शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

अधिकाऱ्यानेच पाणी पळविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2015 04:25 IST

खडकवासला धरणातून दौंड तालुक्यासाठी सोडलेल्या पाण्याचे नियोजन ठरलेले असताना पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने अगोदरच दौंड पूर्व भागाचे पाणी पळविले.

पाटस : खडकवासला धरणातून दौंड तालुक्यासाठी सोडलेल्या पाण्याचे नियोजन ठरलेले असताना पाटबंधारे विभागाच्या एका अधिकाऱ्याने अगोदरच दौंड पूर्व भागाचे पाणी पळविले. त्यामुळे या भागातील सिंचनाचे वेळापत्रकच कोलमडून गेल्याने येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याविरोधात पाटबंधारे विभागाच्याच दुसऱ्या अधिकाऱ्याने वरिष्ठांकडे तक्रार केली आहे.पाटस (ता. दौंड) येथील खडकवासला पाटबंधारे उपविभागाचे प्रभारी उपविभागीय अधिकारी काशिनाथ देवकाते यांनी पाटस हद्दीतील वितरिका, उपवितरिका आणि तलावाचे दरवाजे मध्यरात्री उघडले. त्यामुळे तालुक्याच्या पूर्व भागातील सिंचनव्यवस्था पूर्णपणे बंद झाली आहे. संबंधित अधिकाऱ्याची तक्रार खडकवासला पाटबंधारे विभागाचे अभियंता रवी जाधव यांनी वरिष्ठांकडे केली आहे. या संदर्भात अधिक माहिती अशी, खडकवासला कालव्याअंतर्गत खडकवासला धरणातून पाणी कॅनॉलद्वारे सोडण्यात आले आहे. हे पाणी ‘टेल टू हेड’ (शेवटापासून ते सुरुवातीकडे) असे सोडण्यात आले आहे. प्रथम पाणी इंदापूर तालुक्याला सोडण्यात आले. त्यानंतर ३१ मे रोजी इंदापूरचे पाणी संपून ते १ जूनला दौंड तालुक्याच्या पूर्व भागापासून सुरू करण्यात आले होते. दौंड तालुक्यात पाणी वाटपाचे तीन विभाग केले आहेत. प्रथम दौंड पूर्व भाग, नंतर पाटस मध्यभाग आणि शेवटी यवत परिसर असे नियोजन असते. पाटसला पाणी सोडण्यास अजून तीन चार दिवस बाकी असतानाच मध्यरात्रीच्या सुमारास पाटस उपविभागाच्या हद्दीतील वितरिका, उपवितिरिका तलावाचे दरवाजे वरिष्ठांची कुठलीही पूर्वसूचना न घेता प्रभारी उपविभागीय अधिकारी काशिनाथ देवकाते यांनी उघडले. त्यामुळे पूर्व भागातील पाणी पहाटेच्या वेळी बंद होवून ते पाटसला गेले. यामुळे येथील शेतकरी संतप्त झाले आहेत. त्यांनी अभियंता रवी जाधव यांच्याकडे याबाबत तक्रार करून असंतोष व्यक्त केला. त्यामुळे जाधव यांनी संबंधित अधिकाऱ्याची वरिष्ठांकडे तक्रार केली आहे. वाढते तापमान, जळून चाललेली पिके, पिण्याच्या पाण्याचे आटलेले स्रोत, जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न दिवसेंदिवस तीव्र होत असताना असा निष्काळजीपणाचा प्रकार घडणे चुकीचे आहे. उन्हाळी आवर्तनाचे नियोजन ठरल्याप्रमाणे सुरू होते; मात्र या घटनेमुळे ते विस्कळीत झाले आहे. तर पाण्याची टंचाई जाणू लागली आहे. या संदर्भात आमदार राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात, पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता बी. बी. लोहार, अधीक्षक अभियंता अतुल कपोले यांच्याकडे तक्रार केली आहे. (वार्ताहर)