बागेत जास्त ...

उरुळी कांचन : "शेतकऱ्यांनी डाळींब बागा उपटून न टाकता तेल्या रोगाचे एकात्मिक पद्धतीने व्यवस्थापन करावे व तेल्याग्रस्त बागेत जास्त असलेली फळे काढून टाकावीत त्यामुळे तेल्या रोगावर नियंत्रण मिळवता येईल असे मत कृषी विभागाचे शास्त्रज्ञ सुनील जोगदंड यांनी व्यक्त केले.

कृषी विभागातर्फे डाळींब पिकावरील तेल्या रोगाची पाहणी राहुरी येथील वैज्ञानिकांनी टिळेकरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामपंचायत हद्दीतील डाळिंब पीक घेणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन प्रत्यक्ष भेट दिली यावेळी जोगदंड बोलत होते. टिळेकरवाडी ग्रामपंचायत हद्दीसह परिसरात पाचशे एकर पेक्षा जास्त डाळिंब पिक घेतले जाते. त्यापैकी ८० टक्के डाळिंब बागा तेल्या ग्रस्त झाल्यामुळे कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना विशेष पॅकेज मिळण्यासाठी वरिष्ठ पातळीवर प्रयत्न करावा. अशी मागणी येथील शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली आहे.

याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी सपना ठाकूर, हडपसर विभागाचे कृषी अधिकारी गुलाबराव कडलक, कृषी विभागाचे कृषी सहाय्यक राजेंद्र भोसेकर, महेश महाडिक, पर्यवेक्षक रामदास डावखर, माजी कृषी अधिकारी संजय टिळेकर, शेतकरी सदाशिवराव टिळेकर, अक्षय टिळेकर, योगेश टिळेकर, संतोष राऊत आदी उपस्थित होते. यावेळी सुनील जोगदंड यांनी राहुरी कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ शास्त्रज्ञ डॉ. श्रीहरी हसबनीस यांना विडिओ कॉन्फरन्स वर डाळिंबाच्या बागा दाखविल्या.

त्यावर कृषी शास्त्रज्ञ डॉ श्रीहरी हसबनीस म्हणाले की, डाळिंबाचा पुढील बहार हा ऑक्‍टोबरमध्ये धरावा म्हणजे तेल्याचा प्रादुर्भाव कमी होईल. तसेच ऑक्टोबर मध्ये धरल्या जाणाऱ्या बहारासाठी टिळेकरवाडीला राहुरी कृषी विद्यापीठाची टीम पुन्हा येईल व मार्गदर्शन करेल असे आश्‍वासन शेतकऱ्यांना दिले. डाळिंबावर दरवर्षी तेल्या हा विषाणुजन्य रोग पिक अंतिम टप्प्यात आल्यावर येतो व शेतकऱ्याचे केलेले सर्व कष्ठ व खर्च वाया जातो यावर गेले कित्येक वर्षात नेमकी उपाययोजना का सापडत नाही हा खरा संशोधनाचा भाग असुन कोरोना सारख्या विषाणू व संसर्गजन्य मानवी आजारावर लस सापडते तर यावर का सापडत नाही ? हे कोडे उलगडत नाही अशी खंत संजय टिळेकर या शेतकऱ्याने पोटतिडकीने व्यक्त केली.