शहरं
Join us  
Trending Stories
1
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
2
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
3
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
4
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
5
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
6
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
7
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
8
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
9
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
10
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
11
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
12
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
13
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
14
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
15
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
16
"भेटायला येतो असा मी मित्रासारखा हट्ट केला होता पण...", प्रियाच्या आठवणीत अभिजीत भावुक
17
Video - पैशांचा पाऊस! चालत्या ट्रेनमधून उडवल्या ५०० च्या नोटा; गोळा करण्यासाठी लोकांची झुंबड
18
बच्चू कडूंना कधीच सोडणार नाही म्हणणारे माजी आमदार सोडून गेले; काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेश
19
सारख्या नावाचे दिवस गेले... सेम चेहराही शोधावा लागणार; यापुढे EVM वर उमेदवाराचा रंगीत फोटो छापणार...
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

ओबीसींना जाग आणण्याची गरज

By admin | Updated: October 24, 2016 01:27 IST

जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केली.

पुणे : जागे होण्याची वेळ येऊनही ओबीसी समाज झोपलेला आहे. त्याला जाग आणण्याचे काम झाले पाहिजे, अशी अपेक्षा ओबीसी सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रदीप ढोबळे यांनी रविवारी येथे व्यक्त केली. ओबीसी सेवा संघाचे पश्चिम महाराष्ट्र अधिवेशन येथे झाले. स्वागताध्यक्ष विठ्ठल सातव, सचिव दिगंबर लोहार, उपाध्यक्ष मोहन देशमाने यांची प्रमुख उपस्थिती होती. भगवानराव बिडवे, प्रतिमा परदेशी, मृणाल ढोले-पाटील, जगन्नाथ लडकत, समीर घाडवे, चंद्रकांत बावकर, तेजल राऊत आदींनी मनोगत व्यक्त केले. स्मरणिका प्रकाशन व ‘अज्ञानाचे बळी’ या प्रदीप ढोबळे लिखित तसेच ‘आरक्षणाचे राजकारण’ या रमेश भोजलिखित पुस्तकांचे प्रकाशन या वेळी करण्यात आले.क्रिमीलेअरची अट घालण्यात आल्याने ५० टक्के ओबीसींना सवलती मिळत नाहीत, त्यामुळे ही अट रद्द केली जावी, अशी मागणी विठ्ठल सातव यांनी केली. सध्याचा काळ ओबीसींना अडचणीचा असल्याचे सांगून भगवानराव बिडवे म्हणाले, बलुतेदारांनी ओबीसी ही एकच जात मानून संघटित व्हावे.चंद्रकांत बावकर यांनी इबीसी सवलतीमुळे मराठा समाजाचा आर्थिक प्रश्न मार्गी लागल्याचे नमूद केले. नितीन बुटी, महेंद्र धावडे, बापू राऊत, तेजल राऊत आदींचीही भाषणे झाली. गौरव उबाळे यांना ओबीसी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. सुमनताई पवार, प्रल्हाद वडगावकर, संजय राजे यांनाही ओबीसी जाणीव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. पुणे जिल्हाध्यक्ष रमेश भोज यांनी संघटनेच्या नव्या नियुक्त्या जाहीर केल्या. योगेश ढगे, राखी रासकर, नंदा करे, लक्ष्मी भोज, दिलीप शिंदे, आदींनी संयोजन केले. संदीप थोरात, रवी चौधरी, नजीरभाई शेख आदी उपस्थित होते.