लोकमत न्यूज नेटवर्कपुणे :येरवडा मध्यवर्ती तुरुंगात सध्या फाशीची शिक्षा सुनावलेले २६ कैदी ठेवण्यात आले होते. नयना पुजारी बलात्कार व खून खटल्यातील तिघा आरोपींना फाशी सुनावल्याने आता येरवडा कारागृहात फाशीची शिक्षा सुनावण्यात आलेल्या कैद्यांची संख्या २९ वर पोहचली आहे. कारागृहात फाशी झालेल्या कैद्यांना इतर शिक्षाधीन कैद्यांपासून स्वतंत्र बराकीमध्ये ठेवले जाते. येरवडा कारागृहात मुंबई, ठाणे, पुणे, नाशिक, नागपूर, कोल्हापूर, सोलापूर परिसरातील फाशीचे कैदी ठेवण्यात आले आहेत. राज्यात येरवडा व नागपूर या दोन तुरुंगातच फाशीची शिक्षा देण्याची सोय आहे. त्यामुळे फाशीची शिक्षा झालेले कैदी या दोनच तुरुंगात ठेवले जातात.खटला फास्टट्रॅक न्यायालयात का नाही ?नयना पुजारी खटला खूप वर्षे चालला, पण शेवटी न्याय मिळाला याचा आनंद आहे. खरेतर फास्टट्रॅक कोर्टात हा खटला चालवायला हवा होता, तसे झाले असते तर समाजात दहशत बसली असती. यापुढे अशा घटना होऊ नये यासाठी कंपनीने महिलांना घरी जाताना आवश्यक ती सुरक्षितता पुरविली पाहिजे. महिलांनीही अनोळखी कॅबमध्ये बसता कामा नये.- केतकी लिमये, आयटी अभियंतानयना पुजारी गुन्ह्यामध्ये तीन आरोपींनीच हे कृत्य केले आहे हे समोर आल्यानंतर जलदगतीने त्यांच्यावर न्यायालयात खटला चालविणे गरजेचे होते, पण तसे झाले नाही. खरेतर असे खटले फास्टट्रॅक कोर्टात चालविले तर पीडित कुटुंबाला नक्कीच न्याय मिळेल.- अपर्णा साळगावकर, आयटी अभियंता
येरवड्यातील फाशी झालेल्या कैद्यांची संख्या २९ वर पोहोचली
By admin | Updated: May 10, 2017 04:08 IST