शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

चाऱ्या ठरताहेत वाहतुकीस अडथळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2017 02:44 IST

ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी बीएसएनएलद्वारे तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला साईडपट्ट्या खोदण्यात आल्या. मात्र, त्या व्यवस्थेत न भरल्याने यात अडकून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. यामुळे या चाऱ्या आता वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कभोर : ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी बीएसएनएलद्वारे तालुक्यातील रस्त्यांच्या कडेला साईडपट्ट्या खोदण्यात आल्या. मात्र, त्या व्यवस्थेत न भरल्याने यात अडकून अनेक वाहनांचे अपघात होत आहेत. यामुळे या चाऱ्या आता वाहनांसाठी डोकेदुखी ठरत आहेत.संपूर्ण भोर तालुक्यात ग्रामपंचायती आॅनलाईन करण्यासाठी राज्यमार्ग, जिल्हामार्ग आणि गावातंर्गत रस्त्याच्या बाजूला चारी टाकून नवीन लाईन टाकण्यात आली आहे. मात्र, या चारी व्यवस्थित बुजवल्या नाहीत. या चारीत पाणी साचल्यामुळे चिखल झाला आहे. पाण्यामुळे रस्त्याचा अंदाज येत नसल्याने वाहने या चारीत अडकून फसत आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता भोरवरून सुटलेली कार्ले एसटीबस वडतुंबी गावाजवळ चारीत रुतल्याने ती अडकून पडली होती. यामुळे प्रवाशांना चालत जावे लागले. दुपारी ४ वाजता सुटलेली टिटेघर बस पान्हवळ गावाजवळ बंद पडल्याने अनेक प्रवाशांची गैरसोय झाली. यामुळे एसटीच्या अनेक फेऱ्या  बंद झाल्याने दिवसभर वाहतुकीचा खोळंबा झाला आहे. तर अपघातातून प्रवासी नागरिक बचावले आहेत.यापूर्वी नीरा-देवघर धरणाच्या रिंगरोडने दुर्गाडीकडे जाणारी एसटी बस तर साळुंगण येथेही एसटीबस चारीत अडकून प्रवाशांचे मोठे हाल झाले होते. तर काल वरोडी व वडतुंबी येथे एसटी बस अडकून अपघात झाला आहे. आठवड्यातून एकतरी एसटी बस चारीतअडकून पडत असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. याचा फटका प्रवाशांना होत आहे. यावर उपाययोजना न केल्यास आंदोलन करावे लागेल असा इशारा सामाजिक कार्यकर्ते राजीव केळकर यांनी दिला आहे.ग्रामपंचायत आॅनलाईन करण्यासाठी काढलेल्या मोठमोठ्या चाºयांत पावसाळा सुरु झाल्यापासून मागील दोन महिन्यांत चार ते पाच एसटी बसगाड्या अडकून अपघात झाले आहेत. दिवसभर वाहतुकीचा खोळंबा यामुळे होत आहे. याचा फटका आगाराला होत असून त्यांना तोटा सहन करावा लागत आहे.- स्वाती आवळे,आगार प्रमुख, भोरग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे उद्दिष्टमार्च महिन्यात तालुक्यातील ग्रामपंचायती आॅनलाईन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. मात्र अद्यापही कामे पूर्ण झाली नाहीत. धड ग्रामपंचायती आॅनलाईन झाल्या नाहीत आणि चाऱ्या  चांगल्या पद्धतीने बुजवल्या नाहीत. येथील गटारेही काढली नाहीत. रस्ता खोदल्यामुळे साईडपट्ट्या खचल्या. त्यात वाहने अडकून रूतत आहेत. गटाराचे पाणी रस्त्यावर वाहिल्याने खड्डे पडत आहे. यामुळे ही कामे करणाºया ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ करत आहेत.