शहरं
Join us  
Trending Stories
1
पुढील दोन दिवस मुसळधार पाऊस;  ‘या’ भागांना अतिवृष्टीचा इशारा, ठाणे, मुंबईत कशी असेल स्थिती?
2
‘दशावतार’ पाहून राज ठाकरे भारावले; पहिली प्रतिक्रिया देत म्हणाले, “महाराष्ट्राचा गंभीर विषय...”
3
भारतीय रेल्वेचे नियम बदलणार, प्रवाशांना फायदा होणार; ०१ ऑक्टोबरपासून लागू, सविस्तर पाहा...
4
... तर IND vs PAK मॅच पुन्हा पुन्हा नाही होणार; पाकला बाहेर काढणं आता यजमान UAE च्या हातात
5
काँग्रेस सोडून भाजपात येण्याची सांगितली कारणे, अशोक चव्हाण म्हणाले, “१४ वर्ष वनवास भोगला...”
6
'कालचा सामना भारताने नाही जिंकला, तर...', उद्धव ठाकरे गटाचे भाजपवर टीकास्त्र
7
'बंजारा आणि वंजारा एकच', धनंजय मुंडेंच्या वक्तव्याने नवा वाद; बंजारा समाज आक्रमक
8
Abhishek Sharma Record : फक्त १३ चेंडूत गुरु युवीसह किंग कोहलीचा मोठा विक्रम मोडण्याचा पराक्रम
9
Vidarbha Rain : २४ तास धोक्याचे ! नागपुरात पावसाचा कहर; वस्त्या जलमय, शाळेतील विद्यार्थ्यांना दोरीने काढले बाहेर
10
T20I मध्ये UAE च्या कर्णधारानं साधला मोठा डाव! कमी चेंडूत ३००० धावांसह सेट केला नवा रेकॉर्ड
11
“...तर आम्हाला बघ्याची भूमिका घेता येणार नाही; देवाभाऊ, आजूबाजूला काय घडते पाहा”: शरद पवार
12
पाकिस्तानची आगपाखड...! आपल्याच अधिकाऱ्याला निलंबित केले; भारताने हात न मिळविल्याचे प्रकरण...
13
अमेरिकाच टेबलवर चर्चेला येतेय...! ट्रम्प यांची टीम आज भारतात पोहोचणार, टेरिफ, व्यापारावर मांडवली करणार
14
“शेतकरी अस्मानी संकटात, सरकारने सरसकट हेक्टरी ५० हजारांची मदत द्यावी”: हर्षवर्धन सपकाळ
15
ठाकरे बंधूंनी एकत्र येणे शरद पवार अन् काँग्रेसला मान्य आहे का?; संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
मारुतीच्या व्हिक्टोरिसची किंमत जाहीर; २२ सप्टेंबरपासून नव्या GST ने मिळणार... सीएनजी कितीला?
17
हार्दिक पांड्या सध्या 'या' अभिनेत्रीला करतोय डेट! सेल्फी व्हायरल होताच चर्चांना उधाण
18
'सूर्यकुमारला शहिदांच्या कुटुंबांविषयी एवढंच वाटतय तर त्याने...'; AAP नेत्याने दिलं आव्हान
19
अशोक चव्हाणांसारखा ‘वनवास’ सर्वांना मिळो हीच कार्यकर्त्याची भावना; काँग्रेसचा खोचक टोला
20
"आम्हीही खूप काही बोलू शकतो, मी जर तिथे असतो तर..."; हस्तांदोलन प्रकरणावर शोएब अख्तर बरळला

पिण्याच्या पाण्यासाठी हद्दीलगतची गावे आर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 25, 2017 03:00 IST

महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी आता महापालिकेकडे पुकारा सुरू केला आहे. काही गावांना एक, तर काही गावांना दुसरा न्याय

लोकमत न्यूज नेटवर्कपुणे : महापालिकेच्या हद्दीलगतच्या गावांनी पिण्याच्या पाण्यासाठी आता महापालिकेकडे पुकारा सुरू केला आहे. काही गावांना एक, तर काही गावांना दुसरा न्याय, असा प्रकार महापालिकेकडून झाला असून त्याविरोधात आता पाणीपुरवठा होणार नसलेल्या गावांचे सरपंच महापौरांची भेट घेणार आहेत. महापालिका हद्दीलगतच्या साधारण ५ किलोमीटर परिघातील गावांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा, त्यासाठी त्या महापालिकांकडून पैसे आकारावेत, असे राज्य सरकारने महापालिकेला कळवले आहे. त्यानुसार महापालिका काही गावांना पाणीपुरवठा करीत असते. केशवरनगर, साडेसतरा नळी, महादेवनगर व मांजरी या चार ग्रामपंचायतींना मध्यंतरी झालेल्या महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत नव्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्याची मंजुरी देण्यात आली.मात्र, या चार गावांसह नऱ्हे, आंबेगाव, सूस, पाषाण अशा काही गावांचीही त्यांना महापालिकेने पाणीपुरवठा करावा, अशी मागणी होती. त्याचा विचारच महापालिकेने केलेला नाही. या गावांनाही पाणीपुरवठा करावा, अशी मागणी सर्वपक्षी नगरसेवकांनी केली होती. ती फेटाळल्यामुळे आता सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे या गावांमध्ये जवळीक असलेले काही नगरसेवकही नाराज झाले आहेत. या गावांमधील सरपंच महापालिकेत महापौर मुक्ता टिळक यांची भेट घेऊन त्यांच्याकडे या गावांचाही समावेश महापालिका पाणीपुरवठा करणार असलेल्या गावांमध्ये करावा, अशी मागणी करणार असल्याची माहिती मिळाली.