शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ निर्णयामुळे घटली यंदा बारावीची परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2021 04:12 IST

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी नियमितपणे अर्ज करण्याची मुदत ...

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेतलेल्या दहावी बारावीच्या परीक्षांसाठी नियमितपणे अर्ज करण्याची मुदत संपली आहे. यंदा बारावीसाठी १३ लाख १७ हजार ७६, तर दहावीसाठी १६ लाख २०४ विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या एकूण विद्यार्थ्यांच्या संख्येत १ लाखाहून ३ हजार ४८१ एवढी घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र सध्या विलंब-अतिविलंब शुल्क आकारून अर्ज स्वीकारले जात आहेत. त्यामुळे त्यात फारशी वाढ होणार नाही, असे मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून सांगितले जात आहे.

राज्य मंडळाअंर्तगत येणाऱ्या नऊ विभागीय मंडळाच्या माध्यमातून दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा येत्या एप्रिल-मे महिन्यात घेतली जाणार आहे. त्यासाठी बारावीच्या एकूण ६ लाख ७ हजार ९८८ मुलींनी, तर ६ लाख ३३ हजार २६ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. तसेच दहावीच्या ७ लाख ३३ हजार ५३२ मुलींनी, तर ८ लाख ६६ हजार ५७२ मुलांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे.

बारावीच्या परीक्षेसाठी यंदा नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत घट झाल्याचे दिसून येत आहे. मात्र, कोरोनामुळे किंवा अनेकांनी शैक्षणिक ‘गॅप’ घेण्याचे ठरविले असल्याने ही संख्या घटली असावी, अशी चर्चा शिक्षण वर्तुळात केली जात आहे. मात्र, राज्य शासनाने दोन वर्षांपूर्वी घेतलेल्या अंतर्गत गुणांच्या निर्णयामुळे दहावीच्या निकालावर परिणाम झाला होता. विद्यार्थ्यांना तोंडी परीक्षेचे अंतर्गत गुण देण्याचे बंद केल्याने निकालात घट झाली होती. त्यामुळे दोन वर्षापूर्वी दहावीचा निकाल कमी लागल्याने यंदा बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटल्याचे दिसून येत आहे.

--

दोन वर्षांपूर्वी दहावीचा निकाल कमी लागला होता. त्यामुळे यंदा इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या कमी आहे. कोरोनामुळे मागील वर्षाच्या तुलनेत यंदा परीक्षेस नोंदणी करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या घटली असा तर्क लावता येणार नाही.

-दिनकर पाटील, अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ

----

विभागीय मंडळनिहाय दहावी-बारावीच्या परीक्षेस नोंदणी करणारे विद्यार्थी

मंडळाचे नाव बारावीचे विद्यार्थी दहावीचे विद्यार्थी

पुणे २,३०,९८३ २,७१,५०३

नागपूर १,४०,६१३ १,५६,२७१

औरंगाबाद १,४६,४१० १,७७,३११

मुंबई २,९२,७६८ १,६९,१७४

कोल्हापूर १,१७,५१९ १,३६,२४२

अमरावती १,३१,९३६ १,५९,७७१

नाशिक १,५१,६८३ २,०१,६७५

लातूर ७७,७९४ १,०५,९१७

कोकण २७,३७० ३१,५८१