शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यानेच पाणी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 04:25 IST

खडकवासला धरणातून दौंड तालुक्यासाठी सोडलेल्या पाण्याचे नियोजन ठरलेले असताना पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने अगोदरच दौंड पूर्व भागाचे पाणी पळविले.

पाटस : खडकवासला धरणातून दौंड तालुक्यासाठी सोडलेल्या पाण्याचे नियोजन ठरलेले असताना पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने अगोदरच दौंड पूर्व भागाचे पाणी पळविले. त्यामुळे या भागातील सिंचनाचे वेळापत्रकच कोलमडून गेल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याविरोधात पाटबंधारे विभागाच्याच दुसऱ्या अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.पाटस (ता. दौंड) येथील खडकवासला पाटबंधारे उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी काशिनाथ देवकाते यांनी पाटस हद्दीतील वितरिका, उपवितरिका आणि तलावाचे दरवाजे मध्यरात्री उघडले. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील सिंचनव्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे. संबंधित अधिकाऱ्याची तक्रार खडकवासला पाटबंधारे विभागाचे अभियंता रवी जाधव यांनी वरिष्ठांकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, खडकवासला कालव्याअंतर्गत खडकवासला धरणातून पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आहे. हे पाणी ‘टेल टू हेड’ (शेवटापासून ते सुरुवातीकडे) असे सोडण्यात आले आहे. प्रथम पाणी इंदापूर तालुक्याला सोडण्यात आले. त्यानंतर ३१ मे रोजी इंदापूरचे पाणी संपून ते १ जूनला दौंड तालुक्याच्या पूर्व भागापासून सुरू करण्यात आले होते. दौंड तालुक्यात पाणी वाटपाचे तीन विभाग केले आहेत. प्रथम दौंड पूर्व भाग, नंतर पाटस मध्यभाग आणि शेवटी यवत परिसर असे नियोजन असते. पाटसला पाणी सोडण्यास अजून तीन चार दिवस बाकी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास पाटस उपविभागाच्या हद्दीतील वितरिका, उपवितिरिका तलावाचे दरवाजे वरिष्ठांची कुठलीही पूर्वसूचना न घेता प्रभारी उपविभागीय अधिकारी काशिनाथ देवकाते यांनी उघडले. त्यामुळे पूर्व भागातील पाणी पहाटेच्या वेळी बंद होवून ते पाटसला गेले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी अभियंता रवी जाधव यांच्याकडे याबाबत तक्रार करून असंतोष व्यक्त केला. त्यामुळे जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. वाढते तापमान, जळून चाललेली पिके, पिण्याच्या पाण्याचे आटलेले स्रोत, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असताना असा निष्काळजीपणाचा प्रकार घडणे चुकीचे आहे. उन्हाळी आवर्तनाचे नियोजन ठरल्याप्रमाणे सुरू होते; मात्र या घटनेमुळे ते विस्कळीत झाले आहे. तर पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. या संदर्भात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार, अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्याकडे तक्रार केली आहे. (वार्ताहर)