शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
5
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
6
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
7
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
8
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
9
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
10
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
11
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
12
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
13
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
14
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
15
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
16
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
17
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
18
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
19
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
20
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी

परिचारिकाच करतात उपचार

By admin | Updated: March 13, 2016 01:27 IST

वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टरांची अनुपस्थिती असल्याने येथील परिचारिकाच रुग्णावर उपचार करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत

मार्गासनी : वेल्हे तालुक्यातील करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रात्री डॉक्टरांची अनुपस्थिती असल्याने येथील परिचारिकाच रुग्णावर उपचार करीत असल्याच्या घटना समोर येत आहेत. परिसरातील रुग्णांच्या अशा तक्रारी वारंवार येत आहेत. त्यामुळे डॉक्टर शशिकांत माने यांची बदली करा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थ करीत आहेत.शुक्रवारी (दि. ११) रात्री साडेआठला करंजावणे येथील शंकुतला बारीकराव शिंदे (वय ६५) यांना काही तर चावले; म्हणून उपचारांसाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले असता डॉक्टर उपस्थित नव्हते. त्यामुळे या ठिकाणी कामावर हजर असलेल्या परिचारिकेने औषधोपचार केले. पण, जर सर्पदंश झाला असता तर मोठा अनर्थ घडला असता. अशा केसेस करंजावणे येथे वारंवार घडत आहेत; पण रात्रीच्या वेळी डॉक्टर उपस्थित नसतात. या ठिकाणी असलेले डॉक्टर शशिकांत माने यांच्या बाबतीत जास्त तक्रारी आहेत. सकाळी उशिरा येणे आणि सायंकाळी लवकर घरी जाणे, रात्रीच्या वेळी डॉक्टर शशिकांत माने उपचार करण्याच्या परिस्थितीमध्ये नसतात, अशा तक्रारी येथील स्थानिक ग्रामस्थांच्या आहेत.वेल्हे तालुक्याच्या भौगोलिक स्थितीनुसार दोन भाग पडतात. वेल्ह्यापासून अंबवणेपर्यंत आणि वाजेघर, लव्ही, मेरावणे, गुंजवणे, चिरमोडी, सोंडे सरपाले, वडगाव आदी गावे करंजावणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर अवंलबून आहेत. या केंद्राची इमारत अद्ययावत बांधली असून सर्व उपकरणे आधुनिक पद्धतीची आहेत. दररोज सकाळी येथे उपचारांसाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या जास्त आहे; पण डॉक्टर शशिकांत माने यांच्याबाबत वारंवार तक्रारी येत आहेत. रुग्णालादेखील ते व्यवस्थित सेवा देत नसून लोकांनी दूरध्वनीवर संपर्क साधल्यास उडवाउडवीची उत्तरे देतात. त्यामुळे डॉक्टर शशिकांत माने यांची बदली करा, अशी येथील नागरिकांची मागणी आहे.(वार्ताहर)